शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
IPL 2025 Playoffs Schedule : हार्दिकला 'एक्स' भेटणार! पंजाब-बंगळुरु थेट फायनल गाठण्यासाठी भिडणार
3
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
4
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
5
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
6
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
7
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
8
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
9
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
10
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
11
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
12
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
13
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
14
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
15
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
16
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
17
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
18
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
19
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
20
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले

कॅन्सरमुळे दरवर्षी १० लाख रुग्णांचा मृत्यू

By admin | Updated: May 26, 2016 20:34 IST

भारतात दरवर्षी कॅन्सरमुळे १० लाख रुग्णांचा मृत्यू होतो.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 26- भारतात दरवर्षी कॅन्सरमुळे १० लाख रुग्णांचा मृत्यू होतो. देशातील इतर राज्याच्या तुलनेत अकाली मृत्यूमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा लागत असून उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. मध्यभारताचा विचार केल्यास विदर्भात सर्वात जास्त कॅन्सरचे रुग्ण असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अभ्यासातून पुढे आले आहे. यात पुरुषांमध्ये आढळून येणारा ५० टक्के कॅन्सर तर महिलांमध्ये आढळून येणारा २० टक्के कॅन्सर हा तंबाखूजन्य पदार्थांच्यावापरांमुळे होत असल्याची माहिती, वॉईस आॅफ टोबॅको व्हिक्टीमचे संयोजक डॉ. अभिषेक वैद्य यांनी दिली. जागतिक तबाखूविरोधी दिनानिमित्त आयोजित विविध कार्यकमांची माहिती देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटलने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कॅन्सर रिलीफ सोसायटीचे सचिव अशोक क्रिपलानी, हॉस्पिटलचे सहायक संचालक डॉ. बी.के. शर्मा, डॉ. अंजली कोल्हे, डॉ. सरस्वती मृदुला, डॉ. टी.पी.सिंग आदी उपस्थित होते. डॉ. वैद्य म्हणाले, भारतात कॅन्सरसारखा जीवघेणा आजार झपाट्याने वाढत आहे. २०१२ मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात उत्तर प्रदेशात १७,५९१,१११ तर बिहारमध्ये १४,६६१,३६७ रुग्णांचा कॅन्सरमुळे अकाली मृत्यू झाला. - ३१.४ टक्के लोकांना तंबाखूचे व्यसनदेशात ३४.६ टक्के लोक तंबाखूचे सेवन करतात. यात सिगारेट ओढणारे ५.७ टक्के, बीडी पिणारे ९.२ टक्के तर तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांची संख्या २५.९ टक्के आहे. महाराष्ट्रात हेच प्रमाण ३१.४ टक्के आहे. ३.४ टक्के लोक सिगारेट पितात, २.७ टक्के बीडी ओढतात तर २७.६ टक्के मुले तंबाखूजन्य पदार्थ खातात. मध्य भारताचा जर विचार केला तर छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, ओरिसाच्या तुलनेत विदर्भात कॅन्सरचे सर्वात जास्त रुग्ण आढळून येतात. यात तोंड, जबडा, आहार नलिका व फुफ्फुसाच्या कॅन्सरचे प्रमाण मोठे आहे.