शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
4
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
5
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
6
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
7
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
8
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
9
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
10
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
12
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
13
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी घेत संपवले जीवन; पालकांचा गंभीर आरोप
14
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
15
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
16
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
17
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
18
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
19
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
20
Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य
Daily Top 2Weekly Top 5

एमएससीआयटी संदर्भातील अध्यादेश २४ तासात रद्द करण्याची नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 11:37 IST

Government ordinance News मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दखल घेत २६ च्या पत्राला स्थगिती देत नवा आदेश निर्गमित केला.

ठळक मुद्देआचारसंहिता असताना एमएचसीईटीसंदर्भात आदेश काढला.मात्र या आदेशाची माहिती खुद्द मंत्र्यांनाही नव्हती. हा आदेश २४ तासात रद्द करण्याची वेळ सरकारवर आली.

- राजेश शेगोकार

अकोला : महाविकास आघाडीचे सरकार वर्षपूर्तीचा आनंद साजरा करत असतानाच अधिकाऱ्यांची मनमानी मात्र पुन्हा एकदा समोर आली आहे. आचारसंहिता असताना एमएचसीईटीसंदर्भात आदेश काढला; मात्र या आदेशाची माहिती खुद्द मंत्र्यांनाही नव्हती. ही धक्कादायक बाब राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत आदेश रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

संगणक अर्हता (एमएससीआयटी) नसतानाही राज्य शासकीय सेवेतील वर्ग अ, ब आणि क मधील अनेक कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी १३ डिसेंबर २०१७ या मुदतीत संगणक अर्हता प्राप्त केली नाही त्यांच्याकडून वेतनवाढीची रक्कम वसूल करण्याचा आदेश २६ नोव्हेंबर रोजी काढण्यात आला होता. हा आदेश २४ तासात रद्द करण्याची वेळ सरकारवर आली. ज्या अधिकारी/कर्मचाऱ्यांनी विहित मुदतीत संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर केले नाही, अशा अधिकारी/कर्मचारी यांची वेतनवाढ रोखण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला हाेता. ज्या अधिकारी/कर्मचाऱ्यांनी विहित मुदतीत संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर केले नाही, त्यांची वेतनवाढ रोखणे आवश्यक होते; परंतु ती रोखण्यात न आल्यामुळे अतिप्रदान करण्यात आलेल्या वेतनाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली होती; परंतु २६ नाेव्हेंबर राेजी शासनाने पुन्हा आदेश काढून अशा कर्मचाऱ्यांकडून अतिप्रदान करण्यात आलेले वेतन वसूल करण्याचा आदेश दिला होता. तसेच संगणक अर्हता प्राप्त करण्याची मुदत १३ डिसेंबर २०१७ असल्याचे स्पष्ट केले. आचारसंहिता सुरू असताना अशा प्रकारे आदेश काढणे चुकीचे असल्याची बाब ना. जयंत पाटील यांनी निदर्शनास आणून दिल्यावर २७ नोव्हेंबर रोजी नवा आदेश काढून वसुलीसाठी स्थगिती दिली.

 

जबाबदार कोण, चौकशीचा आदेश

२६ नोव्हेंबर रोजी काढलेल्या आदेशाची प्रत जयंत पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी सदर प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना व्हाॅट्स ॲप केली. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दखल घेत २६ च्या पत्राला स्थगिती देत नवा आदेश निर्गमित केला, असे स्पष्ट करत या प्रकाराला जबाबदार कोण आहे, याची चौकशी सुरू केल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.

टॅग्स :AkolaअकोलाGovernmentसरकारJayant Patilजयंत पाटील