शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2021 : कृषी संदर्भातील तरतुदी पारंपारिकच, शेतकरी सक्षम कसा होणार? - विलास शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 21:03 IST

Budget 2021 Latest News and updates, Vilas Shinde : यंदाच्या अर्थसंकल्पानेही ही मळलेली वाट सोडली नाही, अशा शब्दांत आजच्या अर्थसंकल्पावर सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने अध्यक्ष विलास शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिक : केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी संदर्भात करण्यात आलेल्या तरतुदी यापूर्वीच्या अर्थसंकल्पांप्रमाणे पारंपारिक अशाच आहेत. दरवेळीच्या अर्थसंकल्पात कृषीसंदर्भात असलेल्या तरतुदी अत्यंत ठराविक छापाच्या असतात. त्यात सुक्ष्म सिंचनासाठी काही प्रमाणात निधी वाढवणे. पतपुरवठ्याचा निधी काही प्रमाणात वाढविणे पायाभूत सुविधांसाठी काही प्रमाणात निधी वाढविणे. या अशा ठरलेल्या तरतुदी असतात. यंदाच्या अर्थसंकल्पानेही ही मळलेली वाट सोडली नाही, अशा शब्दांत आजच्या अर्थसंकल्पावर सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने अध्यक्ष विलास शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कृषी हा व्यवसाय व्हावा. शेतकरी हा व्यावसायिक व्हावा ही भूमिका सरकार सातत्याने मांडत आहे. सरकारने आणलेल्या कृषी विधेयकांचा उद्देशही हाच असल्याचे सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर देणे. जागतिक बाजारात भारतीय शेतमालाचे स्थान उंचावणे, यासाठी ठोस तरतूद होणे. शेतीक्षेत्रातील गुंतवणूक वाढविणे यासाठी ठोस तरतूद अपेक्षित होती. प्रत्यक्षात तसे काहीच आढळून आले नाही, असे विलास शिंदे म्हणाले.

याचबरोबर, केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी संदर्भात ज्या तरतुदी आहेत. त्या सर्व बऱ्याचशा जे पारंपारिक विषय असतात. शेतकरी विधेयकाच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा आणि जागतिक मार्केट मध्ये आपली कृषी उत्पादने प्रस्थापित करण्यासाठी जी भांडवली गुंतवणूक सरकारच्या पातळीवर अपेक्षित होती ती दिलेली नाही. शाश्वत शेती विकासासाठी पुढील काळात  शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, शेतकऱ्याला जागतिक शेतमाल बाजाराच्या पार्श्वभूमीवर सक्षम करणे हे उद्दिष्ट सरकारने ठरवले आहे. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतुदी पाहता सरकारचे हे उद्दिष्ट कितपत साध्य होईल, याबाबत शंकाच आहे, असेही विलास शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. यावेळी आमचे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी वचनबद्ध आहे. शेतमालाला दीडपट हमीभाव देण्यासाठी प्रयत्नशील आहे. गहू उत्पादकांना ७५ हजार ६० कोटींच्या मदतीकरता तरतूद करण्यात आली. गव्हाचे उत्पादन घेणाऱ्या ४३ लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. याशिवाय, सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने काम करत आहे. मागील यूपीए सरकारपेक्षा मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये तीनपट निधी पोहोचला आहे. तसेच, सरकारकडून प्रत्येक सेक्टरमधून शेतकऱ्यांना मदत केली जात आहे. डाळी, गहू, धान आणि इतर पिकांचा एमएसपी वाढविला आहे, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

टॅग्स :budget 2021बजेट 2021Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन