शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
4
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
5
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
6
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
7
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
8
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
9
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
10
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
11
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
12
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
13
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
14
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
15
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
16
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
17
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
18
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
19
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
20
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला

व्यक्तिगत जनसंपर्कच ठरणार निर्णायक

By admin | Updated: October 16, 2014 04:36 IST

मनसे फॅक्टरमुळे झालेल्या मतविभागणीने २००९ साली काँग्रेस आघाडी २० जागांवर यशस्वी ठरली. तर युतीला केवळ ९ जागा मिळाल्या

मनसे फॅक्टरमुळे झालेल्या मतविभागणीने २००९ साली काँग्रेस आघाडी २० जागांवर यशस्वी ठरली. तर युतीला केवळ ९ जागा मिळाल्या. तर, नवख्या मनसेने सहा जागा खेचल्या. गेल्यावेळी मराठी मतांचे विभाजन प्रभावी ठरले; यंदा मात्र मतांचे ध्रुवीकरण निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. १५ टक्क्यांच्या आसपास असणारा गुजराती समाज आणि २५ टक्के मराठी समाज कोणाच्या बाजूने झुकतो यावरच निकाल अवलंबून असणार आहे. राष्ट्रवादीचे मुंबईतील अस्तित्व अगदीच तोळामासाचे असल्याने काँग्रेसच्या स्थानिक समीकरणांवर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. काँग्रेसची परंपरागत मते आणि उमेदवारांच्या व्यक्तिगत जनसंपर्क यांचे गणित जमले तरच काँग्रेसला २००९ ला मिळालेल्या जागांच्या आसपास जाता येईल. मतविभाजनामुळे विधिमंडळात काँग्रेसच्या मुंबईकर आमदारांची संख्या १७ झाली. पण, यातील चार-पाच अपवाद वगळता बाकी कुणाला मतदारसंघ बांधावा, मतदारांच्या संपर्कात राहावे, त्यांची कामे करावीत, असे वाटल्याचे दिसले नाही. शिवसेना-भाजपा युतीबाबत मात्र वेगळी परिस्थिती आहे. मराठी मतदार सेनेकडे तर उत्तर भारतीय आणि गुजराती मते भाजपाची अशीच जणू ही विभागणी होती. युती फुटल्यानंतर शिवसेनेने मराठी अस्मितेला फुंकर घालत मराठी मते जवळ करण्याचा प्रयत्न केला. गुजराती विरोधी प्रचाराने सोशल मीडियावर टोक गाठले. मराठी मते स्वत:कडे वळविण्यात काही प्रमाणात शिवसेना यशस्वी ठरल्याचे चित्र सध्या आहे. मात्र, गुजराती आणि उत्तर भारतीय मतांच्या बेरीज भाजपाला मुंबईत शिवसेनेच्या बरोबरीला आणणार का, हा कळीचा मुद्दा आहे. केवळ शिवसेनेच्या मेहेरबानीवर भाजपा जिंकते, या गृहीतकाला धक्का बसणार आहे. भाजपाचा यश निर्विवादपणे त्यांचे स्वत:चे असेल. असेच काहीसे मनसेबाबत ठरणार आहे. लाटेमुळे मिळालेले यश पक्षसंघटनेच्या आधारे टिकवावे आणि वाढवावे लागते. मनसे नेत्यांनी काय केले, हेच निकालातून प्रतिबिंबित होणार आहे.