शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

कारगिलच्या युद्ध क्षेत्रात सोलापूरच्या जवानांचे शौर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:51 IST

कारगील विजय दिन;देशाच्या स्वातंत्र्यानंतर आजतागायत झालेल्या विविध युद्धात सोलापूर जिल्ह्यातील ५८ सैनिक शहीद झाले.

ठळक मुद्देकारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना  मानवंदना देण्यात येणार ४ वीर पत्नी आणि माजी सैनिकांना स्वयंरोजगार व घरबांधणीसाठी ९ लाख ५६ हजारांचे आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात येणारवीरपत्नी व माता-पिता आणि माजी सैनिक अशा सात जणांना एसटीचे मोफत प्रवास सवलतीचे पास

सोलापूर : पाकिस्तानने कारगिलच्या टेकड्यांवर कब्जा केल्याचे समजल्यानंतर भारतीय लष्कर सतर्क झाले अन् दोन देशांदरम्यान अघोषित युद्ध सुरू झाले. साºया जगाचे लक्ष या युद्धाकडे लागून होते. भारतीय जवान पाकिस्तानी लष्कराला कसे प्रत्त्युतर देतात हेही, पाहिले जात होते. पण भारतीय सैन्याने आपले शौर्य दाखवून पाकिस्तानला पराभवाची धूळ चाखली अन् ‘विजय दिवस’ साजरा केला.

या युद्धात सोलापूर जिल्ह्यातील जवानांनी शौर्याची पराकाष्टा करुन पाक सैन्याशी लढा दिला. शिपाई सुरेश देशमुख, सोनंद (ता. सांगोला) हे आॅपरेशन विजयमध्ये पाक लष्कराशी लढताना शहीद झाले तर कारगिल युद्धादरम्यान काळातच झालेल्या आॅपरेशन डेव्हिड, आॅपरेशन मेघदूतमध्ये अनुक्रमे शिपाई कमल काझी, सापटणे (ता. माढा), नायक सुबेदार किसन माने, येर्डाव (ता. मंगळवेढा) यांनी हौतात्मे पत्करले. याच काळामध्ये काश्मिर सीमेवर आतरिकीशी लढताना जुना देगाव नाका येथे सुनील कोळी, मणिपूर जवळील जरीबाम येथे नक्षलवाद्याशी दोन हात करताना शिरपनहळ्ळीचे (ता. दक्षिण सोलापूर) नामदेव काशीद शहीद झाले.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर आजतागायत झालेल्या विविध युद्धात सोलापूर जिल्ह्यातील ५८ सैनिक शहीद झाले आहेत. यापैकी ४४ शहीद जवानांचे वारस आहेत. यामध्ये ३६ वीरपत्नी व ८ माता-पित्यांचा समावेश आहे. कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना  मानवंदना देण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी बारा वाजता बहुउद्देशीय सभागृहात शहीद जवानांच्या वीरपत्नी व वीर माता-पित्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी १४ वीर पत्नी आणि माजी सैनिकांना स्वयंरोजगार व घरबांधणीसाठी ९ लाख ५६ हजारांचे आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात येणार आहेत. तसेच वीरपत्नी व माता-पिता आणि माजी सैनिक अशा सात जणांना एसटीचे मोफत प्रवास सवलतीचे पास देण्यात येतील. 

देश स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे १९४७ नंतर आत्तापर्यंत  विविध ठिकाणी युद्ध झाले आहेत. १९६२ मध्ये चीन, १९६५ मध्ये पाकिस्तान, १९७१ मध्ये पाकिस्तान, १९८७ ते ८९ दरम्यान श्रीलंकेत आॅपरेशन पवन आणि  यानंतर १९९९ मध्ये कारगिल युद्ध झाले. कारगिल युद्ध हे आजपर्यंत झालेल्या युद्धातील, जगात सर्वात उंचीवर लढलेले युद्ध म्हणून नोंदले गेले आहे. या युद्धात ५२७ जवान शहीद झाले तर १३६३ जवान जखमी झाले होते. २६ जुलै रोजी कारगिल युद्धात विजय मिळाला. त्यामुळे हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून पाळला जातो. 

टॅग्स :SolapurसोलापूरKargil Vijay Diwasकारगिल विजय दिनSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयPakistanपाकिस्तान