शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

धरसोडवृत्तीमुळेच बंदी प्रलंबित

By admin | Updated: September 21, 2015 02:21 IST

कॉ. पानसरे यांच्या हत्येमागे सनातन संस्थेचा सहभाग असल्याचे धागेदोरे मिळत आहेत. त्यामुळे कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आता या संघटनेवर बंदीची मागणी होत आहे.

जमीर काझी, मुंबईकॉ. पानसरे यांच्या हत्येमागे सनातन संस्थेचा सहभाग असल्याचे धागेदोरे मिळत आहेत. त्यामुळे कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आता या संघटनेवर बंदीची मागणी होत आहे. मात्र त्यांच्याच शासनकाळात राज्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने ती बारगळल्याचे स्पष्ट होत आहे. सात वर्षांपूर्वी वाशी, ठाण्यातील बॉम्बस्फोटांत या संघटनेचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस महासंचालकांकडून तीन वेळा या संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र पहिल्यांदा राज्य सरकारकडून, तर त्यानंतर केंद्राकडून त्याला थंड प्रतिसाद मिळाल्याने तो रखडल्याचे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता असलेल्या समीर गायकवाडला सांगलीतून अटक केली. पानसरे यांच्या खुनामध्ये त्याचा महत्त्वाचा सहभाग असल्याचे आतापर्यंतच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सध्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सनातन संस्थेवर बंदीची मागणी केली आहे. मात्र त्यांच्या शासनकाळात तत्कालीन पोलीस महासंचालकाकडून त्याबाबत तीन वेळा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. २० फेबु्रवारी २००८ रोजी नवी मुंबईतील पनवेल येथील सिनेराज टॉकीजमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्यानंतर ३ महिन्यांनी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात, तर ४ जून २००८ मध्ये ठाण्यातील गडकरी रंगायतनच्या पार्किंगच्या जागेत बॉम्बस्फोट झाला. या तिन्ही घटनांमागे सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे तपासातून स्पष्ट झाले होते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सनातन संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आरोपपत्र दाखल करण्याची लेखी शिफारस पोलीस महासंचालकांकडे केली होती. तत्कालीन पोलीस महासंचालक अनामी रॉय यांची नियुक्ती उच्च न्यायालयाने बेकायदा ठरविल्याने १४ मार्च २००९ रोजी तत्कालीन ज्येष्ठ आयपीएस अधिकारी एस. एस. विर्क यांच्याकडे धुरा सोपविण्यात आली. तेव्हा गोव्यामध्ये १६ आॅक्टोबरला मडगाव येथे बॉम्बस्फोट घडविताना सनातनच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. विर्क यांनी सात महिन्यांच्या कालखंडात सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबत प्रस्ताव पहिल्यांदा गृह विभागाकडे पाठविला. मात्र गृहविभागाने त्यात दुरुस्ती सुचवित तो परत पाठविला. विर्क यांच्यानंतर पुन्हा अनामी रॉय सात महिन्यांसाठी डीजीपी झाले. त्यांच्यानंतर राज्याच्या पोलीस प्रमुखाची धुरा सांभाळत असलेल्या डी. शिवानंदन यांनी जानेवारी २०११ मध्ये सनातन संस्थेवरील बंदीबाबतचा सुधारित प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला. मात्र राज्य सरकारचे त्याकडे दुर्लक्ष राहिले. त्यामुळे डिसेंबर महिन्यात तत्कालीन पोलीस महासंचालक एस. सुब्रम्हण्यम यांनी शासनाकडे त्याबाबत पुन्हा पाठपुरावा केल्यानंतर राज्य सरकारने बंदीचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठविला. त्यानंतर उच्च न्यायालयात त्याबाबत दाखल झालेल्या याचिकेमध्ये राज्य सरकारने सनातनवर बंदीच्या प्रस्तावाबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यावर हायकोर्टाने केंद्राकडे त्याबाबतच्या कार्यवाहीबाबत विचारणा केली असता प्रस्तावात आवश्यक असणाऱ्या दुरुस्तीच्या अनुषंगाने राज्य सरकारकडून अधिक माहिती मागविण्यात आल्याचे शपथपत्राद्वारे न्यायालयात सांगितले. वास्तविक या कालखंडात राज्य व केंद्रात कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार होते. मात्र राजकीय कारणास्तव दोन्ही शासनांकडून सनातनवरील बंदीबाबतचा निर्णय घेण्याबाबत वेळकाढूपणा करण्यात आल्याचेच स्पष्ट झाले आहे.