शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
4
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
5
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
6
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
7
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
8
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
9
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
10
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
11
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
12
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
13
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
14
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
15
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
16
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
17
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
18
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
19
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
20
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

कॅन्सरमुळे दरवर्षी १० लाख रुग्णांचा मृत्यू

By admin | Updated: May 26, 2016 20:34 IST

भारतात दरवर्षी कॅन्सरमुळे १० लाख रुग्णांचा मृत्यू होतो.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 26- भारतात दरवर्षी कॅन्सरमुळे १० लाख रुग्णांचा मृत्यू होतो. देशातील इतर राज्याच्या तुलनेत अकाली मृत्यूमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा लागत असून उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. मध्यभारताचा विचार केल्यास विदर्भात सर्वात जास्त कॅन्सरचे रुग्ण असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अभ्यासातून पुढे आले आहे. यात पुरुषांमध्ये आढळून येणारा ५० टक्के कॅन्सर तर महिलांमध्ये आढळून येणारा २० टक्के कॅन्सर हा तंबाखूजन्य पदार्थांच्यावापरांमुळे होत असल्याची माहिती, वॉईस आॅफ टोबॅको व्हिक्टीमचे संयोजक डॉ. अभिषेक वैद्य यांनी दिली. जागतिक तबाखूविरोधी दिनानिमित्त आयोजित विविध कार्यकमांची माहिती देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटलने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कॅन्सर रिलीफ सोसायटीचे सचिव अशोक क्रिपलानी, हॉस्पिटलचे सहायक संचालक डॉ. बी.के. शर्मा, डॉ. अंजली कोल्हे, डॉ. सरस्वती मृदुला, डॉ. टी.पी.सिंग आदी उपस्थित होते. डॉ. वैद्य म्हणाले, भारतात कॅन्सरसारखा जीवघेणा आजार झपाट्याने वाढत आहे. २०१२ मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात उत्तर प्रदेशात १७,५९१,१११ तर बिहारमध्ये १४,६६१,३६७ रुग्णांचा कॅन्सरमुळे अकाली मृत्यू झाला. - ३१.४ टक्के लोकांना तंबाखूचे व्यसनदेशात ३४.६ टक्के लोक तंबाखूचे सेवन करतात. यात सिगारेट ओढणारे ५.७ टक्के, बीडी पिणारे ९.२ टक्के तर तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांची संख्या २५.९ टक्के आहे. महाराष्ट्रात हेच प्रमाण ३१.४ टक्के आहे. ३.४ टक्के लोक सिगारेट पितात, २.७ टक्के बीडी ओढतात तर २७.६ टक्के मुले तंबाखूजन्य पदार्थ खातात. मध्य भारताचा जर विचार केला तर छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, ओरिसाच्या तुलनेत विदर्भात कॅन्सरचे सर्वात जास्त रुग्ण आढळून येतात. यात तोंड, जबडा, आहार नलिका व फुफ्फुसाच्या कॅन्सरचे प्रमाण मोठे आहे.