शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Budget 2021 : अर्थसंकल्पात मुंबई, महाराष्ट्रासाठी विशेष योजनेचा अभाव - नीलम गोऱ्हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 19:57 IST

Budget 2021 Latest News and updates, Neelam Gorhe : या अर्थसंकल्पात खटकणाऱ्या गोष्टी आहेत. ज्या राज्यात उपद्रव मूल्य आहेत, त्या राज्यांचा विचार केंद्राने केलेला आहे. यात महाराष्ट्राबद्दल दुजाभाव अर्थसंकल्पात दिसत आहे, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

पुणे : केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आरोग्य विषयक सुविधा यांच्यामध्ये सर्वांसाठी व्हॅक्सीन तसेच आरोग्य व पायाभूत सुविधा यांच्यावर भर देण्यात आला आहे. परंतु बँकांमधील बुडीत कर्ज आहेत, याच्यामधून बँकांना संरक्षण देण्याऐवजी मोठ्याप्रमाणात राजश्रयातून बँकांचा फायदा आणि परदेशी गुंतवणूक कशी वाढेल हे पाहण्यात आले आहे. त्याचबरोबर पायाभूत सुविधा किंवा संघटित रोजगाराच्यामध्ये जे कंत्राटी कामगार व  असंघटित लोक आहेत. त्यांच्यासाठी जीवनाचा दर्जा बदला पाहिजे, किमान सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी किमान वेतनाचे एक पाऊल म्हटले असले तरी त्याची अंमलबजावणी करण्यास  कोणत्याच यंत्रणा जाग्यावर नाहीत. याचा परिणाम असा होतो की, अशा असंघटितांच्या डोलाऱ्यावर पायाभूत विकासाच्या सुविधा कशा उभ्या राहणार हा एक फार मोठा प्रश्न दिसत आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

याचबरोबर महाराष्ट्र, मुंबई यासाठी म्हणून कोणतीही विशेष योजना नाहीत या सर्व ठिकाणी पायाभूत सुविधासाठी असलेला प्रचंड ताण आहे. याच्याकडे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. अर्थसंकल्पात महिला व बाल विकास विभागासाठी जे ३० हजार कोटींचे बजेट ते उलट कमी होऊन २४ हजार कोटींवर आलेले आहे. याचा अत्यंत तुटपुंजा वाटा महाराष्ट्राला मिळालेला आहे, या अर्थसंकल्पात खटकणाऱ्या गोष्टी आहेत. ज्या राज्यात उपद्रव मूल्य आहेत, त्या राज्यांचा विचार केंद्राने केलेला आहे. यात महाराष्ट्राबद्दल दुजाभाव अर्थसंकल्पात दिसत आहे, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

याशिवाय, आतापर्यंत ज्या शासकीय सहभागातून चांगल्या प्रकारचे कामकाज चाललेले होते. अशा प्रकारचा सरकाराचा हिस्सा असलेले विमा, रेल्वे आणि बँक  त्यांची धुळदाण करून टाकायची अशी व्यूहरचना केली आहे. जसे एक वाड्याच्या एखादा माणूस स्वतःला फार मोठा श्रीमंत पण पोकळ माणूस स्वतःच्या घराची तुळई, दारे, खिडक्या एकएक विकून टाकायला लागतो. तशा प्रकारचा हा सगळा पराक्रम केंद्र सरकारने दाखविला आहे. अशावेळी  या सगळ्या पायाभूत सुविधा कुठून आणणार त्याचे पैसे कुठून आणणार यामध्ये कशा प्रकरणी खरोखर गुंतवणूक होणार, या कुठल्याही गोष्टी स्पष्ट नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित असलेल्या काही लोकांचे भले करण्यापूरतेच हा सगळा शब्दांचा भुलभुलैया आहे असे स्पष्टपणाने दिसत असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही.  75 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या आणि ज्यांना निवृत्तीवेतन मिळते त्यांचा कर माफ करण्यात आला आहे. तसेच, भारत पेट्रोलियम, आयडीबीआय बँक आणि एअर इंडिया यामध्ये निर्गंतवणूक करण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली.   

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनbudget 2021बजेट 2021Shiv Senaशिवसेना