शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात BRS सर्व जागा लढणार; KCR यांच्या 'या' मराठी खासदारानं सांगितला प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 17:10 IST

अनेकांनी इच्छा होती आम्ही तेलंगणात यायला हवं. ते शक्य नव्हतं. मात्र आमच्या मुख्यमंत्र्यांनी या मागणीची दखल घेत येणाऱ्या काळात तुमच्या राज्यात येऊन या सर्व स्कीम राबवेन असं म्हटलं होते.

मुंबई - तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के.सी आर यांचा नवा राजकीय पक्ष भारत राष्ट्र समितीनं महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. नांदेड इथं आज मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा झाली. या सभेला मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. केसीआर यांचा BRS पक्ष आगामी काळात महाराष्ट्रात सर्व जागा लढवणार असा विश्वास खासदार भीमराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

खासदार भीमराव पाटील म्हणाले की, तेलंगणा राज्यात केसीआर यांचे सरकार आल्यापासून विकासाची कामे सुरू आहेत. सर्व जातीजमाती, शेतकऱ्यांसाठी आम्ही काम केले. हाच अजेंडा घेऊन आम्ही इतर राज्यात जाणार आहोत. आंधप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक याठिकाणी आम्ही जात आहोत. अनेकांनी इच्छा होती आम्ही तेलंगणात यायला हवं. ते शक्य नव्हतं. मात्र आमच्या मुख्यमंत्र्यांनी या मागणीची दखल घेत येणाऱ्या काळात तुमच्या राज्यात येऊन या सर्व स्कीम राबवेन असं म्हटलं होते त्याचाच भाग म्हणून नांदेडमध्ये सभा झाली असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत नांदेडमध्ये सभा घेण्यामागे उद्दिष्ट म्हणजे हे चांगले प्रेक्षणीय स्थळ आहे. गुरुद्वाराला दर्शन करण्याची इच्छा होती. मराठवाड्याशी निजाम कनेक्शन आहे. हैदराबादशी कनेक्टेड असल्यानं जुनं नातं आहे. गेल्या ८ वर्षापासून विकासासोबतच अनेक योजनांच्या माध्यमांतून लोकांची सेवा केली आहे. प्रत्येक माणसाची गरज बघून मागासवर्गीय असो वा कुणीही सगळ्या यंत्रणा उभ्या करून त्यांना मदत केली आहे. सर्व सवलती शेतकऱ्यांना देण्याचा आमचा मानस आहे. पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण या सर्व क्षेत्रात आम्ही काम केले आहे. हाच अजेंडा घेऊन आम्ही काम करणार आहोत असंही खासदार भीमराव पाटील म्हणाले. 

दरम्यान, आम्ही कुठल्याही पक्षावर आणि नेत्यांवर टीका करणार नाही. विकासासाठी आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करणार आहोत. जे विकास आणि शेतकऱ्यांसाठी काम करतील ते सोबत येतील. आमच्या विचारांचे जे लोक असतील त्यांच्यासोबत आम्ही युती किंवा आघाडी नक्की करू. बऱ्याच नेत्यांशी आमची चर्चा सुरू आहे. तेलंगणा राज्याकडून जे काही पुर्तता आहे ते आम्ही पूर्ण केलेत. महाराष्ट्रानेही पुढाकार घेतला आहे. लवकरात लवकर वादग्रस्त विषय संपवून टाकू असंही खासदार बी.बी पाटील (भीमराव पाटील) यांनी सांगितले. 

टॅग्स :Telanganaतेलंगणा