शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी मनसे प्रमुख राज ठाकरे लोकल ट्रेनने चर्चगेटला पोहोचले
2
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
3
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
4
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
5
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
6
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
7
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
8
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
9
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
10
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
11
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
12
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
13
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
14
IND vs SA World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
15
Shocking!! कॅप्टन बनताच Bigg Boss 19च्या घरातून बेघर झाला प्रणित मोरे? एलिमिनेशनमध्ये मोठा ट्विस्ट
16
Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित
17
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
18
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
19
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
20
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश

बुलडाण्यात ‘ईव्हीएम’मध्ये घोटाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 03:49 IST

सुमारे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत एका मतदानकेंद्रावर ईव्हीएममधे घोटाळा होत असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सुमारे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत एका मतदानकेंद्रावर ईव्हीएममधे घोटाळा होत असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला होता. त्यानुसार एका अपक्ष उमेदवाराच्या नावासमोरील बटण दाबले असता ते मत भाजपा उमेदवाराला जात होते ! यामुळे ईव्हीएममध्ये घोटाळा होणे शक्य असल्याचा दावा मुंबई येथील आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.लोणार तालुक्यातील सुलतानपूर जिल्हा परिषद सर्कलचे अपक्ष उमेदवार आशा अरुण झोरे यांनी १६ फेब्रुवारी रोजी मतदानादरम्यान होत असलेल्या या गोंधळाची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. त्याआधारे याची चौकशी करण्यात आली. १६ जून रोजी आरटीआय कार्यकर्ते गलगली यांनी माहिती अधिकारांतर्गत अर्ज दाखल केला होता. त्यावर जिल्हा निवडणूक विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सुलतानपूर येथील मतदान केंद्र क्रमांक ५६वरएका मतदाराने जेव्हा ईव्हीएमवरील पहिल्या क्रमांकावरील अपक्ष उमेदवाराच्या नावापुढील ‘नारळ’ या चिन्हापुढील बटन दाबले, तेव्हा चौथ्या क्रमांकावर असलेल्या भाजपा उमेदवाराच्या नावासमोरील दिवा लागला. अपक्ष उमेदवार आशा झोरे यांनी सकाळी १०च्या सुमारास याची तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांची तक्रार घेण्यास नकार दिला होता. मात्र, जेव्हा अनेक मतदारांनी याबाबत तक्रार केली तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास याबाबत तक्रार नोंदवली आणि कारवाई करण्याआधी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या सहमती घेतली. यानंतर लोणारच्या निवडणूक अधिकाऱ्यांचे सहाय्यक या केंद्रावर पोहोचले व त्यांनीही याची खातरजमा करून घेतली. तेव्हा अपक्ष उमेदवाराचे मत हे भाजपा उमेदवाराला जात असल्याचे स्पष्ट झाले. राजकीय पक्षांनी फेरमतदानाची मागणी केल्याने येथील मतदान रद्द करून २१ फेब्रुवारीला ते घेण्यात आले.याबाबत प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ ने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.सुलतानपूर येथे ‘ईव्हीएमह्णमध्ये घोळ झाला होता, हे बुलडाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला पाठविलेल्या अहवालानंतर समोर आले आहे. ह्यईव्हीएमह्णमध्ये प्रचंड घोळ आणि हेराफेरी होत असल्याचे आता निवडणूक आयोगाने मान्य करावे. - अनिल गलगली,आरटीआय कार्यकर्ते, मुंबई