शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कारगिलच्या युद्ध क्षेत्रात सोलापूरच्या जवानांचे शौर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:51 IST

कारगील विजय दिन;देशाच्या स्वातंत्र्यानंतर आजतागायत झालेल्या विविध युद्धात सोलापूर जिल्ह्यातील ५८ सैनिक शहीद झाले.

ठळक मुद्देकारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना  मानवंदना देण्यात येणार ४ वीर पत्नी आणि माजी सैनिकांना स्वयंरोजगार व घरबांधणीसाठी ९ लाख ५६ हजारांचे आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात येणारवीरपत्नी व माता-पिता आणि माजी सैनिक अशा सात जणांना एसटीचे मोफत प्रवास सवलतीचे पास

सोलापूर : पाकिस्तानने कारगिलच्या टेकड्यांवर कब्जा केल्याचे समजल्यानंतर भारतीय लष्कर सतर्क झाले अन् दोन देशांदरम्यान अघोषित युद्ध सुरू झाले. साºया जगाचे लक्ष या युद्धाकडे लागून होते. भारतीय जवान पाकिस्तानी लष्कराला कसे प्रत्त्युतर देतात हेही, पाहिले जात होते. पण भारतीय सैन्याने आपले शौर्य दाखवून पाकिस्तानला पराभवाची धूळ चाखली अन् ‘विजय दिवस’ साजरा केला.

या युद्धात सोलापूर जिल्ह्यातील जवानांनी शौर्याची पराकाष्टा करुन पाक सैन्याशी लढा दिला. शिपाई सुरेश देशमुख, सोनंद (ता. सांगोला) हे आॅपरेशन विजयमध्ये पाक लष्कराशी लढताना शहीद झाले तर कारगिल युद्धादरम्यान काळातच झालेल्या आॅपरेशन डेव्हिड, आॅपरेशन मेघदूतमध्ये अनुक्रमे शिपाई कमल काझी, सापटणे (ता. माढा), नायक सुबेदार किसन माने, येर्डाव (ता. मंगळवेढा) यांनी हौतात्मे पत्करले. याच काळामध्ये काश्मिर सीमेवर आतरिकीशी लढताना जुना देगाव नाका येथे सुनील कोळी, मणिपूर जवळील जरीबाम येथे नक्षलवाद्याशी दोन हात करताना शिरपनहळ्ळीचे (ता. दक्षिण सोलापूर) नामदेव काशीद शहीद झाले.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर आजतागायत झालेल्या विविध युद्धात सोलापूर जिल्ह्यातील ५८ सैनिक शहीद झाले आहेत. यापैकी ४४ शहीद जवानांचे वारस आहेत. यामध्ये ३६ वीरपत्नी व ८ माता-पित्यांचा समावेश आहे. कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना  मानवंदना देण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी बारा वाजता बहुउद्देशीय सभागृहात शहीद जवानांच्या वीरपत्नी व वीर माता-पित्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी १४ वीर पत्नी आणि माजी सैनिकांना स्वयंरोजगार व घरबांधणीसाठी ९ लाख ५६ हजारांचे आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात येणार आहेत. तसेच वीरपत्नी व माता-पिता आणि माजी सैनिक अशा सात जणांना एसटीचे मोफत प्रवास सवलतीचे पास देण्यात येतील. 

देश स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे १९४७ नंतर आत्तापर्यंत  विविध ठिकाणी युद्ध झाले आहेत. १९६२ मध्ये चीन, १९६५ मध्ये पाकिस्तान, १९७१ मध्ये पाकिस्तान, १९८७ ते ८९ दरम्यान श्रीलंकेत आॅपरेशन पवन आणि  यानंतर १९९९ मध्ये कारगिल युद्ध झाले. कारगिल युद्ध हे आजपर्यंत झालेल्या युद्धातील, जगात सर्वात उंचीवर लढलेले युद्ध म्हणून नोंदले गेले आहे. या युद्धात ५२७ जवान शहीद झाले तर १३६३ जवान जखमी झाले होते. २६ जुलै रोजी कारगिल युद्धात विजय मिळाला. त्यामुळे हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून पाळला जातो. 

टॅग्स :SolapurसोलापूरKargil Vijay Diwasकारगिल विजय दिनSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयPakistanपाकिस्तान