शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

वादग्रस्त कृषी परीक्षा रद्द

By admin | Updated: January 28, 2017 03:40 IST

गुणवत्ता यादीत झालेला गोंधळ आणि परीक्षेवर घेण्यात आलेले गंभीर आक्षेप, यामुळे अखेर कृषी सहायक भरती परीक्षा व निवड यादी रद्द

पुणे : गुणवत्ता यादीत झालेला गोंधळ आणि परीक्षेवर घेण्यात आलेले गंभीर आक्षेप, यामुळे अखेर कृषी सहायक भरती परीक्षा व निवड यादी रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. कृषी आयुक्तालयाच्या वतीने कृषी सहायक पदांच्या ७३० जागांच्या भरतीसाठी डिसेंबर २०१५मध्ये जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार, राज्यातील आठ विभागांत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ६ आॅगस्ट २०१६ रोजी परीक्षा घण्यात आली. परीक्षेचा निकाल ६ सप्टेंबर २०१६ रोजी लावण्यात आला. मात्र, त्यावरून प्रचंड वादंग निर्माण झाले. गुणवत्ता यादीत एकाच उमेदवाराची दोन विभागांतून निवड, कट आॅफ गुण व प्रतीक्षायादीतील उमेदवारांच्या गुणांमध्ये तफावत असणे, वयाच्या निकषांत न बसणाऱ्या उमेदवारांची केलेली निवड, असे अनेकप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते.  या पार्श्वभूमीवर हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे परीक्षार्थींनी चार महिन्यांपासून उभारलेल्या लढ्याला यश मिळाले, असे आंदोलनकर्ता परीक्षार्थी स्वप्निल देवरे याने सांगितले. (प्रतिनिधी)