शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

एमएससीआयटी संदर्भातील अध्यादेश २४ तासात रद्द करण्याची नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 11:37 IST

Government ordinance News मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दखल घेत २६ च्या पत्राला स्थगिती देत नवा आदेश निर्गमित केला.

ठळक मुद्देआचारसंहिता असताना एमएचसीईटीसंदर्भात आदेश काढला.मात्र या आदेशाची माहिती खुद्द मंत्र्यांनाही नव्हती. हा आदेश २४ तासात रद्द करण्याची वेळ सरकारवर आली.

- राजेश शेगोकार

अकोला : महाविकास आघाडीचे सरकार वर्षपूर्तीचा आनंद साजरा करत असतानाच अधिकाऱ्यांची मनमानी मात्र पुन्हा एकदा समोर आली आहे. आचारसंहिता असताना एमएचसीईटीसंदर्भात आदेश काढला; मात्र या आदेशाची माहिती खुद्द मंत्र्यांनाही नव्हती. ही धक्कादायक बाब राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत आदेश रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

संगणक अर्हता (एमएससीआयटी) नसतानाही राज्य शासकीय सेवेतील वर्ग अ, ब आणि क मधील अनेक कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी १३ डिसेंबर २०१७ या मुदतीत संगणक अर्हता प्राप्त केली नाही त्यांच्याकडून वेतनवाढीची रक्कम वसूल करण्याचा आदेश २६ नोव्हेंबर रोजी काढण्यात आला होता. हा आदेश २४ तासात रद्द करण्याची वेळ सरकारवर आली. ज्या अधिकारी/कर्मचाऱ्यांनी विहित मुदतीत संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर केले नाही, अशा अधिकारी/कर्मचारी यांची वेतनवाढ रोखण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला हाेता. ज्या अधिकारी/कर्मचाऱ्यांनी विहित मुदतीत संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर केले नाही, त्यांची वेतनवाढ रोखणे आवश्यक होते; परंतु ती रोखण्यात न आल्यामुळे अतिप्रदान करण्यात आलेल्या वेतनाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली होती; परंतु २६ नाेव्हेंबर राेजी शासनाने पुन्हा आदेश काढून अशा कर्मचाऱ्यांकडून अतिप्रदान करण्यात आलेले वेतन वसूल करण्याचा आदेश दिला होता. तसेच संगणक अर्हता प्राप्त करण्याची मुदत १३ डिसेंबर २०१७ असल्याचे स्पष्ट केले. आचारसंहिता सुरू असताना अशा प्रकारे आदेश काढणे चुकीचे असल्याची बाब ना. जयंत पाटील यांनी निदर्शनास आणून दिल्यावर २७ नोव्हेंबर रोजी नवा आदेश काढून वसुलीसाठी स्थगिती दिली.

 

जबाबदार कोण, चौकशीचा आदेश

२६ नोव्हेंबर रोजी काढलेल्या आदेशाची प्रत जयंत पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी सदर प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना व्हाॅट्स ॲप केली. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दखल घेत २६ च्या पत्राला स्थगिती देत नवा आदेश निर्गमित केला, असे स्पष्ट करत या प्रकाराला जबाबदार कोण आहे, याची चौकशी सुरू केल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.

टॅग्स :AkolaअकोलाGovernmentसरकारJayant Patilजयंत पाटील