शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

औरंगाबादमध्ये बसस्थानकात लागलेल्या खाजगी बसेस कर्मचा-यांनी लावल्या पिटाळून, प्रवाशांचे प्रचंड हाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 11:04 IST

गोरगरीब आणि ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली एस.टी. बससेवा आज सकाळपासून ठप्प झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपामुळे  बसगाड्या बसस्थानकाबाहेर जाऊ देण्यात येत नाहीत. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

ठळक मुद्देमध्यवर्ती बसस्थानकात लावण्यात आलेल्या खाजगी बसेस एसटी कर्मचा-यांनी पिटाळून लावले.कर्मचा-यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने पहाटेपासूनच संपाचा परिणाम जाणवला. बसस्थानकांत बसगाड्यांच्या रांगा

औरंगाबाद : गोरगरीब आणि ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली एस.टी. बससेवा आज सकाळपासून ठप्प झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपामुळे  बसगाड्या बसस्थानकाबाहेर जाऊ देण्यात येत नाहीत. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.यातच मध्यवर्ती बसस्थानकात लावण्यात आलेल्या खाजगी बसेस एसटी कर्मचा-यांनी पिटाळून लावले.

एसटी कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाचे हत्यार उपसले. त्यास कर्मचा-यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने पहाटेपासूनच संपाचा परिणाम जाणवला. मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको बसस्थानकात सकाळपासूनच प्रवाशांचे हाल होत आहे. बहुतेक प्रवाशांना संपाची कल्पना नसल्याने त्यांनी चौकशी कक्षावर धाव घेत आहे. परंतु बससेवा बंद असल्याची माहिती देण्यात येत आहे. एखादी तरी बस मिळेल या आशेने प्रवासी धडपडत करीत आहे.बस फे-या रद्द झाल्याने शेकडो  प्रवासी तासनतास बसस्थानकात खोळंबले. 

कर्मचा-यांच्या संपामुळे दिवाळीसाठी गावी जाणा-या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.  बस  कधी जाणार? अशी विचारणा करीत प्रवासी एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी गर्दी करीत आहे. यामध्ये ज्येष्ठ प्रवासी,लहान मुले आणि विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत.

खाजगी वाहतुकदारांकडून लूटबसस्थानकात तासनतास थांबूनही बस जाणार नसल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी खाजगी बसचा रस्ता धरीत आहे. मध्यवर्ती बसस्थानकासमोर खाजगी बसच्या रांगा लागल्या आहेत. परंतु अशा परिस्थितीत खाजगी वाहतुकदारांनी जादा भाडे घेऊन प्रवाशांची आर्थिक लूट केली जात आहे. . एस.टी.कर्मचा-यांच्या संपामुळे नाईलाजाने प्रवाशांनी हा भुर्दंड सहन करून प्रवासाचा मार्ग धरत आहे.

शहर बससेवाही बंदशहर बससेवाही बंद पाडण्यात आली. त्यामुळे शहरवासीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहर बस बंद राहिल्याने रिक्षाचालकही प्रवाशांकडून जादा पैसे आकारत आहेत.

बसस्थानकांत बसगाड्यांच्या रांगासंपामुळे बसगाड्या बाहेर पडून देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे दोन्ही बसस्थानकांमध्ये बसगाड्यांच्या लांब रांगा लागल्या आहेत.