शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

रत्नागिरीजवळ झायलो कारला अपघात, ७ ठार

By admin | Updated: February 8, 2017 13:02 IST

मुंबई - गोवा महामार्गावर खानू येथे भरधाव वेगाने जाणारी झायलो कार झाडावर आपटून झालेल्या अपघातात ७ जण ठार झाले.

ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. ८ -  झायलो कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ७ जण जागीच ठार झाले, तर एक जखमी झाला. मुंबई-गोवा महामार्गावरील खानू मठ येथे आज बुधवारी सकाळी ७.३० वाजण्याचा सुमारास हा अपघात झाला. मृत्यूमुखी पडलेले सर्व तरुण पार्ले मुंबई येथील आहेत.
पार्ले येथे राहणारे प्रशांत गुरव यांची बहीण सावंतवाडी येथे राहत असून, तिच्याकडे जाण्यासाठी रात्री १ वाजण्याचा सुमारास प्रशांत आपल्या सात मित्रांसोबत निघाला. हे सर्वजण झायलो (एमएच-०६ / एएस-६२९१) कारमधून मुंबईहून निघाले.  सकाळी ७.३० च्या सुमारास खानू मठ येथे त्यांची भरधाव वेगातील गाडी रस्त्यालगतच्या झाडावर जोरदार आदळली.
या अपघातात मयूर वेळणेकर, प्रशांत गुरव, सचिन सावंत, अक्षय केरकर, निहाल कोटीयन, वैभव मनवे, केदार तोडणकर हे जागीच ठार झाले, तर अभिषेक कांबळी यामध्ये जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी प्रथम पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते.  नंतर त्याला रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. अपघाताची खबर मिळताच खानू येथील ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना मदतीचा हात दिला.  या अपघाताची नोंद ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
 
गाडी पूर्णपणे चेपली गेली
गाडीचा टप पूर्णपणे चेपला गेला होता. त्यामुळे झाडावर आदळण्यापूर्वी गाडी पलटी झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.