शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
4
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
8
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
9
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
10
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
11
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
12
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
13
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
14
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
15
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
16
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
17
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
18
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
19
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
20
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

दोघेही युतीचे मारेकरी

By admin | Updated: January 28, 2017 01:09 IST

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजपा दोघांनाही युती नकोच होती. त्यामुळे एकमेकांना स्वीकारार्ह होणार नाहीत, अशा अटी टाकल्याने दोघेही युतीचे मारेकरी

यदु जोशी / मुंबईमुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजपा दोघांनाही युती नकोच होती. त्यामुळे एकमेकांना स्वीकारार्ह होणार नाहीत, अशा अटी टाकल्याने दोघेही युतीचे मारेकरी असल्याचे संपूर्ण घटनाक्रमावरून स्पष्ट होते.दोन्ही पक्षांचे नेते चर्चेला बसलेले असतानाच २२७ उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम वेगात सुरू होते. शिवसेनेने युतीची वाट न बघता वचननामादेखील जाहीर केला. राज्यामध्ये सत्तेत असलेल्या दोन पक्षांपैकी मुंबईवर राज्य कोणाचे ही वर्चस्वाची घमासान लढाई आता बघायला मिळणार आहे.मुंबई महापालिकेत शिवसेना मोठा भाऊ तर भाजपा लहान हे आजवरचे समीकरण. राज्यात भाजपा नंबर एकचा पक्ष झाला तरी मुंबईतील शिवसेनेचे मोठेपण कायमच होते. युतीच्या बोलणीची सुरुवात करतानाच, भाजपाने हे मोठेपण नाकारत समसमान म्हणजे २२७ पैकी ११४ जागा मागितल्या. ‘आपण तर मुंबईचे राजे!’ ही भावना असलेल्या शिवसेनेला त्यांच्या अंगणात आपल्या बरोबरीने कोणी येऊ पाहातेय, हे मान्य होणेच शक्य नव्हते. दोनच दिवसांत सेनेने ठणकावून सांगितले, ‘६० जागा घ्या नाहीतर घरी जा.’ भाजपाला आॅफर देण्यापेक्षा अपमानित करण्याचच केवळ हेतू असावा, असे या आकड्यावरून जाणवले. शिवसेना साठची फार तर ७५ ते ८० जागा देईल, हे लक्षात घेऊन भाजपानेही ११४ चा हेका सोडला नाही. युती होण्यातील तो सगळ््यात मोठा अडसर शेवटपर्यंत कायम राहिला. भाजपानेही नवीन प्रस्ताव शेवटपर्यंत दिला नाही किंवा युतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल असल्याने, ते शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून युतीची गाडी रुळावर आणतील, असे वाटत होते, पण तसे घडले नाही. स्वबळावर लढण्याचा पक्षांतर्गत दबाव मुख्यमंत्र्यांवर सुरुवातीपासूनच होता. शिवसेनेकडून ७५-८० जागा घेऊन लढण्यापेक्षा २२७ जागा लढून मोठे यश मिळवावे, हा विचार मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या टप्प्यात पक्का केला आणि वर्षा व मातोश्रीदरम्यान एरवी अनेक विषयांवर चर्चेसाठी असलेली हॉटलाइनच बंद पडली.