शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

बुटीबोरी-सांगली व अमरावती-सुरत मार्ग चौपदरी

By admin | Updated: July 6, 2014 00:46 IST

बुटीबोरी ते सांगली आणि अमरावती ते सुरत हे मार्ग विदर्भाची हॉट लाईन आहे. येत्या काळात या दोन्ही मार्गाचे कॉक्रीटीकरणाच्या माध्यमातून चौपदरीकरण करण्यात येईल,

नितीन गडकरी यांची माहिती : दत्ता मेघे यांचा समर्थकांसह भाजपात प्रवेशवर्धा : बुटीबोरी ते सांगली आणि अमरावती ते सुरत हे मार्ग विदर्भाची हॉट लाईन आहे. येत्या काळात या दोन्ही मार्गाचे कॉक्रीटीकरणाच्या माध्यमातून चौपदरीकरण करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतुक व ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे केली.सावंगी (मेघे) येथील क्रीडा संकुलावर आयोजित प्रवेश मेळाव्यात विदर्भातील ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे, माजी आमदार सागर मेघे, समीर मेघे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. तत्पूर्वी दत्ता मेघे यांच्या हस्ते विदर्भातील हंसराज अहीर, रामदास तडस, नाना पटोले, संजय धोत्रे व अशोक नेते या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला. ना. गडकरी पुढे म्हणाले, विदर्भ विकासाला गती मिळावी. विदर्भात उद्योग उभे राहिले पाहिजे. रखडलेले १ लाख ८० हजारांचे प्रकल्प मार्गी लावायचे आहे. देशाचे महत्त्वाचे खाते आपणाकडे असून रेल्वे बोर्ड, विमान वाहतूक, रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली आहे. यामाध्यमातून विदर्भातील विकासाला चालना देण्याचे काम पुढील काळात होईल. यावेळी आ. फडणवीस म्हणाले, दत्ता मेघे यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे पक्ष बळकट झाला आहे. त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान होईल, असे स्पष्ट केले.माजी. खासदार दत्ता मेघे यांनी आपला कोणालाही व्यक्तीश: विरोध नाही. मात्र वर्धा जिल्हा काँग्रेसमुक्त करायचा आहे. यापुढे भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणाचा अवलंब करणार आहे. पक्षश्रेष्ठींचे आदेश प्रामामिकपणे मानणार आहे. विदर्भाचा विकास हेच आपले ध्येय असल्याचे सांगून पक्षाकडे कोणतीही अपेक्षा नसल्याचे पुन्हा एकवार स्पष्ट केले. व्यासपीठावर माजी खा. सुरेश वाघमारे, आ. दादाराव केचे, आ. किशोर सोले, आ. सुधाकर देशमुख, आ. विकास कुंभारे, आ. कृष्णा पोफळे, आ. विजय घोडमारे, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, माजी आमदार गिरीश गांधी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे,सागर मेघे, समीर मेघे, डॉ. पंकज भोयर, जि.प. सदस्य विलास कांबळे, मिलिंद भेंडे यांच्यासह अन्य मान्यवर विराजमान होते.(जिल्हा प्रतिनिधी)खासदारांनी केला वेगळ्या विदर्भाचा आवाज बुलंदविदर्भात शेतकरी आत्महत्या होताहेत. सिंचनाचे प्रश्न रेंगाळले आहे. बेरोजगारांचा प्रश्न यासह अनेक गंभीर प्रश्न आ वासून उभे आहेत. जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही, तोपर्यंत विदर्भाला न्याय मिळणार नाही. आता खऱ्या अर्थाने वेगळा विदर्भ करण्याची वेळ आली आहे, असा सूर काढत विदर्भातील खासदारांनी वेगळ्या विदर्भाचा आवाज बुलंद केला. भंडाराचे खासदार नाना पटोले यांनी वेगळ्या विदर्भाची भूमिका मांडत घोषणा दिली. त्यांच्या या मागणीला इतर खासदारांनीही बळ देत वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, अशी एकमुखी मागणी करीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या.