शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

रत्नागिरीजवळ झायलो कारला अपघात, ७ ठार

By admin | Updated: February 8, 2017 13:02 IST

मुंबई - गोवा महामार्गावर खानू येथे भरधाव वेगाने जाणारी झायलो कार झाडावर आपटून झालेल्या अपघातात ७ जण ठार झाले.

ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. ८ -  झायलो कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ७ जण जागीच ठार झाले, तर एक जखमी झाला. मुंबई-गोवा महामार्गावरील खानू मठ येथे आज बुधवारी सकाळी ७.३० वाजण्याचा सुमारास हा अपघात झाला. मृत्यूमुखी पडलेले सर्व तरुण पार्ले मुंबई येथील आहेत.
पार्ले येथे राहणारे प्रशांत गुरव यांची बहीण सावंतवाडी येथे राहत असून, तिच्याकडे जाण्यासाठी रात्री १ वाजण्याचा सुमारास प्रशांत आपल्या सात मित्रांसोबत निघाला. हे सर्वजण झायलो (एमएच-०६ / एएस-६२९१) कारमधून मुंबईहून निघाले.  सकाळी ७.३० च्या सुमारास खानू मठ येथे त्यांची भरधाव वेगातील गाडी रस्त्यालगतच्या झाडावर जोरदार आदळली.
या अपघातात मयूर वेळणेकर, प्रशांत गुरव, सचिन सावंत, अक्षय केरकर, निहाल कोटीयन, वैभव मनवे, केदार तोडणकर हे जागीच ठार झाले, तर अभिषेक कांबळी यामध्ये जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी प्रथम पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते.  नंतर त्याला रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. अपघाताची खबर मिळताच खानू येथील ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना मदतीचा हात दिला.  या अपघाताची नोंद ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
 
गाडी पूर्णपणे चेपली गेली
गाडीचा टप पूर्णपणे चेपला गेला होता. त्यामुळे झाडावर आदळण्यापूर्वी गाडी पलटी झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.