शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

राज्यातील बुलेट भू-संपादनाची डेडलाइन हुकणार! पालघरमधील ६३ गावे बाधित होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 03:39 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे पालघरमधील ७३ गावे बाधित होणार आहेत. यापैकी सद्य:स्थितीत केवळ ५० टक्के जमिनीचे संयुक्त मापन सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून अद्याप भू-संपादन बाकी आहे.

- महेश चेमटेडहाणू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे पालघरमधील ७३ गावे बाधित होणार आहेत. यापैकी सद्य:स्थितीत केवळ ५० टक्के जमिनीचे संयुक्त मापन सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून अद्याप भू-संपादन बाकी आहे. उर्वरित सुमारे ५० टक्के काम १२० दिवसांत करण्याची ‘डेडलाइन’ नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनपुढे आहे. मात्र ग्रामस्थ भूसंपादनास आडकाठी करीत असल्याने महाराष्ट्रातील बुलेट भू-संपादनाची ‘डेडलाइन’ हुकण्याची चिन्हे आहेत.मुंबईतील चार बुलेट स्थानकांसाठी पालघर जिल्ह्यात ७३, ठाणे २२, डहाणू २ आणि मुंबई उपनगरातील २ गावांचा समावेश आहे. यापैकी ठाणे जिल्ह्यात संयुक्त मापन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तर, पालघर जिल्ह्यातही ३८ गावांचे संयुक्त मापन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, अजूनही ३५ गावांचे सर्वेक्षण बाकी आहे.विरातन खुर्द येथील ग्रामस्थ मधुकर घरत यांनी सांगितले की, विरातन ग्रामपंचायत येथील जांभूळ पाडा, घरत पाडा येथील सुमारे ३० कुटुंबे बाधित होतील. आमचे ८ जणांचे कुटुंब आहे. सध्या सुमारे २५०० हजार स्क्वेअर फुटांचे घर आहे. भूसंपादनानंतर पदरी नेमके काय पडणार, हे स्पष्ट नसल्याने संभ्रम आहे. तर, विरातन खुर्द येथील सरपंच राजश्री किणे यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध असल्याचे सांगितले. डहाणूचे महापौर भरत राजपाल यांनी राजकीय विरोधासाठी प्रकल्पाला विरोध करण्यात येत असल्याचे मत व्यक्त केले. तर, ज्यांची जमीन बाधित होत आहे त्यांचा विरोध नाही. मात्र, भूसंपादन ही मोठी आणि वेळखाऊ प्रक्रिया असल्याचे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी सांगितले.सर्वांना मोबदलापालघर, डहाणू येथील ग्रामस्थांमध्ये जमिनीच्या मोबदल्यात काय मिळेल, याबाबत संभ्रम आहे. पालघरमधील केवळ ६० फूट जमीन प्रकल्पासाठी वापरण्यात येईल.गावकऱ्यांमधील संभ्रम दूर करण्यासाठी ज्यांच्या नावावर जमीन आहे किंवा जे पीक घेत आहे त्यांनाही मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन