शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

budget 2018 : शेतक-यांसाठी हे तर गाजराचे पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 05:43 IST

२०२०मध्ये शेतक-याचे उत्पन्न दुप्पट होणार असल्याची घोषणा कशी वास्तवात येणार? लागवड खर्चाच्या दीडपट भाव देण्याचे आश्वासन २०१४पासून आहे. त्याची घोषणा नव्हे, तर विचार सुरू आहे.

- सुधीर महाजनशेती व शेतकरी यांचे भले करण्याच्या नावाखाली मोदी सरकारने आपल्या अर्थसंकल्पात शेतकºयांच्या कोपराला गूळ चिटकवला. हा गूळ दिसतो, आपल्याच कोपराला असतो, पण खाता येत नाही. तो खाण्यासाठी होणारी धडपड केविलवाणी असते, अशी ही अवस्था. शेती व शेतकºयांची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे. मोदी सरकारच्या काळात तर कृषीचे राष्टÑीय उत्पन्न ४.१ टक्क्यांवरून २.१ टक्क्यांवर घसरले. लहरी हवामान, कायम घसरत असलेला शेतमालाचा भाव तसेच शेतीच्या खर्चात होणारी वाढ यामुळे शेतकरी नाडला गेला. परिणामी आत्महत्या थांबल्या नाहीत. शेतमालाचे पडलले भाव रोखण्यासाठी सरकारने हमीभावाने खरेदीही केली नाही. असा इतिहास असताना या अर्थसंकल्पात शेतीसाठी काही ठोस होईल, किमानपक्षी शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी सरकार काहीतरी उपाययोजना करणार अशी अपेक्षा होती; पण हमीभावाने सर्व शेतमाल खरेदी करणार एवढीच काय ती घोषणा केली. तीही नवी नाही. समर्थन मूल्यांने खरेदी कधीच होत नाही, हे आजवरचे वास्तव आहे. कापूस एकाधिकार हा त्याचाच भाग होता. या सरकारने त्यामुळे निराशा केली आहे. बी-बियाणे, खते यासाठी कुठलीही सवलत नाही. म्हणजे सामान्य शेतकºयांना थेट लाभाचा कोणताही मुद्दा अर्थसंकल्पात नाही. ४७ टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून असणा-या या क्षेत्राची ही स्थिती आहे. शेतमालाची निर्यात वाढविण्याची योजना असली तरी ती केवळ निवडक मालापुरती मर्यादित आहे.वास्तववादी योजना नाहीराष्ट्रीय बांबू मिशनसाठी १२०० कोटींची व्यवस्था केली; पण बांबूचे क्षेत्र असणाºया ईशान्य भारत व विदर्भ या प्रदेशातील लोकांनाच त्याचा लाभ होऊ शकतो. मत्स्यसंवर्धनासाठीही१० हजार कोटींची तरतूद आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाय नाही. हवामान बदलाचा फटका शेतीला बसत असताना शेतमालाच्या संरक्षणाचे उपाय नाही किंवा शेतमालाच्या विम्यासाठी वास्तववादी योजना नाही.

टॅग्स :FarmerशेतकरीBudget 2018अर्थसंकल्प २०१८