शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

नववीचे इतिहासाचे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: July 4, 2017 04:59 IST

भारताचे माजी पंतप्रधान आणि संगणकपर्वाचे प्रणेते राजीव गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह उल्लेख असल्याने इयत्ता नववीचे ‘इतिहास व राज्यशास्त्र’ हे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : भारताचे माजी पंतप्रधान आणि संगणकपर्वाचे प्रणेते राजीव गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह उल्लेख असल्याने इयत्ता नववीचे ‘इतिहास व राज्यशास्त्र’ हे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या गोष्टीचा तीव्र निषेध करून हा चुकीचा इतिहास तातडीने बदलावा, अशी मागणी पुणे शहर काँग्रेसने केली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून नववीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला असून, नवी पुस्तके नुकतीच बाजारात आली आहेत. इतिहासाच्या पुस्तकातील एका धड्यात राजीव गांधींबद्दल आक्षेपार्ह सोयीचे लिखाण करण्यात आले आहे. ‘‘माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत बोफोर्स कंपनीकडून घेण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या तोफ खरेदीसंदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजीव गांधी यांच्यावर बरीच टीका झाली. राजकीय भ्रष्टाचार हा या काळातील निवडणुकांचा एक महत्त्वाचा मुद्दा बनला आणि सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला.’’ असे या पुस्तकात म्हटले आहे. मात्र, बोफोर्स तोफ खरेदी प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधी निर्दोष असल्याचा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाची माहितीही या पुस्तकात देण्यात आलेली नाही. पुस्तकामध्ये १९९१नंतरचे बदल, या परिच्छेदामध्ये माजी पंतप्रधान दिवंगत नरसिंह राव यांचे छायाचित्र छापण्यात आलेले नाही. राव यांच्या १९९१ ते १९९५ या कारकिर्दीत रामजन्मभूमी व बाबरी मशिदीचा प्रश्न ऐरणीवर आला, असे म्हटले आहे. मात्र बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी भाजपाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, माजी मंत्री मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या त्यांच्यावर लखनऊच्या न्यायालयात खटला सुरू आहे, याचा उल्लेख टाळण्यात आला आहे. या गोष्टींवर आक्षेप नोंदवत विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असून, चुकीचा इतिहास लिहिणे कदापि सहन करणार नाही, असा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिला आहे. याबाबत शिक्षण आयुक्तांना निवेदनही देण्यात आले आहे. विषय समितीपुढे मांडू नववीच्या इतिहास पुस्तकातील काही लिखाणाबद्दल घेण्यात आलेला आक्षेप संबंधित विषय समितीपुढे मांडला जाणार आहे. त्याबाबत विषय समितीकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल. अभ्यासक्रमामध्ये बदल करण्याचे सर्वस्वी अधिकार या विषय समितीला आहेत.- सुनील मगर, संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ