शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

नोटाबंदीमुळे श्रमिक वर्गाचे कंबरडे मोडले!, राजू शेट्टींचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 03:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे असंघटित कामगारांसह शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले असून अद्यात या निर्णयाच्या परिणामांमधून श्रमिक वर्ग सावरला नसल्याची टीका

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे असंघटित कामगारांसह शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले असून अद्यात या निर्णयाच्या परिणामांमधून श्रमिक वर्ग सावरला नसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. वर्षपूर्तीचे निमित्त साधत विविध सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि कामगार संघटनांनी एकत्रित येत आझाद मैदानात नोटबंदीवरून सरकारविरोधात हल्लाबोल केला. यावेळी शेट्टी बोलत होते.ते म्हणाले की, अद्याप शेतकरी, शेत मजूर आणि कामगार वर्ग नोटबंदीच्या परिणामांतून सावरलेला नाही. ऐन रब्बीच्या हंगामात जाहीर झालेल्या या निर्णयामुळे शेतकºयांना भाजीपाला रस्त्यावर फेकून द्यावा लागला. शेतमालाचा व्यवहार रोखीने होत असल्याने त्याचा सर्वाधिक त्रास शेतकरीवर्गाने सहन केला. छोट्या संस्था बंद पडल्या असून राज्य बँकाही अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, आगामी निवडणुकांत या नोटबंदीचे उत्तर व्होटबंदीतून श्रमिक देतील.या निदर्शनांत डावे पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, पत्रकार मोठ्या संख्येने एकवटले होते. त्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, उल्का महाजन, शेतकरी नेते रघुनाथ पाटील, माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर, प्रभाकर नारकर, ज्योती बडेकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, जतीन देसाई, फिरोज मिठीबोरवाला यांचा समावेश होता.नोटबंदीनंतर काळा पैसा सरकारी तिजोरीत आल्याने सामाजिक क्षेत्रांच्या वाट्याला मोठा निधी येऊन विकास होण्याची आशा सरकारने दाखवली होती. मात्र तसे काहीच झाले नाही. उलट सामाजिक क्षेत्रांच्या विकास निधीत यंदा सरकारने कपात केली आहे. अंगणवाडीसारख्या महत्त्वाच्या क्षेत्राच्या अर्थ संकल्पाला सरकारने ६२ टक्क्यांची कात्री लावली. नुकतेच राज्य शासनाने अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांचे धान्य ३५ किलोंवरून ५ किलोपर्यंत घटवले आहे. त्यामुळे सामाजिक क्षेत्रासाठी तरी ही नोटबंदी फसवी ठरली आहे.- उल्का महाजन, सामाजिक कार्यकर्त्याफायदा कोणाला झाला!नोटबंदीनंतर अर्थ व्यवस्थेची वाटचाल उताराला लागली आहे. सर्व पैसा परत आल्याचे बँक प्रशासन सांगते. दहशतवादी हल्ले थांबतील असा दावा केल्यानंतरही सातत्याने हल्ले सुरू आहेत. कष्टकरी आणि मजूरांचा रोजगार कमी झाला आहे. मग नोटबंदीचा फायदा नेमका कोणाला झाला, हे तरी सरकारने स्पष्ट करावे.- अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्याडिजिटलकडून रोखीकडे वाटचाल!डिजिटल इंडियाचा दावा करणाºया सरकारच्या भीम अ‍ॅपचा वापर कमी झाला आहे. लोक पुन्हा रोखीच्या व्यवहारांकडे वळले आहेत. नोटबंदीनंतरच्या पहिल्या चार महिन्यांत १५ लाख लोकांच्या नोकºया गेल्या आहेत. नोटबंदीमागे नैतिक कारणे असल्याचे कारण केंद्रीय अर्थ मंत्री देत असले, तरी सर्वसामान्यांना नोटबंदीमागे आर्थिक कारण असल्याचे कळाले आहे. त्यामुळे लोकांमधील असंतोष वाढू लागला असून पुन्हा सरकारकडून हिंदू-मुस्लिम आणि मंदीर-मशिदीचा वाद उकरून काढण्याची शक्यता आहे.- भालचंद्र मुणगेकर, अर्थ तज्ज्ञ व माजी कुलगुरू-मुंबई विद्यापीठ

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीNote Banनोटाबंदी