शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

दरडोई उत्पन्न वाढले, पण आदिवासी अजूनही उपेक्षितच; सुधीर मुनगंटीवार यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 02:17 IST

राज्यातील ३२ लाख निराधारांसाठी वर्षाला ५ हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

- अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न वाढले, जीएसडीपीमध्ये आपण इतर राज्यांच्या पुढे गेलो, मात्र दुसरीकडे भामरागडचे आदिवासी आजही कौलाच्या घरात आणि पत्र्याच्या झोपडीत रहातात, अशी खंत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. राज्यातील ३२ लाख निराधारांसाठी वर्षाला ५ हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.आजही कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २१,००० हजार रुपये असल्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी निराधार हे तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारत असतात, म्हणून मी या लोकांचे मानधन ६०० वरुन १२०० रुपये केले आहे. दिव्यांगांना घर देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. सातव्या वेतन आयोगामुळे राज्याच्या तिजोरीवर २४ हजार कोटींचा बोजा पडला, म्हणून २० हजार कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर करावा लागला, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.अर्थसंकल्पातील घोषणांसाठी पैसा कोठून येणार?२७ फेब्रुवारी रोजी जेव्हा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता, त्याचवेळी या घोषणांची तयारी केली होती. मात्र आचारसंहितेमुळे त्यावेळी जाहीर केले नाही. राज्याचे उत्पन्न आज सव्वातीन लाख कोटी रुपयांवर गेले आहे. त्यामुळे निधीची कमतरता नाही.निवडणूक डोळ्यापुढे ठेवून धनगर समाजासाठी १ हजार कोटीची तरतूद केलीे. याआधी हे का करावे वाटले नाही का? सरकार निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आम्ही निवडणुकांना आमच्या कामाचे बाय प्रॉडक्ट मानतो. आम्ही एलबीटी माफ केला, टोल माफ केला, मराठा आरक्षण दिले, हे सगळे निर्णय काही फक्त निवडणुकांसाठी नव्हते. 

राज्यावर सव्वा चार लाख कोटींचे कर्ज आहे. ऋण काढून सण करण्याचा हा प्रकार नाही का?नाही. कारण कोणतेही कर्ज मोजण्याची पध्दत असते. माणसाच्या शरीरातील रक्त आपण हिमोग्लोबिन किती आहे असे मोजतो, ते लिटरमध्ये मोजत नाही. तसेच राज्यावरील ऋणभार मोजण्याची पध्दत आहे. २००४ साली हा ऋणभार २८ टक्के होता, तो आता १५ टक्के झाला आहे आणि तो मर्यादेच्या आत आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार