शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

राज्य विद्युत निर्मिती कंपनीच्या कारभारावर कॅगचे ताशेरे

By अतुल कुलकर्णी | Updated: July 21, 2018 03:33 IST

कोराडी, चंद्रपूर, खापरखेडा, भुसावळ आणि परळी या पाच वीज निर्मिती प्रकल्पांची नियोजित किंमत २५,०४८ कोटी अपेक्षित असताना या प्रकल्पांचे काम सुरू झाले

नागपूर : कोराडी, चंद्रपूर, खापरखेडा, भुसावळ आणि परळी या पाच वीज निर्मिती प्रकल्पांची नियोजित किंमत २५,०४८ कोटी अपेक्षित असताना या प्रकल्पांचे काम सुरू झाले तेव्हा त्याची किंमत ९९६४ कोटींनी वाढून ती ३५,०१२ कोटींवर गेल्याची माहिती भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी आपल्या अहवालात मांडली आहे. वीज निर्मिती कंपनीच्या अनेक चुकीच्या गोष्टी कॅगने आपल्या अहवालातून उजेडात आणल्या आहेत. त्यामुळे वीज कंपन्यांचा कारभार किती आणि कसा बेजबाबदारपणे केला जात आहे हे समोर आले आहे. कॅग आपल्या अहवालात पुढे म्हणते की, परळी येथे अतिरिक्त एककाचे बांधकाम पाण्याची कायमस्वरूपी सोय नसतानाही केले गेले जे समर्थनीय नव्हते. भुसावळ येथील प्रकल्प अहवालच सदोष होता, त्यात रेल्वे साईडिंग बांधण्याची तरतूदच केली नाही त्यामुळे त्याच्या अंमलबजावणीस विलंब झाल्याचेही समोर आणले आहे. कोराडी प्रकल्पात फ्ल्यू गॅस डिसल्फरायझेशन आणि ओझोनायझेशन संयंत्रे बसवली गेली नाहीत. कोणत्याही नव्या प्रकल्पाने १०० टक्के फ्लाय अ‍ॅश वापराचे उद्दिष्ट साध्य केले गेले नाही.राज्यातील अतिरिक्त वीज विचारात घेता विजेच्या वितरणाचे नियोजन केले गेले नाही परिणामी हजारो मेगावॅट विजेचे नुकसान झाल्याचे कॅगने समोर आणले आहे. ज्या एककांची किंमत कमी होती ती आधी पाठवायची होती व ज्या प्रकरणात विजेची आवश्यकता नाही आणि ज्यांची विद्युत निर्मिती किंमत जास्त आहे त्या एककांची विद्युत निर्मिती कमी करायची होती. पण ते केले गेले नाही. परिणामी, २०१२-१३ मध्ये निर्मितीचे नुकसान १४३ दशलक्ष युनिट होते ते २०१६-१७ मध्ये १७,३१३ दशलक्ष युनिटने नुकसान वाढले. त्यामुळे कंपनीच्या महसुलांचे नुकसान झाल्याचेही समोर आले आहे.

टॅग्स :electricityवीजNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८