शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

भाकरीचे पीक करपले!

By admin | Updated: August 29, 2014 03:11 IST

लांबलेल्या पावसामुळे भात, ज्वारी, बाजरी, नाचणी या पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे : लांबलेल्या पावसामुळे भात, ज्वारी, बाजरी, नाचणी या पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाकरीचे पीक करपल्याचे चित्र असून, भाताचे देखील नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. जुलै महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत पावसाअभावी राज्यातील पेरण्या रखडल्या होत्या. त्याचा फटका खाद्यान्न पिकाला बसला आहे. सोयाबीन, मका, कापूस, ऊस ही पिके वगळता इतर पिकांच्या पेरण्यांना फटका बसला आहे. राज्याचे खरीपाचे सरासरी क्षेत्र १३४.७० लाख हेक्टर असून, त्यापैकी १२६.५० लाख हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. राज्यात अ‍ॅगस्ट महिन्यातील शेवटच्या आठवड्यापर्यंत सरासरी ८७०.५० मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा केवळ ५६५ मिलिमीटर (६४.९ टक्के) पाऊस झाला. त्यातही जालना, बीड, लातुर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यात सरासरीच्या केवळ २५ ते ५० टक्के पाऊस झाल्याने पेरण्यांची स्थिती बिकट आहे. भाताचे सरासरी क्षेत्र १४ लाख ९२ हजार ६०० हेक्टर असून त्यापैकी १२ लाख ७२ हजार ६०० (८५ टक्के) हेक्टरवरील पेरण्या झाल्या आहेत. ज्वारीचे क्षेत्र ११ लाख ४४ हजार ४०० हेक्टर असून, ४ लाख ३३ हजार ८०० (३८ टक्के) हेक्टर, तर बाजरीची ११ लाख ३३ हजार ८०० पैकी ५ लाख ८२ हजार ८०० हेक्टरवर (५१ टक्के) पेरणी झाली आहे. नाचणीचे क्षेत्र १ लाख २५ हजार ९०० हेक्टर असून, ७६ हजार १०० (६० टक्के) हेक्टरवर पेरणी झाली आहे. मक्याचे क्षेत्र ६ लाख हेक्टरवरून ७ लाख ४० हजार ८०० (१२३ टक्के) हेक्टरपर्यंत वाढले आहे. तूर, मूग, उडीद व इतर कडधान्यांचे सरासरी क्षेत्र २२ लाख ४७ हजार २०० हेक्टर असून, १५ लाख ५६ हजार ७०० हेक्टरवरील (६९ टक्के) पेरणीची कामे उरकली आहेत. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २७ लाख ९९ हजार ४०० हेक्टरवरून ३६ लाख ७० हजार ३०० (१३१ टक्के) हेक्टरवर पोचले आहे. कापसाचे क्षेत्र ३३ लाख ५६ हजार ४०० हेक्टरवरून ४० लाख २९ हजार २०० (१२० टक्के) हेक्टरवर गेले आहे. ऊसाचे क्षेत्र ९ लाख ५५ हजार १०० हेक्टरवरुन ११ लाख ७० हजार ७०० हेक्टरवर (१२३ टक्के) गेले आहे. (प्रतिनिधी)