शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दोघेही युतीचे मारेकरी

By admin | Updated: January 28, 2017 01:09 IST

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजपा दोघांनाही युती नकोच होती. त्यामुळे एकमेकांना स्वीकारार्ह होणार नाहीत, अशा अटी टाकल्याने दोघेही युतीचे मारेकरी

यदु जोशी / मुंबईमुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजपा दोघांनाही युती नकोच होती. त्यामुळे एकमेकांना स्वीकारार्ह होणार नाहीत, अशा अटी टाकल्याने दोघेही युतीचे मारेकरी असल्याचे संपूर्ण घटनाक्रमावरून स्पष्ट होते.दोन्ही पक्षांचे नेते चर्चेला बसलेले असतानाच २२७ उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम वेगात सुरू होते. शिवसेनेने युतीची वाट न बघता वचननामादेखील जाहीर केला. राज्यामध्ये सत्तेत असलेल्या दोन पक्षांपैकी मुंबईवर राज्य कोणाचे ही वर्चस्वाची घमासान लढाई आता बघायला मिळणार आहे.मुंबई महापालिकेत शिवसेना मोठा भाऊ तर भाजपा लहान हे आजवरचे समीकरण. राज्यात भाजपा नंबर एकचा पक्ष झाला तरी मुंबईतील शिवसेनेचे मोठेपण कायमच होते. युतीच्या बोलणीची सुरुवात करतानाच, भाजपाने हे मोठेपण नाकारत समसमान म्हणजे २२७ पैकी ११४ जागा मागितल्या. ‘आपण तर मुंबईचे राजे!’ ही भावना असलेल्या शिवसेनेला त्यांच्या अंगणात आपल्या बरोबरीने कोणी येऊ पाहातेय, हे मान्य होणेच शक्य नव्हते. दोनच दिवसांत सेनेने ठणकावून सांगितले, ‘६० जागा घ्या नाहीतर घरी जा.’ भाजपाला आॅफर देण्यापेक्षा अपमानित करण्याचच केवळ हेतू असावा, असे या आकड्यावरून जाणवले. शिवसेना साठची फार तर ७५ ते ८० जागा देईल, हे लक्षात घेऊन भाजपानेही ११४ चा हेका सोडला नाही. युती होण्यातील तो सगळ््यात मोठा अडसर शेवटपर्यंत कायम राहिला. भाजपानेही नवीन प्रस्ताव शेवटपर्यंत दिला नाही किंवा युतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल असल्याने, ते शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून युतीची गाडी रुळावर आणतील, असे वाटत होते, पण तसे घडले नाही. स्वबळावर लढण्याचा पक्षांतर्गत दबाव मुख्यमंत्र्यांवर सुरुवातीपासूनच होता. शिवसेनेकडून ७५-८० जागा घेऊन लढण्यापेक्षा २२७ जागा लढून मोठे यश मिळवावे, हा विचार मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या टप्प्यात पक्का केला आणि वर्षा व मातोश्रीदरम्यान एरवी अनेक विषयांवर चर्चेसाठी असलेली हॉटलाइनच बंद पडली.