शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

नाशिकमध्ये जाळपोळ, 15 ते 20 एसटी बसेस जळून खाक

By admin | Updated: October 10, 2016 06:01 IST

तळेगाव-अंजनेरी (ता. त्र्यंबक) येथील बालिकेवर एका युवकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस येताच, या घटनेचे नाशिक परिसरात तीव्र पडसाद

पंधरा ते वीस एसटी बसेस जळून खाक नाशिक : तळेगाव-अंजनेरी (ता. त्र्यंबक) येथील बालिकेवर एका युवकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस येताच, या घटनेचे नाशिक परिसरात तीव्र पडसाद उमटले. जमावाने पोलिसांवर दगडफेक करत एस.टी. बसेस व इतर वाहने पेटवून दिली. त्यामुळे नाशिकहून जाणाºया महामार्गांवरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दगडफेकीत ३५ पोलीस जखमी झाले. रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी जाळपोळीचे सत्र सुरूच होते. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. शनिवारी सायंकाळी त्र्यंबक तालुक्यातील तळेगाव अंजनेरी येथील पाच वर्षीय बालिकेवर गावातीलच एका किशोरवयीन मुलाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच, त्यांनी मुलाला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. तर अल्पवयीन मुलीला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेचे वृत्त सोशल मीडियातून (पान २ वर) वाºयासारखे पसरताच, ठिकठिकाणी रात्रीपासूनच रास्ता रोको आंदोलन सुरू झाले. त्यामुळे राज्य व राष्टÑीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. रविवारी दुसºया दिवशीही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. नाशिक-त्र्यंबकरोडवरील तळेगाव-अंंजनेरी फाट्यावर शेकडो लोकांनी ठिय्या मांडला. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन अत्याचारित बालिकेच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, तिच्या कुटुंबीयांचीही भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. त्यानंतर तळेगाव येथील घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांना शांततेचे आवाहन केले. ‘झाला प्रकार दुर्दैवी असून, मी स्वत: पीडित मुलीची भेट घेऊन आलो, तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला आहे, बलात्कार झालेला नाही’ असे महाजन यांनी सांगितले. मात्र, पालकमंत्र्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. काहींनी पालकमंत्र्यांना धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान, त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक कार्यक्रमानिमित्त जात असताना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीही आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. स्थानिक नागरिकांनी त्यांच्याकडे झाल्या घटनेची माहिती देत पोलिसांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. खडसे यांनी आंदोलकांच्या भावनांशी सहमती दर्शवित, सरकार त्याची दखल घेईल, असे आश्वासन दिले व त्यानंतर ते त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाले. (प्रतिनिधी)

या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळाला भेट देऊन विचारपूस केली आहे. आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळावी, यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविला जाईल. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. - देवेंद्र फडणवीस,

मुख्यमंत्री त्र्यंबकेश्वरमधील घटनेला जबाबदार असलेल्या घटकाला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. लवकरात लवकर चार्जशिट भरून आरोपीला कठोर शिक्षा करू, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. शेवटी सरकारकडून याच अपेक्षा असतात, त्या आता पूर्ण झाल्या आहेत. मी लोकांचा संताप समजू शकतो. मात्र, आता कारवाई झाल्यानंतर संतापाला पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस