शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

व्यक्तिगत जनसंपर्कच ठरणार निर्णायक

By admin | Updated: October 16, 2014 04:36 IST

मनसे फॅक्टरमुळे झालेल्या मतविभागणीने २००९ साली काँग्रेस आघाडी २० जागांवर यशस्वी ठरली. तर युतीला केवळ ९ जागा मिळाल्या

मनसे फॅक्टरमुळे झालेल्या मतविभागणीने २००९ साली काँग्रेस आघाडी २० जागांवर यशस्वी ठरली. तर युतीला केवळ ९ जागा मिळाल्या. तर, नवख्या मनसेने सहा जागा खेचल्या. गेल्यावेळी मराठी मतांचे विभाजन प्रभावी ठरले; यंदा मात्र मतांचे ध्रुवीकरण निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. १५ टक्क्यांच्या आसपास असणारा गुजराती समाज आणि २५ टक्के मराठी समाज कोणाच्या बाजूने झुकतो यावरच निकाल अवलंबून असणार आहे. राष्ट्रवादीचे मुंबईतील अस्तित्व अगदीच तोळामासाचे असल्याने काँग्रेसच्या स्थानिक समीकरणांवर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. काँग्रेसची परंपरागत मते आणि उमेदवारांच्या व्यक्तिगत जनसंपर्क यांचे गणित जमले तरच काँग्रेसला २००९ ला मिळालेल्या जागांच्या आसपास जाता येईल. मतविभाजनामुळे विधिमंडळात काँग्रेसच्या मुंबईकर आमदारांची संख्या १७ झाली. पण, यातील चार-पाच अपवाद वगळता बाकी कुणाला मतदारसंघ बांधावा, मतदारांच्या संपर्कात राहावे, त्यांची कामे करावीत, असे वाटल्याचे दिसले नाही. शिवसेना-भाजपा युतीबाबत मात्र वेगळी परिस्थिती आहे. मराठी मतदार सेनेकडे तर उत्तर भारतीय आणि गुजराती मते भाजपाची अशीच जणू ही विभागणी होती. युती फुटल्यानंतर शिवसेनेने मराठी अस्मितेला फुंकर घालत मराठी मते जवळ करण्याचा प्रयत्न केला. गुजराती विरोधी प्रचाराने सोशल मीडियावर टोक गाठले. मराठी मते स्वत:कडे वळविण्यात काही प्रमाणात शिवसेना यशस्वी ठरल्याचे चित्र सध्या आहे. मात्र, गुजराती आणि उत्तर भारतीय मतांच्या बेरीज भाजपाला मुंबईत शिवसेनेच्या बरोबरीला आणणार का, हा कळीचा मुद्दा आहे. केवळ शिवसेनेच्या मेहेरबानीवर भाजपा जिंकते, या गृहीतकाला धक्का बसणार आहे. भाजपाचा यश निर्विवादपणे त्यांचे स्वत:चे असेल. असेच काहीसे मनसेबाबत ठरणार आहे. लाटेमुळे मिळालेले यश पक्षसंघटनेच्या आधारे टिकवावे आणि वाढवावे लागते. मनसे नेत्यांनी काय केले, हेच निकालातून प्रतिबिंबित होणार आहे.