शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वधू@५३ तर वर@५५... झाले शुभमंगल

By admin | Updated: March 4, 2016 01:43 IST

‘म्हणतात ना, प्रेमाला वयाचे बंधन नसते,’ त्याचाच प्रत्यय गुरुवारी आला. ३० वर्षांहून अधिक काळ परस्परांवर जिवापाड प्रेम करणारे एक जोडपे पन्नाशी उलटल्यावर गुरुवारी विवाहबंधनात अडकले.

ठाणे : ‘म्हणतात ना, प्रेमाला वयाचे बंधन नसते,’ त्याचाच प्रत्यय गुरुवारी आला. ३० वर्षांहून अधिक काळ परस्परांवर जिवापाड प्रेम करणारे एक जोडपे पन्नाशी उलटल्यावर गुरुवारी विवाहबंधनात अडकले. निमित्त होते सामूहिक विवाह सोहळ्याचे. त्याचा मुहूर्त साधत तब्बल १०८ जोडपी लग्नाच्या बेडीत अडकली. या जोडप्यांबरोबर दृष्टिहीन, दिव्यांग, आदिवासी, गरीब जोडप्यांवरही अक्षता पडल्या. हिंदी भाषा एकता परिषद, राजस्थानी सेवा समिती आणि ब्रह्म फाउंडेशनतर्फे ठाण्याच्या मॉडेल मिल मैदानात हा सोहळा पार पडला. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून ही जोडपी येथे आली होती. सोहळ्याला प्रारंभ होण्याआधी विधिवत पूजा करण्यात आली. आचार्य सुभाष शर्मा यांच्या उपस्थितीत हा सामूहिक विवाह सोहळा झाला. अनेकांचे नातेवाईक या वेळी उपस्थित होते.पन्नाशी ओलांडलेल्या एका जोडप्याने सांगितले की, गेली ३० वर्षे आम्ही परस्परांवर प्रेम केले. मात्र मुलीच्या घरातून लग्नाला विरोध होता. लग्न केले तर जीव देऊ, अशी धमकी तिच्या माता-पित्याने दिली होती. त्यामुळे इतकी दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यावर आता विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. यातील वराचे वय ५५ वर्षे तर वधूचे वय ५३ वर्षे आहे. ज्यांना नातलग नव्हते, त्यांच्यासाठी सामाजिक कार्य करणाऱ्यांनी कन्यादानासह विधी पार पाडले. दृष्टिहीन, आदिवासी, दिव्यांग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशी १०८ जोडपी एकाच मांडवात विवाहबद्ध झाली. संस्थेतर्फे या जोडप्यांना भांडी, मंगळसूत्र, कपडे आदी वस्तू देण्यात आल्याचे संयोजक अ‍ॅड. बी.एल. शर्मा यांनी सांगितले. या वेळी ओमप्रकाश शर्मा व संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.दृष्टिहीन जोडपे झाले विवाहबद्धसुनीता अहिरे (३०) आणि गणेश शिंदे (४०) हे दृष्टिहीन जोडपेही या सोहळ्यात विवाहबद्ध झाले. उशिरा का होईना आमचे लग्न होत आहे, याचा आनंद असल्याची भावना या जोडप्याने व्यक्त केली. आमच्या आईवडिलांनीच हे लग्न ठरविले होते, असे सांगत सुनीता म्हणाली, माझ्या वडिलांचे निधन झाल्याने दोन वर्षे हे लग्न लांबले. सुनीता ही नगरची असून गणेश मुंबईचा आहे. सुरुवातीला आम्हाला अशा पद्धतीचा सोहळा होणार आहे, याची कल्पना नव्हती. परंतु, ओळखीतून समजल्यावर लगेच नोंदणी केली. माझ्या भावाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. माझेही लग्न सामूहिक विवाह सोहळ्यातच लागले आहे. हा सोहळा हाच चांगला योग असल्याने या दोघांचा विवाह येथे लावण्याचे निश्चित केले. - कामिनी जोबनपुत्रा, वराची बहीण