शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

By admin | Updated: March 9, 2015 02:29 IST

राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारने शेतकरी, व्यापारी, मुस्लीम, मराठा, धनगर, मागासवर्गीय यांची गेल्या शंभर दिवसात घोर फसवणूक केली आहे.

मुंबई : राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारने शेतकरी, व्यापारी, मुस्लीम, मराठा, धनगर, मागासवर्गीय यांची गेल्या शंभर दिवसात घोर फसवणूक केली आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांपासून घूमजाव करणारे हे सरकार आहे. त्यामुळे या सरकारने आपल्या शंभर दिवसांच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढावी ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी विधिमंडळाच्या सोमवारपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लावून धरण्यात येणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. अशा सरकारचा चहा घेणे म्हणजे जनतेचा अनादर होईल त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याचे त्यांनी सांगितले.विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट, एमआयएम, समाजवादी पार्टी, शेकाप, मनसे व लोकभारतीचे कपिल पाटील या सर्वांशी चर्चा करून चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस या सर्वच नैसर्गिक आपत्तींच्यावेळी सरकारने शेतकऱ्यांना मदत न देऊन आपल्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडवले. आता तर दुष्काळात मदत मिळालेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची मदत न देण्याचा फतवा सरकारने काढला आहे. (विशेष प्रतिनिधी)