शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2021 : कृषी संदर्भातील तरतुदी पारंपारिकच, शेतकरी सक्षम कसा होणार? - विलास शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 21:03 IST

Budget 2021 Latest News and updates, Vilas Shinde : यंदाच्या अर्थसंकल्पानेही ही मळलेली वाट सोडली नाही, अशा शब्दांत आजच्या अर्थसंकल्पावर सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने अध्यक्ष विलास शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिक : केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी संदर्भात करण्यात आलेल्या तरतुदी यापूर्वीच्या अर्थसंकल्पांप्रमाणे पारंपारिक अशाच आहेत. दरवेळीच्या अर्थसंकल्पात कृषीसंदर्भात असलेल्या तरतुदी अत्यंत ठराविक छापाच्या असतात. त्यात सुक्ष्म सिंचनासाठी काही प्रमाणात निधी वाढवणे. पतपुरवठ्याचा निधी काही प्रमाणात वाढविणे पायाभूत सुविधांसाठी काही प्रमाणात निधी वाढविणे. या अशा ठरलेल्या तरतुदी असतात. यंदाच्या अर्थसंकल्पानेही ही मळलेली वाट सोडली नाही, अशा शब्दांत आजच्या अर्थसंकल्पावर सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने अध्यक्ष विलास शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कृषी हा व्यवसाय व्हावा. शेतकरी हा व्यावसायिक व्हावा ही भूमिका सरकार सातत्याने मांडत आहे. सरकारने आणलेल्या कृषी विधेयकांचा उद्देशही हाच असल्याचे सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर देणे. जागतिक बाजारात भारतीय शेतमालाचे स्थान उंचावणे, यासाठी ठोस तरतूद होणे. शेतीक्षेत्रातील गुंतवणूक वाढविणे यासाठी ठोस तरतूद अपेक्षित होती. प्रत्यक्षात तसे काहीच आढळून आले नाही, असे विलास शिंदे म्हणाले.

याचबरोबर, केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी संदर्भात ज्या तरतुदी आहेत. त्या सर्व बऱ्याचशा जे पारंपारिक विषय असतात. शेतकरी विधेयकाच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा आणि जागतिक मार्केट मध्ये आपली कृषी उत्पादने प्रस्थापित करण्यासाठी जी भांडवली गुंतवणूक सरकारच्या पातळीवर अपेक्षित होती ती दिलेली नाही. शाश्वत शेती विकासासाठी पुढील काळात  शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, शेतकऱ्याला जागतिक शेतमाल बाजाराच्या पार्श्वभूमीवर सक्षम करणे हे उद्दिष्ट सरकारने ठरवले आहे. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतुदी पाहता सरकारचे हे उद्दिष्ट कितपत साध्य होईल, याबाबत शंकाच आहे, असेही विलास शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. यावेळी आमचे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी वचनबद्ध आहे. शेतमालाला दीडपट हमीभाव देण्यासाठी प्रयत्नशील आहे. गहू उत्पादकांना ७५ हजार ६० कोटींच्या मदतीकरता तरतूद करण्यात आली. गव्हाचे उत्पादन घेणाऱ्या ४३ लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. याशिवाय, सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने काम करत आहे. मागील यूपीए सरकारपेक्षा मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये तीनपट निधी पोहोचला आहे. तसेच, सरकारकडून प्रत्येक सेक्टरमधून शेतकऱ्यांना मदत केली जात आहे. डाळी, गहू, धान आणि इतर पिकांचा एमएसपी वाढविला आहे, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

टॅग्स :budget 2021बजेट 2021Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन