शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

‘आमच्या मुलांना परत आणा’

By admin | Updated: July 19, 2014 02:47 IST

कल्याणमधील दूधनाका परिसरातील मोहल्ल्यामधील जे चार युवक मे महिन्यापासून बेपत्ता

कल्याण : कल्याणमधील दूधनाका परिसरातील मोहल्ल्यामधील जे चार युवक मे महिन्यापासून बेपत्ता आहेत त्यांच्या पालकांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली असून, ही मुले दहशतवादी संस्थांशी संबंधित नाहीत. आम्ही जर काही खोटे बोलत असू तर आमची नार्को टेस्ट करा; पण आमच्या मुलांना परत आणा, असे साकडे त्यांना घातले. चिंतन जोशी हे त्या कुटुंबीयांना घेऊन दिल्लीत गेले होते. त्यांनीच ही माहिती ‘लोकमत’ला दिली. अर्धा तास झालेल्या चर्चेत एका पाल्याच्या कुटुंबीयांनी आमची मुले चांगली असून ती उच्च शिक्षण घेत आहेत. ती सर्वच मुले खूप हुशार असून, ते असे कृत्य करणार नाहीत. त्यांना परत आणा, अशी विनंती त्यांनी केली. ती मुले नेमकी कुठे गेली याचा शोध लागेलच, त्यासाठी आवश्यक ते आदेश सुरक्षा यंत्रणांना दिले आहेत. ज्यांनी त्यांना असे कृत्य करायला भाग पाडले असेल त्यांना कठोरात कठोर शासन केले जाईल, पालकांनी थोडा धीर धरावा, संयम बाळगावा. सुरक्षा यंत्रणेच्या संपर्कात राहावे, असा सल्ला सिंग यांनी दिल्याचेही जोशी यांनी स्पष्ट केले. सुरक्षा यंत्रणा याबाबतची सर्व माहिती घेत असून त्यांचा छडा लागेल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)