शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

भाई बर्धन : सच्चा सेवक

By admin | Updated: January 18, 2015 00:58 IST

१९४८ तो काळ असावा, त्यावेळी ए.बी.बर्धन विद्यार्थी दशेत होते. तेव्हापासूनच त्यांचा कामगार केसरी रामभाऊ रुईकर यांच्याशी संबंध आला. रुईकरांसोबत त्यांनी कामगारांच्या अनेक सभांना संबोधित केले होते.

मालती रुईकर१९४८ तो काळ असावा, त्यावेळी ए.बी.बर्धन विद्यार्थी दशेत होते. तेव्हापासूनच त्यांचा कामगार केसरी रामभाऊ रुईकर यांच्याशी संबंध आला. रुईकरांसोबत त्यांनी कामगारांच्या अनेक सभांना संबोधित केले होते. पुलगावला गिरणी कामगारांची सभा होती. बर्धन तेव्हा नुकतेच कामगार चळवळीत रुळायला लागले होते. सभेला कामगारांची संख्या कमी असल्याने रुईकरांनी बर्धन यांना बोलण्यास सांगितले. ते कमालीच्या हळू आवाजात बोलत होते. त्यामुळे सभेत जोश येत नव्हता. वारंवार सांगूनही बर्धन यांचा आवाज वाढत नसल्याचे पाहून अखेर रुईकरांनीच सभेचा ताबा घेतला आणि तडाखेबंद भाषण ठोकले. पाहता पाहता कामगारांची गर्दी हजारोच्या संख्येने वाढली. ‘सभेला किती लोक आहेत त्या पेक्षा तुम्ही त्यांच्याविषयी काय बोलता यावर सभेचे महत्त्व ठरते आणि गर्दीही वाढते’, असा मंत्र यावेळी रुईकर यांनी बर्धन यांना दिला. त्याचे पालन अद्यापही ते करीत आले आहेत. पुढच्या काळात बर्धन यांनी स्वतंत्र कामगार संघटना उभ्या केल्या. अनेक वर्ष ते गिरणी कामगारांच्या लढ्यात सक्रिय सहभागी झाले. कामगारांच्या न्याय्य हक्काच्या लढ्यासाठी कळकळीने सहभागी होण्याची त्यांची वृत्ती चळवळीशी त्यांचे प्रामाणिक नाते दर्शविणारी आहे. कामगार लढ्यातून श्रमिकांना न्याय मिळाला असेल तर मग ते त्याचे श्रेय स्वत:कडे कधीच घेत नाहीत. (लेखिका या कामगार नेत्या आणि कामगार केसरी दिवंगत रामभाऊ रुईकर यांच्या कन्या आहेत.) एक सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय कारकीर्द सुरु करून कर्तृत्त्वाने पक्षाच्या सर्वोच्चपदापर्यंत पोहोचणारे, नागपूरच्या कामगार क्षेत्रावर आपल्या कामाचा ठसा उमटविणारे आणि नागपूरकरांसाठी ‘भूषण’ ठरलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, पक्षाचे माजी सरचिटणीस आणि ज्येष्ठ कामगार नेते भाई अर्धेन्दु बर्धन यांनी ९० व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त त्यांचा आज रविवारी दि.१८ जानेवारी २०१५ रोजी सत्कार करण्यात येत आहे. त्यानिमित्त त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि कामगार क्षेत्रातील निर्लेप सेवेला लोकमतने केलेला हा सलाम.