शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

बुलडाण्यात ‘ईव्हीएम’मध्ये घोटाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 03:49 IST

सुमारे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत एका मतदानकेंद्रावर ईव्हीएममधे घोटाळा होत असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सुमारे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत एका मतदानकेंद्रावर ईव्हीएममधे घोटाळा होत असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला होता. त्यानुसार एका अपक्ष उमेदवाराच्या नावासमोरील बटण दाबले असता ते मत भाजपा उमेदवाराला जात होते ! यामुळे ईव्हीएममध्ये घोटाळा होणे शक्य असल्याचा दावा मुंबई येथील आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.लोणार तालुक्यातील सुलतानपूर जिल्हा परिषद सर्कलचे अपक्ष उमेदवार आशा अरुण झोरे यांनी १६ फेब्रुवारी रोजी मतदानादरम्यान होत असलेल्या या गोंधळाची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. त्याआधारे याची चौकशी करण्यात आली. १६ जून रोजी आरटीआय कार्यकर्ते गलगली यांनी माहिती अधिकारांतर्गत अर्ज दाखल केला होता. त्यावर जिल्हा निवडणूक विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सुलतानपूर येथील मतदान केंद्र क्रमांक ५६वरएका मतदाराने जेव्हा ईव्हीएमवरील पहिल्या क्रमांकावरील अपक्ष उमेदवाराच्या नावापुढील ‘नारळ’ या चिन्हापुढील बटन दाबले, तेव्हा चौथ्या क्रमांकावर असलेल्या भाजपा उमेदवाराच्या नावासमोरील दिवा लागला. अपक्ष उमेदवार आशा झोरे यांनी सकाळी १०च्या सुमारास याची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांची तक्रार घेण्यास नकार दिला होता. मात्र, जेव्हा अनेक मतदारांनी याबाबत तक्रार केली तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास याबाबत तक्रार नोंदवली आणि कारवाई करण्याआधी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या सहमती घेतली. यानंतर लोणारच्या निवडणूक अधिकाऱ्यांचे सहाय्यक या केंद्रावर पोहोचले व त्यांनीही याची खातरजमा करून घेतली. तेव्हा अपक्ष उमेदवाराचे मत हे भाजपा उमेदवाराला जात असल्याचे स्पष्ट झाले. राजकीय पक्षांनी फेरमतदानाची मागणी केल्याने येथील मतदान रद्द करून २१ फेब्रुवारीला ते घेण्यात आले.याबाबत प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ ने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.सुलतानपूर येथे ‘ईव्हीएमह्णमध्ये घोळ झाला होता, हे बुलडाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला पाठविलेल्या अहवालानंतर समोर आले आहे. ह्यईव्हीएमह्णमध्ये प्रचंड घोळ आणि हेराफेरी होत असल्याचे आता निवडणूक आयोगाने मान्य करावे. - अनिल गलगली,आरटीआय कार्यकर्ते, मुंबई