शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

दोघेही युतीचे मारेकरी

By admin | Updated: January 28, 2017 01:09 IST

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजपा दोघांनाही युती नकोच होती. त्यामुळे एकमेकांना स्वीकारार्ह होणार नाहीत, अशा अटी टाकल्याने दोघेही युतीचे मारेकरी

यदु जोशी / मुंबईमुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजपा दोघांनाही युती नकोच होती. त्यामुळे एकमेकांना स्वीकारार्ह होणार नाहीत, अशा अटी टाकल्याने दोघेही युतीचे मारेकरी असल्याचे संपूर्ण घटनाक्रमावरून स्पष्ट होते.दोन्ही पक्षांचे नेते चर्चेला बसलेले असतानाच २२७ उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम वेगात सुरू होते. शिवसेनेने युतीची वाट न बघता वचननामादेखील जाहीर केला. राज्यामध्ये सत्तेत असलेल्या दोन पक्षांपैकी मुंबईवर राज्य कोणाचे ही वर्चस्वाची घमासान लढाई आता बघायला मिळणार आहे.मुंबई महापालिकेत शिवसेना मोठा भाऊ तर भाजपा लहान हे आजवरचे समीकरण. राज्यात भाजपा नंबर एकचा पक्ष झाला तरी मुंबईतील शिवसेनेचे मोठेपण कायमच होते. युतीच्या बोलणीची सुरुवात करतानाच, भाजपाने हे मोठेपण नाकारत समसमान म्हणजे २२७ पैकी ११४ जागा मागितल्या. ‘आपण तर मुंबईचे राजे!’ ही भावना असलेल्या शिवसेनेला त्यांच्या अंगणात आपल्या बरोबरीने कोणी येऊ पाहातेय, हे मान्य होणेच शक्य नव्हते. दोनच दिवसांत सेनेने ठणकावून सांगितले, ‘६० जागा घ्या नाहीतर घरी जा.’ भाजपाला आॅफर देण्यापेक्षा अपमानित करण्याचच केवळ हेतू असावा, असे या आकड्यावरून जाणवले. शिवसेना साठची फार तर ७५ ते ८० जागा देईल, हे लक्षात घेऊन भाजपानेही ११४ चा हेका सोडला नाही. युती होण्यातील तो सगळ््यात मोठा अडसर शेवटपर्यंत कायम राहिला. भाजपानेही नवीन प्रस्ताव शेवटपर्यंत दिला नाही किंवा युतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल असल्याने, ते शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून युतीची गाडी रुळावर आणतील, असे वाटत होते, पण तसे घडले नाही. स्वबळावर लढण्याचा पक्षांतर्गत दबाव मुख्यमंत्र्यांवर सुरुवातीपासूनच होता. शिवसेनेकडून ७५-८० जागा घेऊन लढण्यापेक्षा २२७ जागा लढून मोठे यश मिळवावे, हा विचार मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या टप्प्यात पक्का केला आणि वर्षा व मातोश्रीदरम्यान एरवी अनेक विषयांवर चर्चेसाठी असलेली हॉटलाइनच बंद पडली.