शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

देशात पन्नास लाख हेक्टर क्षेत्रावर गाजर गवताचे साम्राज्य!

By admin | Updated: August 4, 2014 20:55 IST

निर्मूलनासाठी पंदेकृविने केला मेक्सिकन बिटलचा प्रयोग

अकोला: विदेशातून आयात झालेल्या गाजर (पर्थेनिअम) गवताने भारतातील पन्नास लाख हेक्टर क्षेत्र व्यापले असून, पिकांवर दुष्परिणाम करणार्‍या या गवतामुळे सर्दी व त्वचेचे आजार वाढले आहेत. या गवताचा प्रसार वेगाने होत असल्याने त्याचा नायनाट करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने (मेक्सिकन बिटल) या भुंग्याचा प्रयोग केला आहे. सन १९५६ च्या दशकात मेक्सिको,अज्रेंटिना,ऑस्ट्रेलिया या देशातून या गवताची भारतात आयात झाली आहे. सर्वप्रथम हे गवत पुण्याचे उद्यानविद्या तज्ज्ञ डॉ. परांजपे यांना दिसले. हे गवत वेगाने वाढत असल्याने महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक,जम्मू-काश्मीरचा भाग व्यापला असून, हे क्षेत्र ५0 लाख हेक्टरच्यावर पोहोचले आहे. या गवतामुळे पिकांवर दुष्परिणाम होत असून, उत्पादनात कमी होत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. तसेच विविध त्वचा आजाराला कारणीभूत ठरणार्‍या या गवतामुळे सर्दीचे आजार होत असल्याने ज्या भागात हे गवत पोहोचले तेथे २0 ते ३0 टक्के सर्दीचे प्रमाण वाढले असून, त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. दीड ते दोन फुटांपर्यंत वाढणार्‍या वनस्पतीची फुले पांढरी असतात. पाऊस जास्त झाल्यास या गवताची वाढ कमी होते तथापि, कमी पावसात मात्र या गवताची वाढ वेगाने होते. त्याचा फुलोरा वार्‍याने एका शेतातून दुसर्‍या शेतात किंवा दुसर्‍या जागी जात असल्याने या वनस्पतीचा प्रसार झाला आहे. सर्वांसाठीच घातक असलेल्या या वनस्पतीचे निर्मूलन करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी मेक्सिकन बिटल या भुंग्याचा प्रयोग केला आहे. जबलपूर येथून हे भुंगे आणण्यात आले असून, हा भुंगा या वनस्पतीची पाने व फुले खात असल्याने या वनस्पतीच्या वाढीचा वेग कमी होतो. तसेच या झाडाला उपटून जाळल्यानेही निर्मूलन करता येते. या कृषी विद्यापीठातर्फे विद्यापीठाच्या विदर्भातील प्रक्षेत्रावरील या वनस्पतीचे निर्मूलन करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.