शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भाकरीचे पीक करपले!

By admin | Updated: August 29, 2014 03:11 IST

लांबलेल्या पावसामुळे भात, ज्वारी, बाजरी, नाचणी या पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे : लांबलेल्या पावसामुळे भात, ज्वारी, बाजरी, नाचणी या पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाकरीचे पीक करपल्याचे चित्र असून, भाताचे देखील नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. जुलै महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत पावसाअभावी राज्यातील पेरण्या रखडल्या होत्या. त्याचा फटका खाद्यान्न पिकाला बसला आहे. सोयाबीन, मका, कापूस, ऊस ही पिके वगळता इतर पिकांच्या पेरण्यांना फटका बसला आहे. राज्याचे खरीपाचे सरासरी क्षेत्र १३४.७० लाख हेक्टर असून, त्यापैकी १२६.५० लाख हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. राज्यात अ‍ॅगस्ट महिन्यातील शेवटच्या आठवड्यापर्यंत सरासरी ८७०.५० मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा केवळ ५६५ मिलिमीटर (६४.९ टक्के) पाऊस झाला. त्यातही जालना, बीड, लातुर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यात सरासरीच्या केवळ २५ ते ५० टक्के पाऊस झाल्याने पेरण्यांची स्थिती बिकट आहे. भाताचे सरासरी क्षेत्र १४ लाख ९२ हजार ६०० हेक्टर असून त्यापैकी १२ लाख ७२ हजार ६०० (८५ टक्के) हेक्टरवरील पेरण्या झाल्या आहेत. ज्वारीचे क्षेत्र ११ लाख ४४ हजार ४०० हेक्टर असून, ४ लाख ३३ हजार ८०० (३८ टक्के) हेक्टर, तर बाजरीची ११ लाख ३३ हजार ८०० पैकी ५ लाख ८२ हजार ८०० हेक्टरवर (५१ टक्के) पेरणी झाली आहे. नाचणीचे क्षेत्र १ लाख २५ हजार ९०० हेक्टर असून, ७६ हजार १०० (६० टक्के) हेक्टरवर पेरणी झाली आहे. मक्याचे क्षेत्र ६ लाख हेक्टरवरून ७ लाख ४० हजार ८०० (१२३ टक्के) हेक्टरपर्यंत वाढले आहे. तूर, मूग, उडीद व इतर कडधान्यांचे सरासरी क्षेत्र २२ लाख ४७ हजार २०० हेक्टर असून, १५ लाख ५६ हजार ७०० हेक्टरवरील (६९ टक्के) पेरणीची कामे उरकली आहेत. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २७ लाख ९९ हजार ४०० हेक्टरवरून ३६ लाख ७० हजार ३०० (१३१ टक्के) हेक्टरवर पोचले आहे. कापसाचे क्षेत्र ३३ लाख ५६ हजार ४०० हेक्टरवरून ४० लाख २९ हजार २०० (१२० टक्के) हेक्टरवर गेले आहे. ऊसाचे क्षेत्र ९ लाख ५५ हजार १०० हेक्टरवरुन ११ लाख ७० हजार ७०० हेक्टरवर (१२३ टक्के) गेले आहे. (प्रतिनिधी)