शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

बत्ती गुलचा कळव्याला सर्वाधिक फटका

By admin | Updated: August 3, 2016 03:21 IST

रविवारी जोरदार बरसलेल्या पावसाने शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा बराच वेळ खंडित झाला होता.

ठाणे : रविवारी जोरदार बरसलेल्या पावसाने शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा बराच वेळ खंडित झाला होता. परंतु, याचा सर्वाधिक फटका हा कळव्याला बसला असून येथील अनेक रहिवाशांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी येथील रहिवाशांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधिकाऱ्यांना सोमवारी घेराव घातला होता. महावितरणची उच्च दाबाची ओव्हरहेड वायर तुटल्याने कळवा पूर्वेचा भाग पूर्ण अंधारात गेला होता. ठाण्याच्या काही भागांमध्ये काही महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यात रविवारी झालेल्या जोरदार पावसाची भर पडली. रविवारी न्यू शिवाजीनगर, कळवा गावातील भुसारआळी, कुंभारआळी, बुधाजीनगर, कळवा मार्केटमधील वीजपुरवठा सकाळी ७ वाजल्यापासून खंडित झाला होता. दुपारी ३ च्या सुमारास तो सुरळीत होतानाच न्यू शिवाजीनगर येथील महावितरणची ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे उच्च वीजदाबामुळे येथील आठ ते नऊ घरांमधील पंखे, फ्रीज, टीव्ही यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये स्फोट होऊन त्या जळाल्या. यामुळे सोमवारी सेनेने महावितरणच्या कळवा कार्यालयावर मोर्चा काढला. (प्रतिनिधी) >नुकसानभरपाई देणारमहावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून शिवसेनेने येथील समस्यांचा पाढा वाचला. कळवा फिडर वादळी पावसामुळे खराब झाल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. उच्च दाबामुळे ज्या रहिवाशांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान झाले आहे, त्यांची यादी मिळाल्यानंतर पंचनामा करून महावितरणकडे पाठवण्यात येईल तसेच त्यांना जास्तीतजास्त नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन या वेळी महावितरणने दिले.