शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीमुळे श्रमिक वर्गाचे कंबरडे मोडले!, राजू शेट्टींचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 03:56 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे असंघटित कामगारांसह शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले असून अद्यात या निर्णयाच्या परिणामांमधून श्रमिक वर्ग सावरला नसल्याची टीका

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे असंघटित कामगारांसह शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले असून अद्यात या निर्णयाच्या परिणामांमधून श्रमिक वर्ग सावरला नसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. वर्षपूर्तीचे निमित्त साधत विविध सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि कामगार संघटनांनी एकत्रित येत आझाद मैदानात नोटबंदीवरून सरकारविरोधात हल्लाबोल केला. यावेळी शेट्टी बोलत होते.ते म्हणाले की, अद्याप शेतकरी, शेत मजूर आणि कामगार वर्ग नोटबंदीच्या परिणामांतून सावरलेला नाही. ऐन रब्बीच्या हंगामात जाहीर झालेल्या या निर्णयामुळे शेतकºयांना भाजीपाला रस्त्यावर फेकून द्यावा लागला. शेतमालाचा व्यवहार रोखीने होत असल्याने त्याचा सर्वाधिक त्रास शेतकरीवर्गाने सहन केला. छोट्या संस्था बंद पडल्या असून राज्य बँकाही अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, आगामी निवडणुकांत या नोटबंदीचे उत्तर व्होटबंदीतून श्रमिक देतील.या निदर्शनांत डावे पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, पत्रकार मोठ्या संख्येने एकवटले होते. त्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, उल्का महाजन, शेतकरी नेते रघुनाथ पाटील, माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर, प्रभाकर नारकर, ज्योती बडेकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, जतीन देसाई, फिरोज मिठीबोरवाला यांचा समावेश होता.नोटबंदीनंतर काळा पैसा सरकारी तिजोरीत आल्याने सामाजिक क्षेत्रांच्या वाट्याला मोठा निधी येऊन विकास होण्याची आशा सरकारने दाखवली होती. मात्र तसे काहीच झाले नाही. उलट सामाजिक क्षेत्रांच्या विकास निधीत यंदा सरकारने कपात केली आहे. अंगणवाडीसारख्या महत्त्वाच्या क्षेत्राच्या अर्थ संकल्पाला सरकारने ६२ टक्क्यांची कात्री लावली. नुकतेच राज्य शासनाने अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांचे धान्य ३५ किलोंवरून ५ किलोपर्यंत घटवले आहे. त्यामुळे सामाजिक क्षेत्रासाठी तरी ही नोटबंदी फसवी ठरली आहे.- उल्का महाजन, सामाजिक कार्यकर्त्याफायदा कोणाला झाला!नोटबंदीनंतर अर्थ व्यवस्थेची वाटचाल उताराला लागली आहे. सर्व पैसा परत आल्याचे बँक प्रशासन सांगते. दहशतवादी हल्ले थांबतील असा दावा केल्यानंतरही सातत्याने हल्ले सुरू आहेत. कष्टकरी आणि मजूरांचा रोजगार कमी झाला आहे. मग नोटबंदीचा फायदा नेमका कोणाला झाला, हे तरी सरकारने स्पष्ट करावे.- अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्याडिजिटलकडून रोखीकडे वाटचाल!डिजिटल इंडियाचा दावा करणाºया सरकारच्या भीम अ‍ॅपचा वापर कमी झाला आहे. लोक पुन्हा रोखीच्या व्यवहारांकडे वळले आहेत. नोटबंदीनंतरच्या पहिल्या चार महिन्यांत १५ लाख लोकांच्या नोकºया गेल्या आहेत. नोटबंदीमागे नैतिक कारणे असल्याचे कारण केंद्रीय अर्थ मंत्री देत असले, तरी सर्वसामान्यांना नोटबंदीमागे आर्थिक कारण असल्याचे कळाले आहे. त्यामुळे लोकांमधील असंतोष वाढू लागला असून पुन्हा सरकारकडून हिंदू-मुस्लिम आणि मंदीर-मशिदीचा वाद उकरून काढण्याची शक्यता आहे.- भालचंद्र मुणगेकर, अर्थ तज्ज्ञ व माजी कुलगुरू-मुंबई विद्यापीठ

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीNote Banनोटाबंदी