शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

budget 2018 : शेतक-यांसाठी हे तर गाजराचे पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 05:43 IST

२०२०मध्ये शेतक-याचे उत्पन्न दुप्पट होणार असल्याची घोषणा कशी वास्तवात येणार? लागवड खर्चाच्या दीडपट भाव देण्याचे आश्वासन २०१४पासून आहे. त्याची घोषणा नव्हे, तर विचार सुरू आहे.

- सुधीर महाजनशेती व शेतकरी यांचे भले करण्याच्या नावाखाली मोदी सरकारने आपल्या अर्थसंकल्पात शेतकºयांच्या कोपराला गूळ चिटकवला. हा गूळ दिसतो, आपल्याच कोपराला असतो, पण खाता येत नाही. तो खाण्यासाठी होणारी धडपड केविलवाणी असते, अशी ही अवस्था. शेती व शेतकºयांची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे. मोदी सरकारच्या काळात तर कृषीचे राष्टÑीय उत्पन्न ४.१ टक्क्यांवरून २.१ टक्क्यांवर घसरले. लहरी हवामान, कायम घसरत असलेला शेतमालाचा भाव तसेच शेतीच्या खर्चात होणारी वाढ यामुळे शेतकरी नाडला गेला. परिणामी आत्महत्या थांबल्या नाहीत. शेतमालाचे पडलले भाव रोखण्यासाठी सरकारने हमीभावाने खरेदीही केली नाही. असा इतिहास असताना या अर्थसंकल्पात शेतीसाठी काही ठोस होईल, किमानपक्षी शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी सरकार काहीतरी उपाययोजना करणार अशी अपेक्षा होती; पण हमीभावाने सर्व शेतमाल खरेदी करणार एवढीच काय ती घोषणा केली. तीही नवी नाही. समर्थन मूल्यांने खरेदी कधीच होत नाही, हे आजवरचे वास्तव आहे. कापूस एकाधिकार हा त्याचाच भाग होता. या सरकारने त्यामुळे निराशा केली आहे. बी-बियाणे, खते यासाठी कुठलीही सवलत नाही. म्हणजे सामान्य शेतकºयांना थेट लाभाचा कोणताही मुद्दा अर्थसंकल्पात नाही. ४७ टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून असणा-या या क्षेत्राची ही स्थिती आहे. शेतमालाची निर्यात वाढविण्याची योजना असली तरी ती केवळ निवडक मालापुरती मर्यादित आहे.वास्तववादी योजना नाहीराष्ट्रीय बांबू मिशनसाठी १२०० कोटींची व्यवस्था केली; पण बांबूचे क्षेत्र असणाºया ईशान्य भारत व विदर्भ या प्रदेशातील लोकांनाच त्याचा लाभ होऊ शकतो. मत्स्यसंवर्धनासाठीही१० हजार कोटींची तरतूद आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाय नाही. हवामान बदलाचा फटका शेतीला बसत असताना शेतमालाच्या संरक्षणाचे उपाय नाही किंवा शेतमालाच्या विम्यासाठी वास्तववादी योजना नाही.

टॅग्स :FarmerशेतकरीBudget 2018अर्थसंकल्प २०१८