शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

वातावरणातील कार्बन घटविण्याचे उपकरण !

By admin | Updated: June 27, 2017 22:25 IST

पर्यावरण समतोल आणि अलीकडील वैश्विक तापमानवाढीमुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहेत.

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 27 - पर्यावरण समतोल आणि अलीकडील वैश्विक तापमानवाढीमुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे वाहनांची संख्याही अमर्याद झाली असून, वाहनांच्या धुरातून मोठ्या प्रमाणावर कार्बन वायूचे वातावरणात उत्सर्जन होत असून, त्यामुळे आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी ए. जी. पाटील तंत्रनिकेतनच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी वाहनांच्या धुरातील कार्बनचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे संशोधन प्रकल्प तयार केला आहे. यांत्रिकी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षातील सौरभ क्षीरसागर, नागेश कोळी, अमित क्षीरसागर, निखिल होनखांबे व चनबसू कोरे या विद्यार्थ्यांनी काळाची गरज ओळखून प्रा. एस. के. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प तयार केला आहे. वाहनांमधून बाहेर पडणारा धूर एअर फिल्टरच्या माध्यमातून स्वच्छ केला जातो. या धुरातील प्रदुषित हवा आणि धुलीकण काढून घेतले जातात. ती हवा उपकरणाच्या एका विशिष्ट कप्प्यात साठवून ठेवली जाते. त्यानंतर पाणी आणि रसायनांच्या चेंबरमध्ये ती सोडण्यात येते त्यातील कार्बन आणि हवेचे पृथ:करण केले जाते. कार्बन ठेऊन हवा बाहेर सोडली जाते. यामधुळे वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरातील ७० टक्के कार्बनचे प्रमाण घटते, असे या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाव्दारे सिध्द केले आहे. या यशस्वी प्रकल्पाबद्दल विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ए. जी. पाटील, सचिव एस. ए. पाटील, कॅम्पस डायरेक्टर व प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले, उपप्राचार्य जे. एम. जाकेटिया, विभागप्रमुख एन. डी. मुढे यांनी अभिनंदन केले आहे.उपकरणाचा उपयोग असाचौकांमध्ये सिग्नल चालू असताना वाहनं थांबतात; पण त्यांचे इजिन सुरूच असते. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात धुर सोडला जातो. हे उपकरण जर चौकातील दुभाजकात स्थापित केले तर प्रदुषित हवा ते शोषून घेते आणि ती शुध्द केली जाते. औद्योगिक क्षेत्रात कारखान्यांच्या चिमणीव्दारे धूर बाहेर पडून प्रदुषण होते; पण चिमणीतील धूर या उपकरणातून सोडला तर धुरातील कार्बनचे प्रमाण कमी होते.