शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

उमेदवारांनो, विजय असू द्या फटाकेमुक्त..!

By admin | Updated: October 16, 2014 22:51 IST

‘अंनिस’ करणार आवाहन : पर्यावरणपूरक दिवाळीच्या दिशेनेही विविध उपक्रमांची आखणी

सातारा : तीनच दिवसांत मतदानयंत्रे बोलू लागतील आणि जय-पराजय निश्चित होईल. त्यामुळे दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी होण्याची शक्यता सर्वांनीच गृहीत धरली आहे. मात्र, निवडणुकीतील विजय फटाकेमुक्त करून पर्यावरण संतुलनात वाटा उचलून आपण जबाबदार लोकप्रतिनिधी असल्याचे संकेत द्यावेत, असे आवाहन जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारांना भेटून करण्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विवेक वाहिनीने ठरविले आहे. रविवारी (दि. १९) मतमोजणीचा दिवस आहे. दिवाळीही तोंडावर आहे. परंतु निवडणुकीत विजय निश्चित होण्यापूर्वीच प्रचारातील पदयात्रांपासून सर्वत्र फटाके फोडले गेल्याचे जिल्ह्यातील नागरिकांनी पाहिले आहे. ज्या भागातून नेत्याची पदयात्रा जाणार असेल, तेथील कार्यकर्ते फटाक्यांची सर रस्त्यावर पसरूनच नेत्याची वाट पाहत असत. निवडणुकीपूर्वी इतके फटाके फुटले, तर निकालानंतर किती फुटतील, याचा अंदाजच न केलेला बरा! या पार्श्वभूमीवर, प्रदूषणमुक्तीचा हेतू मनात ठेवून विजयी उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना आधीच आवाहन करावे आणि फटाके फोडण्यापासून परावृत्त करावे, अशी ‘अंनिस’ची भूमिका आहे. येत्या दोन दिवसांत सर्व प्रमुख उमेदवारांना भेटून ही भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. निवडणूक निकालांनंतर तीनच दिवसांनी दिवाळी येत आहे. त्यावेळीही भरपूर प्रमाणात फटाके फोडले जातील. वातावरणातील बदलांच्या पार्श्वभूमीवर मानवनिर्मित प्रदूषणात भर पडू नये म्हणून निवडणूक निकाल आणि दिवाळी डोळ््यांसमोर ठेवून ‘अंनिस’ आणि विवेक वाहिनीने अनेक उपक्रम प्रस्तावित केले आहेत. (प्रतिनिधी) बालगोपाळांना आवाहन ‘अंनिस’तर्फे दरवर्षी विविध शाळांमध्ये फटाकेमुक्त दिवाळीचे आवाहन करणारे पत्रक वाटले जाते. यावर्षी फटाकेमुक्तीचे आवाहन करणारे संदेश शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, अभिनेता नाना पाटेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश आमटे, डॉ. नरेंद्र जाधव यांनी या पत्रकावर केले आहे. या पत्रकाच्या तळाशी एक स्लिप असेल. ‘मी आतापर्यंत किती रुपयांचे फटाके फोडत होतो आणि यावर्षी त्यात किती कपात करेन,’ याबाबतचे हे प्रतिज्ञापत्र असेल. पालकांशी बोलून विद्यार्थ्यांनी ते भरायचे आहे. गेल्या वर्षी या उपक्रमातून बारा ते पंधरा कोटींची बचत झाल्याचे स्पष्ट झाले होते. यावर्षी अशी दोन लाख पत्रके काढण्यात आली असून, ती वाटण्यास प्रारंभ झाला आहे. शिक्षकाचा अभिनव उपक्रम साताऱ्यातील शिक्षक मोहन बेदरकर यांनी फटाक्यांचे दुष्परिणाम कवितेद्वारे मांडले असून, त्याचे एक सचित्र पत्रक तयार केले आहे. रोटरी क्लबच्या सहकार्याने या पत्रकाच्या दहा हजार प्रती तयार करण्यात आल्या असून, साताऱ्यातील शाळाशाळांमध्ये त्यांचे वाटप सुरू झाले आहे. परीक्षा संपण्यापूर्वी जास्तीत जास्त मुलांच्या हातात हे पत्रक पोहोचावे, असा बेदरकर यांचा प्रयत्न आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशेषत: व्यापारीवर्गाकडून मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात. लक्ष्मीपूजनापूर्वी ‘अंनिस’चे पुण्यातील कार्यकर्ते दरवर्षी लक्ष्मी रस्त्यावरून रॅली काढतात आणि कमीत कमी फटाके फोडण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना करतात. याच धर्तीवर साताऱ्यातही रॅली काढण्याचा प्रयत्न सातारा शाखेकडून यावर्षी सुरू आहे. - डॉ. हमीद दाभोलकर फटाके नको, पुस्तके घ्या! ‘अंनिस’च्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शाखेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही फटाक्यांच्या स्टॉलजवळ पुस्तकांचा स्टॉल सुरू करण्यात येणार आहे. फटाक्यांना पुस्तकांचा पर्याय देण्याचा हा अभिनव उपक्रम अन्य शाखांतर्फेही सुरू करण्याचा मानस आहे.