शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बुटीबोरी-सांगली व अमरावती-सुरत मार्ग चौपदरी

By admin | Updated: July 6, 2014 00:46 IST

बुटीबोरी ते सांगली आणि अमरावती ते सुरत हे मार्ग विदर्भाची हॉट लाईन आहे. येत्या काळात या दोन्ही मार्गाचे कॉक्रीटीकरणाच्या माध्यमातून चौपदरीकरण करण्यात येईल,

नितीन गडकरी यांची माहिती : दत्ता मेघे यांचा समर्थकांसह भाजपात प्रवेशवर्धा : बुटीबोरी ते सांगली आणि अमरावती ते सुरत हे मार्ग विदर्भाची हॉट लाईन आहे. येत्या काळात या दोन्ही मार्गाचे कॉक्रीटीकरणाच्या माध्यमातून चौपदरीकरण करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतुक व ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे केली.सावंगी (मेघे) येथील क्रीडा संकुलावर आयोजित प्रवेश मेळाव्यात विदर्भातील ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे, माजी आमदार सागर मेघे, समीर मेघे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. तत्पूर्वी दत्ता मेघे यांच्या हस्ते विदर्भातील हंसराज अहीर, रामदास तडस, नाना पटोले, संजय धोत्रे व अशोक नेते या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला. ना. गडकरी पुढे म्हणाले, विदर्भ विकासाला गती मिळावी. विदर्भात उद्योग उभे राहिले पाहिजे. रखडलेले १ लाख ८० हजारांचे प्रकल्प मार्गी लावायचे आहे. देशाचे महत्त्वाचे खाते आपणाकडे असून रेल्वे बोर्ड, विमान वाहतूक, रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली आहे. यामाध्यमातून विदर्भातील विकासाला चालना देण्याचे काम पुढील काळात होईल. यावेळी आ. फडणवीस म्हणाले, दत्ता मेघे यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे पक्ष बळकट झाला आहे. त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान होईल, असे स्पष्ट केले.माजी. खासदार दत्ता मेघे यांनी आपला कोणालाही व्यक्तीश: विरोध नाही. मात्र वर्धा जिल्हा काँग्रेसमुक्त करायचा आहे. यापुढे भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणाचा अवलंब करणार आहे. पक्षश्रेष्ठींचे आदेश प्रामामिकपणे मानणार आहे. विदर्भाचा विकास हेच आपले ध्येय असल्याचे सांगून पक्षाकडे कोणतीही अपेक्षा नसल्याचे पुन्हा एकवार स्पष्ट केले. व्यासपीठावर माजी खा. सुरेश वाघमारे, आ. दादाराव केचे, आ. किशोर सोले, आ. सुधाकर देशमुख, आ. विकास कुंभारे, आ. कृष्णा पोफळे, आ. विजय घोडमारे, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, माजी आमदार गिरीश गांधी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे,सागर मेघे, समीर मेघे, डॉ. पंकज भोयर, जि.प. सदस्य विलास कांबळे, मिलिंद भेंडे यांच्यासह अन्य मान्यवर विराजमान होते.(जिल्हा प्रतिनिधी)खासदारांनी केला वेगळ्या विदर्भाचा आवाज बुलंदविदर्भात शेतकरी आत्महत्या होताहेत. सिंचनाचे प्रश्न रेंगाळले आहे. बेरोजगारांचा प्रश्न यासह अनेक गंभीर प्रश्न आ वासून उभे आहेत. जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही, तोपर्यंत विदर्भाला न्याय मिळणार नाही. आता खऱ्या अर्थाने वेगळा विदर्भ करण्याची वेळ आली आहे, असा सूर काढत विदर्भातील खासदारांनी वेगळ्या विदर्भाचा आवाज बुलंद केला. भंडाराचे खासदार नाना पटोले यांनी वेगळ्या विदर्भाची भूमिका मांडत घोषणा दिली. त्यांच्या या मागणीला इतर खासदारांनीही बळ देत वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, अशी एकमुखी मागणी करीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या.