शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

राज्यातील बुलेट भू-संपादनाची डेडलाइन हुकणार! पालघरमधील ६३ गावे बाधित होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 03:39 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे पालघरमधील ७३ गावे बाधित होणार आहेत. यापैकी सद्य:स्थितीत केवळ ५० टक्के जमिनीचे संयुक्त मापन सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून अद्याप भू-संपादन बाकी आहे.

- महेश चेमटेडहाणू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे पालघरमधील ७३ गावे बाधित होणार आहेत. यापैकी सद्य:स्थितीत केवळ ५० टक्के जमिनीचे संयुक्त मापन सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून अद्याप भू-संपादन बाकी आहे. उर्वरित सुमारे ५० टक्के काम १२० दिवसांत करण्याची ‘डेडलाइन’ नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनपुढे आहे. मात्र ग्रामस्थ भूसंपादनास आडकाठी करीत असल्याने महाराष्ट्रातील बुलेट भू-संपादनाची ‘डेडलाइन’ हुकण्याची चिन्हे आहेत.मुंबईतील चार बुलेट स्थानकांसाठी पालघर जिल्ह्यात ७३, ठाणे २२, डहाणू २ आणि मुंबई उपनगरातील २ गावांचा समावेश आहे. यापैकी ठाणे जिल्ह्यात संयुक्त मापन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तर, पालघर जिल्ह्यातही ३८ गावांचे संयुक्त मापन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, अजूनही ३५ गावांचे सर्वेक्षण बाकी आहे.विरातन खुर्द येथील ग्रामस्थ मधुकर घरत यांनी सांगितले की, विरातन ग्रामपंचायत येथील जांभूळ पाडा, घरत पाडा येथील सुमारे ३० कुटुंबे बाधित होतील. आमचे ८ जणांचे कुटुंब आहे. सध्या सुमारे २५०० हजार स्क्वेअर फुटांचे घर आहे. भूसंपादनानंतर पदरी नेमके काय पडणार, हे स्पष्ट नसल्याने संभ्रम आहे. तर, विरातन खुर्द येथील सरपंच राजश्री किणे यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध असल्याचे सांगितले. डहाणूचे महापौर भरत राजपाल यांनी राजकीय विरोधासाठी प्रकल्पाला विरोध करण्यात येत असल्याचे मत व्यक्त केले. तर, ज्यांची जमीन बाधित होत आहे त्यांचा विरोध नाही. मात्र, भूसंपादन ही मोठी आणि वेळखाऊ प्रक्रिया असल्याचे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी सांगितले.सर्वांना मोबदलापालघर, डहाणू येथील ग्रामस्थांमध्ये जमिनीच्या मोबदल्यात काय मिळेल, याबाबत संभ्रम आहे. पालघरमधील केवळ ६० फूट जमीन प्रकल्पासाठी वापरण्यात येईल.गावकऱ्यांमधील संभ्रम दूर करण्यासाठी ज्यांच्या नावावर जमीन आहे किंवा जे पीक घेत आहे त्यांनाही मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन