शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

बत्ती गुलचा कळव्याला सर्वाधिक फटका

By admin | Updated: August 3, 2016 03:21 IST

रविवारी जोरदार बरसलेल्या पावसाने शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा बराच वेळ खंडित झाला होता.

ठाणे : रविवारी जोरदार बरसलेल्या पावसाने शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा बराच वेळ खंडित झाला होता. परंतु, याचा सर्वाधिक फटका हा कळव्याला बसला असून येथील अनेक रहिवाशांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी येथील रहिवाशांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधिकाऱ्यांना सोमवारी घेराव घातला होता. महावितरणची उच्च दाबाची ओव्हरहेड वायर तुटल्याने कळवा पूर्वेचा भाग पूर्ण अंधारात गेला होता. ठाण्याच्या काही भागांमध्ये काही महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यात रविवारी झालेल्या जोरदार पावसाची भर पडली. रविवारी न्यू शिवाजीनगर, कळवा गावातील भुसारआळी, कुंभारआळी, बुधाजीनगर, कळवा मार्केटमधील वीजपुरवठा सकाळी ७ वाजल्यापासून खंडित झाला होता. दुपारी ३ च्या सुमारास तो सुरळीत होतानाच न्यू शिवाजीनगर येथील महावितरणची ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे उच्च वीजदाबामुळे येथील आठ ते नऊ घरांमधील पंखे, फ्रीज, टीव्ही यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये स्फोट होऊन त्या जळाल्या. यामुळे सोमवारी सेनेने महावितरणच्या कळवा कार्यालयावर मोर्चा काढला. (प्रतिनिधी) >नुकसानभरपाई देणारमहावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून शिवसेनेने येथील समस्यांचा पाढा वाचला. कळवा फिडर वादळी पावसामुळे खराब झाल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. उच्च दाबामुळे ज्या रहिवाशांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान झाले आहे, त्यांची यादी मिळाल्यानंतर पंचनामा करून महावितरणकडे पाठवण्यात येईल तसेच त्यांना जास्तीतजास्त नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन या वेळी महावितरणने दिले.