शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

इमारत कोसळून ८ ठार

By admin | Updated: August 8, 2016 06:06 IST

भिवंडीत हनुमान टेकडी रोडवरील जुनी आणि पालिकेने अतिधोकादायक जाहीर केलेली महादेव बिल्डिंग रविवारी सकाळी कोसळल्याने घरमालक आणि त्यांच्या पत्नीसह

वज्रेश्वरी/भिवंडी : भिवंडीत हनुमान टेकडी रोडवरील जुनी आणि पालिकेने अतिधोकादायक जाहीर केलेली महादेव बिल्डिंग रविवारी सकाळी कोसळल्याने घरमालक आणि त्यांच्या पत्नीसह आणखी एका कुटुंबातील सहा जण अशा एकूण आठ जणांचा बळी गेला. तर एक जण जखमी झाला आहे. इमारत कोसळण्याची भिवंडीतील आठवडाभरात दुसरी घटना आहे.

हनुमान टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर महादेव ही ३५ वर्षे जुनी तीन मजली इमारत होती आणि महापालिकेने ती अतिधोकादायक ठरवून तिचे वीज-पाणी तोडले होते. त्यानंतरही, या इमारतीत आठ कुटुंबे राहत होती. या इमारतीचा पश्चिमेकडील भाग कोसळला. न कोसळलेल्या भागातील सहा कुटुंबांना वेळीच बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. इमारतीच्या तळमजल्यावर एक भोजनालय, मोबाइलची दोन दुकाने आणि इलेक्ट्रिक वस्तूंचे दुकान होते. भोजनालयातील अशरफ अन्सारी (३८) हा जखमी झाला आहे.

सज्जनलाल गुप्ता यांना पालिकेने दोन वेळा नोटीस दिली होती. त्यानंतर, मालक आणि भाडेकरूं ची शुक्र वारी बैठक झाली होती. त्यात त्यांनी भाडेकरूंना घरे सोडण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार, त्यांनी घरे शोधण्यास सुरुवात केली होती. परंतु, भाडेकरू पागडी पद्धतीने खूप वर्षांपासून राहत असल्याने त्यांनी मालकाकडून घरांच्या ताब्याबाबत लेखी हमी मागितली होती. परंतु, मालक आणि त्याच्या भाऊ-बहिणींत मालमत्तेचा वाद असल्याने त्यांना लेखी हमी देता येत नव्हती. त्यात वेळ जात होता. अखेर, इमारतीची अवस्था पाहून रविवारी घरे रिकामी करण्याचा निर्णय सर्वांनी घेतला होता. त्यांनी घरे सोडण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.मृत रहिवासी : या इमारतीचे मालक सज्जनलाल महादेव गुप्ता (६०) आणि त्यांची पत्नी सत्यवती यांचे मृतदेह सकाळीच सापडले. तर संध्याकाळी दुसऱ्या कुटुंबातील धनीराम ठाकूर (४५), त्यांची पत्नी रेखा (३८), मुलगी शिवानी (१३), मुलगा देवेश (९), नैतिक (३) आणि आई सोममणी (६०) यांचे मृतदेह सापडले. भिवंडीतील १७ अतिधोकादायक इमारतींपैकी सात इमारतींतील रहिवाशांना बाहेर काढले आहे. इतर इमारतींतील रहिवाशांना काढण्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल, असे पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी सांगितले. त्यासाठी महसूल विभाग आणि पोलिसांचीही मदत घेण्यात येईल. उरलेल्या इमारतींचेही वीज-पाणी तोडण्यात येईल. त्याचवेळी त्यांना भोगवटा प्रमाणपत्रही दिले जाईल.भाडेकरूंना प्रमाणपत्र भिवंडीत आठवडाभरात लागोपाठ दोन इमारती कोसळल्याने उरलेल्या अतिधोकादायक इमारतीतील भाडेकरूंना विश्वासात घेण्याची गरज आहे. त्यांच्या ताब्यातील क्षेत्रफळ, किती वर्षांपासून राहत आहेत त्याच्या तपशीलासह भाडेकरूंना तत्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहे, अशी माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. घरे सोडलेल्या भाडेकरूंना नवीन इमारतीत हक्काची जागा दिल्यानंतरच त्या इमारतीच्या पुनर्विकासास परवानगी देण्याचे आदेश पालिकेलाही दिले आहेत.यंत्रणा कार्यान्वितघटनास्थळी महानगरपालिकेचे अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह ३० ते ३५ कर्मचारी, तीन जेसीबी, पाच डम्पर, पोकलेन यांच्या मदतीने ढिगारा उपसण्याचे काम आणि मदतकार्य सुरू होते. नंतर, सकाळी १० च्या सुमारास राष्ट्रीय आपत्ती निवारण केंद्राचे पथक (एनडीआरएफ) पोहोचले. त्यांनी ४० जवान आणि श्वान पथकासह शोध सुरू केला. घटनास्थळी सर्वांत आधी महानगरपालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन आले. नंतर, तहसीलदार वैशाली लंभाते, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आदी पोहोचले.