शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

बोअरवेल खोदल्या; पण पाणीच नाही

By admin | Updated: May 30, 2014 00:14 IST

दिवसेंदिवस पाऊस कमी होत असताना पुरेशा प्रमाणात पाणी अडवून ते जमिनीतच मुरत नसल्याने बोअरवेल कितीही खोल खोदली तरी पाणी कसे लागणार

वरपगाव : दिवसेंदिवस पाऊसकाळ कमी होत असताना पुरेशा प्रमाणात पाणी अडवून ते जमिनीतच मुरत नसल्याने बोअरवेल कितीही फूट खोल खोदली तरी पाणी कसे लागणार! हे शंभर टक्के खरे असताना शेतकरी मात्र पाणाड्यांच्या भुलथापांना बळी पडून शेकडो कूपनलिका खोदण्याचे काम करीत असून केवळ मे महिन्यात तालुक्यात शेकडो बोअरवेल खोदण्यात आल्या. मात्र पाणी न लागल्याने त्यावरील करोडोंचा खर्च फुकट गेला असून या पाणाड्यांना कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. कल्याण तालुक्याच्या दुर्गम, अतिदुर्गंम, वाड्या-वस्त्यांवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक वाड्या-वस्त्यांवरील लोक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. तर बहुतांश गावांत एक ड्रम पाण्यासाठी १०० रुपये मोजावे लागत आहेत. ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी स्वत:ची बोअरवेल असावी या भावनेतून शेतकरी बोअरवेल खोदण्याचा विचार करतो. मात्र शास्त्रीय पद्धतीने पाणी न शोधता आजूबाजूच्या गावांतील पाणी दाखविणारे (पाणाडे) यांच्या मागे लागून त्यांना आपला जागेतून फिरवून पाणी दाखविण्याची विनंती करतो. तालुक्यात २० ते ३० असे पाणाडे आहेत. मात्र यांना कोणताही शास्त्रीय आधार नसल्याने शेतकर्‍यांची फसवणूक होते आहे, १० हजारांपासून ते २५, ५० हजारांपर्यंत कूपनलिका खोदण्यासाठी खर्च येतो. याशिवाय पाणाड्यांचा ‘मानपान’ वेगळाच. त्यामुळे इतके करूनही पाणी लागेलच याची खात्री नसल्याने शेतकरी पुरता बरबाद होतो. तर शास्त्रीय पद्धतीने जमिनीमध्ये पाणी शोधण्यासाठी जमिनीमध्ये अत्याधुनिक पद्धतीने इलेक्ट्रॉनिक मशिनद्वारे जमिनीची तपासणी केली जाते. जमिनीमध्ये सहा व्होल्ट बॅटरीच्या साहाय्याने ३०० ते १००० हजार फूट खोलीपर्यंत डी.सी. करंट सोडला जातो. या करंटच्या साहाय्याने जमिनीचा ‘रेझिस्टन्स’ मोजला जातो. त्यामुळे भूगर्भामध्ये पाणी आहे किंवा नाही ते समजते. यासाठी जमिनीच्या वरील थरावर स्टीलचे रॉड ठोकून नंतर त्यांना वायर जोडून त्या मशिनला जोडण्यात येतात. नंतर त्यात करंट सोडून रिडिंग घेण्यात येते. जमिनीची तपासणी करताना आठ दिशा लक्षात घेण्यात येतात. त्यामध्ये पाण्याचा प्रवाह कोणत्या दिशेने आहे ते पाहिले जाते. त्यानंतर अचूक जागा निश्चित केली जाते. थोडक्यात सांगायचे तर या पद्धतीमध्ये जमिनीची कुंडलीच तयार केली जाते. विहीर किंवा बोअरवेलला किती प्रमाणात पाणी मिळेल याची साधारण कल्पना येते. या यंत्रणेद्वारे किती खोल फुटावर किती पाणी मिळेल? दिवसाला किती लीटर पाण्याचा उपसा होऊ शकतो? याचा अंदाज येतो. त्यामुळे त्यावर किती क्षमतेचा पंप बसवावा हेही निश्चित ठरवता येतो. विशेष म्हणजे एखाद्या शेतकर्‍याने पूर्वी खोदलेल्या विहीर किंवा बोअरवेल मधीलही पाण्याची दिशा ठरवता येते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकर्‍यांना व जमिनीखालील पाण्याबाबतची हमी मिळते.