शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

करुळ घाटात संरक्षक कठडा ढासळून रस्त्यालगत भगदाड; एकेरी वाहतूक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 00:30 IST

आठवडाभर कोसळणा-या पावसामुळे करुळ घाटातील संरक्षक कठडा ढासळून रस्त्यालगत भगदाड पडले आहे.

- प्रकाश काळे वैभववाडी(सिंधुदुर्ग): आठवडाभर कोसळणा-या पावसामुळे करुळ घाटातील संरक्षक कठडा ढासळून रस्त्यालगत भगदाड पडले आहे. त्यामुळे भगदाडाभोवती मातीचे ढिगारे ओतून घाटातून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना हाती न घेतल्यास रस्ता खचून वाहतूक ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.करुळ घाटातील 'यू' आकाराच्या वळणाच्या अलिकडे सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरील दगडी बांधकाम असलेला संरक्षक कठडा अतिवृष्टीमुळे शनिवारी दुपारी ढासळला. त्यामुळे रस्त्यालगत भगदाड पडले आहे. कठडा ढासळून भगदाड पडल्याचे कळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने मातीचे ढिगारे ओतून खचलेला भाग संरक्षित केला आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे.भगदाड पडलेल्या ठिकाणी खोल दरी असून त्या भागात सद्या दिवसरात्र दाट धुके असल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे. अन्यथा पावसामुळे रस्ता खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाल्यास करुळ घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची चिन्हे दिसत आहेत. ढासळलेल्या कठड्याच्या जागी भगदाड वाढू नये याची खबरदारी सार्वजनिक बांधकाम विभाग कशा प्रकारे घेणार हे पाहावे लागणार आहे.