शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

Budget 2021 : अर्थसंकल्पात मुंबई, महाराष्ट्रासाठी विशेष योजनेचा अभाव - नीलम गोऱ्हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 19:57 IST

Budget 2021 Latest News and updates, Neelam Gorhe : या अर्थसंकल्पात खटकणाऱ्या गोष्टी आहेत. ज्या राज्यात उपद्रव मूल्य आहेत, त्या राज्यांचा विचार केंद्राने केलेला आहे. यात महाराष्ट्राबद्दल दुजाभाव अर्थसंकल्पात दिसत आहे, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

पुणे : केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आरोग्य विषयक सुविधा यांच्यामध्ये सर्वांसाठी व्हॅक्सीन तसेच आरोग्य व पायाभूत सुविधा यांच्यावर भर देण्यात आला आहे. परंतु बँकांमधील बुडीत कर्ज आहेत, याच्यामधून बँकांना संरक्षण देण्याऐवजी मोठ्याप्रमाणात राजश्रयातून बँकांचा फायदा आणि परदेशी गुंतवणूक कशी वाढेल हे पाहण्यात आले आहे. त्याचबरोबर पायाभूत सुविधा किंवा संघटित रोजगाराच्यामध्ये जे कंत्राटी कामगार व  असंघटित लोक आहेत. त्यांच्यासाठी जीवनाचा दर्जा बदला पाहिजे, किमान सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी किमान वेतनाचे एक पाऊल म्हटले असले तरी त्याची अंमलबजावणी करण्यास  कोणत्याच यंत्रणा जाग्यावर नाहीत. याचा परिणाम असा होतो की, अशा असंघटितांच्या डोलाऱ्यावर पायाभूत विकासाच्या सुविधा कशा उभ्या राहणार हा एक फार मोठा प्रश्न दिसत आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

याचबरोबर महाराष्ट्र, मुंबई यासाठी म्हणून कोणतीही विशेष योजना नाहीत या सर्व ठिकाणी पायाभूत सुविधासाठी असलेला प्रचंड ताण आहे. याच्याकडे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. अर्थसंकल्पात महिला व बाल विकास विभागासाठी जे ३० हजार कोटींचे बजेट ते उलट कमी होऊन २४ हजार कोटींवर आलेले आहे. याचा अत्यंत तुटपुंजा वाटा महाराष्ट्राला मिळालेला आहे, या अर्थसंकल्पात खटकणाऱ्या गोष्टी आहेत. ज्या राज्यात उपद्रव मूल्य आहेत, त्या राज्यांचा विचार केंद्राने केलेला आहे. यात महाराष्ट्राबद्दल दुजाभाव अर्थसंकल्पात दिसत आहे, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

याशिवाय, आतापर्यंत ज्या शासकीय सहभागातून चांगल्या प्रकारचे कामकाज चाललेले होते. अशा प्रकारचा सरकाराचा हिस्सा असलेले विमा, रेल्वे आणि बँक  त्यांची धुळदाण करून टाकायची अशी व्यूहरचना केली आहे. जसे एक वाड्याच्या एखादा माणूस स्वतःला फार मोठा श्रीमंत पण पोकळ माणूस स्वतःच्या घराची तुळई, दारे, खिडक्या एकएक विकून टाकायला लागतो. तशा प्रकारचा हा सगळा पराक्रम केंद्र सरकारने दाखविला आहे. अशावेळी  या सगळ्या पायाभूत सुविधा कुठून आणणार त्याचे पैसे कुठून आणणार यामध्ये कशा प्रकरणी खरोखर गुंतवणूक होणार, या कुठल्याही गोष्टी स्पष्ट नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित असलेल्या काही लोकांचे भले करण्यापूरतेच हा सगळा शब्दांचा भुलभुलैया आहे असे स्पष्टपणाने दिसत असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही.  75 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या आणि ज्यांना निवृत्तीवेतन मिळते त्यांचा कर माफ करण्यात आला आहे. तसेच, भारत पेट्रोलियम, आयडीबीआय बँक आणि एअर इंडिया यामध्ये निर्गंतवणूक करण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली.   

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनbudget 2021बजेट 2021Shiv Senaशिवसेना