शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

‘रयतेच्या राजा’ला पुस्तकात समाधानकारक स्थान नाही

By admin | Updated: March 17, 2015 22:19 IST

नितीन बानगुुडे : दंडबळावरच चालते राजकारण, चांगुलपणाला तेथे स्थान नाही

राजापूर : राजकारण हे दंड बळावर किंवा चांगुलपणावर चालत नाही तर बुद्धी कौशल्यावरच चालते. हे वेळीच ओळखून वागणारे छत्रपती शिवाजी राजे जगात आदर्श ठरले. त्यांच्या यशाची गाथा यापुढेही अशीच दुमदुमत राहील, मात्र एवढे असामान्य कर्तृत्त्व दाखवणाऱ्या रयतेच्या राजासाठी आमच्या पाठ्यपुस्तकात समाधानकारक स्थान नसते. ही खेदजनक बाब असल्याची खंत ज्येष्ठ इतिहासतज्ञ प्रा. नितीन बानगुडे (पाटील) यांनी रायपाटण होळीचा मांड येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली.शिवसेना चित्रपट सेनेचे चिटणीस व रायपाटण गावाचे सुपुत्र केतन रोडे यांच्या सहकार्याने प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या शिवचरित्रावरील व्याख्यानाचा कार्यक़्रम रायपाटण होळीचा मांड येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रा. बानगुडे पाटील बोलत होते. सदरप्रसंगी व्यासपीठावर श्री वडचाई देवस्थाचे सर्व मानकरी, गावकार, ट्रस्टचे पदाधिकारी, ज्येष्ठ ग्रामस्थ, राजापूर पंचायत समितीचे उपसभापती उमेश पराडकर रायपाटण रेवणसिद्ध मठाचे स्वामी उपस्थित होते.निर्माण केलेले स्वराज्य हे खऱ्या अर्थाने जनतेसाठीच आहे. याच जाणिवेतून आदर्श राज्यकारभार करीत लोकाभिमुख ठरलेल्या आदर्श राजाने आदर्श कारभार केला. लोकाभिमुख ठरलेल्या छत्रपती राजा शिवाजी राजांच्या लखलखता व तेजस्वी तळपळणारा इतिहास यावर प्रा. बानगुडे पाटील यांनी दृष्टीक्षेप टाकला.मोगलाईच्या काळात निर्माण झालेली अंधश्रद्धा राजमाता जिजाबार्इंनी कशा पद्धतीने मोडून काढली. इथपासून जनतेच्या भातशेतीचे नुकसान करणाऱ्या रानटी जनावरांचा कशाप्रकारे बंदोबस्त केला गेला यावर विवेचन करत त्यांनी जिजाबार्इंचा आदर्श इतिहास उलगडला. जनतेसाठी स्थापन करण्यात आलेले स्वराज्य ही खरेतर त्या काळातील पहिली सहकारी संस्था होती, असे मत त्यांनी मांडले.स्वराज्याच्या स्थापनेपासून त्यावर चाल करून येणारा अफझलखान असो, शाहिस्तेखान असो, सिद्धी जोहरपासून थेट औरंगजेबापर्यऐत राजांनी कसा लढा दिला त्यावर प्रा. बानगुडे पाटभल यांनी विस्तृत विवेचन करत साक्षात इतिहासच उभा केला. अशा न्यायी राजाने केवळ दुर्गच बांधले नाही तर नरदुर्ग देखील उभे केले हे इतिहासात अनेक लढवय्यांच्या पराक्रमावरुन दिसून आले. अफझलखानाचा वध केल्यानंतर राजे स्वस्थ बसले नाहीत, तर पुढील २० दिवसात २०० किमीचा मुलुख पादक्रांत करत त्यांनी १८ किल्ले जिंकले होते. त्यावरुन त्यांच्या कर्तृत्वाची प्रचिती येते, असे पाटील पुढे बोलताना म्हणाले. जबाबदारी कशी पार पाडायची याचा आदर्श नमुना राजांकडे होता. आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन लढणाऱ्या मर्द मावळ्यांनी देखील तेच सूत्र अवलंबले. त्यामुळे स्वराज्यावरील वारंवार चालून आलेली संकटे, दूर करता आली. केवळ कारणे सांगून चालत नाहीत कारण त्यामुळे यशोगाय माळ गळ्यात घालीत नाहीत. त्यासाठभ राजाचे हृदय असावे लागते, असे सांगून, ‘जगावे वाघासारखे व लढावे शिवबासारखे’ या उक्तीचा त्यांनी पुनरुच्चार केला. मागील अनेक वर्षे व्हिएतनाम समवेत युद्ध करणाऱ्या अमेरिकेला यश का मिळाले नाही, तर समस्त व्हिएतनाममध्ये छत्रपती शिवाजी राजांचा आदर्श मानला जात आहे म्हणूनच. या कार्यक्रमाला शिवप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. (प्रतिनिधी)स्वराज्य म्हणून जगाला ओळख करून देणाऱ्या राजा छत्रपतींच्या इतिहासाच्या कर्तृत्त्वाचे पोवाडे ज्या प्रमाणात आमच्या शालेय पाठ्यपुस्तकात किंवा एमपीएससी व युपीएससीच्या परीक्षेत असायला हवे तेवढे ते लिहिले गेले नाहीत. केवळ चार पाच ओळीतच त्यांचा इतिहास लिहून नतद्रष्टपणा दाखवला गेला अशी खंत प्रा. बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले. राजापुरात बानगुडे यांचे शिवचरित्रावरील व्याख्यान.स्वराज्य हे खऱ्या अर्थाने जनतेसाठीच : बानगुडे.स्वराज्य ही जनतेसाठी स्थापन केलेली पहिली सहकारी संस्था.बानगुडे यांनी प्रेक्षकांसमोर उभा केला इतिहास.व्हिएतनाममध्ये छत्रपती शिवाजी राजांचा मानला जातो आदर्श.