शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

कॅमेऱ्यातून ‘अनोळखी’ चेहऱ्यांमधला आनंद शोधणारा अवलिया !

By admin | Updated: October 3, 2016 09:28 IST

दिल्लीतील तरुण जगभरातील रस्त्यांवर अनोळखी चेहऱ्यांमागील आनंद टिपतोय. माणसा-माणसातलं ‘अनोळखी’ नात्याचा दुरावा कमी करुन प्रत्येक चेहऱ्यावर हसू रुजवतोय

स्नेहा मोरे / ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - रस्त्याने चालताना कुणी आपल्याकडे पाहिलं तर एक क्षण आपण थबकतो...आपल्याला त्या ‘अनोळखी’ व्यक्तीबद्दल संशय वाटतो. त्यात कुणी आपल्याला पाहून स्माईल केल तरं त्या क्षणी बरेचदा आपल्याला त्या व्यक्तीची ओळखच आठवत नाही..पण दिल्लीतील तरुण जगभरातील रस्त्यांवर अनोळखी चेहऱ्यांमागील आनंद टिपतोय. माणसा-माणसातलं ‘अनोळखी’ नात्याचा दुरावा कमी करुन प्रत्येक चेहऱ्यावर हसू रुजवतोय. 
 
दिल्लाचा उत्कर्ष नारंग हा एका खासगी कंपनी प्रोडक्शन मॅनेजर आहे. मात्र फोटोग्राफीच्या छंदातून आपली नोकरी सांभाळत हा आगळावेगळा प्रोजेक्ट तो राबवित आहे. १ जुलै २०१६ मध्ये कॅमेऱ्याच्या डोळ्यांतून अनोळखी व्यक्तींशी नातं जोडण्यासं सुरुवात केली, आणि २०१७ मध्ये जुलै महिन्यात पहिल्या दिवशी हा प्रोजेक्ट पूर्णत्त्वास येईल. 
 
या आगळ्यावेगळ्या प्रवासाविषयी उत्कर्ष सांगतो की, या ३६५ दिवसांच्या प्रवासापैकी काही टप्पा पूर्ण झालाय, या दरम्यान खूप वेगळा अनुभव गाठीशी आलाय. म्हणजे जगभरातील विविध प्रांताची, भाषेची, धर्म-जातीची माणसं मला भेटताहेत. त्यांच आणि माझं रक्ताचं नातं नाही, पण त्या अनोळखी चेहऱ्याशी अचानक कॅमेरा संवाद साधू लागतो. अगदी काही सेंकदात ही माणसं माझ्याशी जन्मोजन्मीचं नात असल्यासारखं बोलतात आपली सुख-दु:ख शेअर करतात. त्यावेळी शाळा, कॉलेजमध्ये अगदी मार्क्स मिळवून जेवढा आनंद झाला नाही, तेवढा आनंद होतो. 
 
या प्रोजेक्टच्या मागचं खरंखुरं गुपित उलगडताना उत्कर्ष म्हणतो की, या जगात अनेक सुंदर गोष्टी आहेत.त्यांना फक्त मी शोधायची गरज आहे. तुम्हाला जे करताना समाधान मिळतयं, तो खरा आनंद...आपण कदाचित पैशांनी श्रीमंत होऊसुद्धा, पण एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणणं हीच खरी श्रीमंती. आपण टेक्नोलॉजी आणि काही भौतिक सुखांमुळे ही खरी मूल्य विसरतोय, त्या सगळ््या मूल्यांची आठवण करुन देण्यासाठी ही छोटीशी धडपड.. 
 
उत्कर्षच्या या ‘प्रोजेक्ट हॅप्पीनेस’चा प्रवास तुम्ही त्याच्यासोबत करु शकता. फेसबुकवरील त्याच्या ‘ Infinito Photography’ या पेजला भेट द्या..