शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

ब्रिटीशकालीन कळवा पूल वाहनांसाठी बंद!

By admin | Updated: November 5, 2016 03:40 IST

ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या कळवा खाडीवर असलेल्या ब्रिटीशकालीन पूल पवई आयआयटीने तो दोन दिवसात पूर्णपणे बंद करावा, असे स्पष्ट केले

ठाणे : महाड आणि पोलादपूर मार्गावरील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल वाहून गेल्यानंतर ठाणे महापालिकेनेदेखील येथील ठाणे आणि कळव्याला जोडणाऱ्या कळवा खाडीवर असलेल्या ब्रिटीशकालीन पूल पवई आयआयटीने तो दोन दिवसात पूर्णपणे बंद करावा, असे स्पष्ट केले होते. परंतु त्याची दखल पालिकेने १३ दिवसानंतर घेतली असून, अखेर आता हा पूल सर्वच वाहनांसाठी आणि पादचाऱ्यांसाठीदेखील कायमचा बंद करण्यात आला आहे. महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पुल वाहून गेल्याने महाराष्ट्रातील सर्वच ब्रिटीशकालीन पुलांचे स्ट्रॅक्चरल आॅडीट करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार ठाण्यातही ठाणे आणि कळव्याला जोडणारा सुमारे १५० वर्षापूर्वीचा ब्रिटीशकालीन पूल आहे. दगडांचा वापर करून हा पूल उभारण्यात आला आहे; परंतु तीन वर्षांपूर्वी या पुलाच्या बुरजाचे काही दगड निखळू लागल्याने हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. त्यानंतर या पुलाला काहीशी डागडुजी करून हा पूल दुचाकी आणि तीनचाकी हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात आला होता. परंतु पालिकेने पुन्हा २०१४ मध्ये केलेल्या एका सर्व्हेनंतर या पुलावरुन अवजड वाहने जाणे शक्य नसल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना येथून प्रवेश दिला जात होता. दरम्यान महाडच्या घटनेनंतर पालिकेने हा पुल ४ आॅगस्टपासून हलक्या वाहनांसाठी देखील बंद केला होता. परंतु येथे लावण्यात आलेले बॅरीकेट्सच्या मधून दुचाकींची वाहतूक सुरुच होती. पादचारी देखील आपला जीव मुठीत घेऊन येथून चालत होते. (प्रतिनिधी)>दुचाकी सोडाच पादचाऱ्यांसाठीही धोकादायकमागील महिन्यात आयआयटीचा अहवाल महापालिकेकडे आला होता. या अहवालानुसार येथून दुचाकी सोडाच पादचाऱ्यांसाठीही पूल धोकादायक असल्याचे नमूद केले होते. दोन दिवसात पूर्णपणे बंद करावा असेही सांगितले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक वळवावी लागेल.