शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

बोअरवेल खोदल्या; पण पाणीच नाही

By admin | Updated: May 30, 2014 00:14 IST

दिवसेंदिवस पाऊस कमी होत असताना पुरेशा प्रमाणात पाणी अडवून ते जमिनीतच मुरत नसल्याने बोअरवेल कितीही खोल खोदली तरी पाणी कसे लागणार

वरपगाव : दिवसेंदिवस पाऊसकाळ कमी होत असताना पुरेशा प्रमाणात पाणी अडवून ते जमिनीतच मुरत नसल्याने बोअरवेल कितीही फूट खोल खोदली तरी पाणी कसे लागणार! हे शंभर टक्के खरे असताना शेतकरी मात्र पाणाड्यांच्या भुलथापांना बळी पडून शेकडो कूपनलिका खोदण्याचे काम करीत असून केवळ मे महिन्यात तालुक्यात शेकडो बोअरवेल खोदण्यात आल्या. मात्र पाणी न लागल्याने त्यावरील करोडोंचा खर्च फुकट गेला असून या पाणाड्यांना कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. कल्याण तालुक्याच्या दुर्गम, अतिदुर्गंम, वाड्या-वस्त्यांवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक वाड्या-वस्त्यांवरील लोक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. तर बहुतांश गावांत एक ड्रम पाण्यासाठी १०० रुपये मोजावे लागत आहेत. ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी स्वत:ची बोअरवेल असावी या भावनेतून शेतकरी बोअरवेल खोदण्याचा विचार करतो. मात्र शास्त्रीय पद्धतीने पाणी न शोधता आजूबाजूच्या गावांतील पाणी दाखविणारे (पाणाडे) यांच्या मागे लागून त्यांना आपला जागेतून फिरवून पाणी दाखविण्याची विनंती करतो. तालुक्यात २० ते ३० असे पाणाडे आहेत. मात्र यांना कोणताही शास्त्रीय आधार नसल्याने शेतकर्‍यांची फसवणूक होते आहे, १० हजारांपासून ते २५, ५० हजारांपर्यंत कूपनलिका खोदण्यासाठी खर्च येतो. याशिवाय पाणाड्यांचा ‘मानपान’ वेगळाच. त्यामुळे इतके करूनही पाणी लागेलच याची खात्री नसल्याने शेतकरी पुरता बरबाद होतो. तर शास्त्रीय पद्धतीने जमिनीमध्ये पाणी शोधण्यासाठी जमिनीमध्ये अत्याधुनिक पद्धतीने इलेक्ट्रॉनिक मशिनद्वारे जमिनीची तपासणी केली जाते. जमिनीमध्ये सहा व्होल्ट बॅटरीच्या साहाय्याने ३०० ते १००० हजार फूट खोलीपर्यंत डी.सी. करंट सोडला जातो. या करंटच्या साहाय्याने जमिनीचा ‘रेझिस्टन्स’ मोजला जातो. त्यामुळे भूगर्भामध्ये पाणी आहे किंवा नाही ते समजते. यासाठी जमिनीच्या वरील थरावर स्टीलचे रॉड ठोकून नंतर त्यांना वायर जोडून त्या मशिनला जोडण्यात येतात. नंतर त्यात करंट सोडून रिडिंग घेण्यात येते. जमिनीची तपासणी करताना आठ दिशा लक्षात घेण्यात येतात. त्यामध्ये पाण्याचा प्रवाह कोणत्या दिशेने आहे ते पाहिले जाते. त्यानंतर अचूक जागा निश्चित केली जाते. थोडक्यात सांगायचे तर या पद्धतीमध्ये जमिनीची कुंडलीच तयार केली जाते. विहीर किंवा बोअरवेलला किती प्रमाणात पाणी मिळेल याची साधारण कल्पना येते. या यंत्रणेद्वारे किती खोल फुटावर किती पाणी मिळेल? दिवसाला किती लीटर पाण्याचा उपसा होऊ शकतो? याचा अंदाज येतो. त्यामुळे त्यावर किती क्षमतेचा पंप बसवावा हेही निश्चित ठरवता येतो. विशेष म्हणजे एखाद्या शेतकर्‍याने पूर्वी खोदलेल्या विहीर किंवा बोअरवेल मधीलही पाण्याची दिशा ठरवता येते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकर्‍यांना व जमिनीखालील पाण्याबाबतची हमी मिळते.