शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बाबरी मशिदीचा बदला घेण्यासाठी 1993 साली मुंबईत घडवले बॉम्बस्फोट

By admin | Updated: June 16, 2017 14:06 IST

मुंबई 1993 बॉम्बस्फोटा प्रकरणी अबू सालेम, मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, करीमुल्ला खान, फिरोझ अब्दुल राशिद खान यांना दोषी ठरवले.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 16 - मुंबई शहराला हादरवून सोडणा-या 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोट मालिका प्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने शुक्रवारी अबू सालेम, मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, करीमुल्ला खान, फिरोझ अब्दुल राशिद खान यांना दोषी ठरवले. गुन्हेगारी कट रचणे आणि दहशतवादी कारवायांसाठी सालेमला न्यायालयाने दोषी ठरवले. शस्त्रास्त्र कायद्याखालीही न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने अब्दुल कय्यूमची सुटका केली. त्याची तात्काळ मुक्ततता करण्याचे न्यायालयाने आदेश दिले. 
 
सालेमने गुजरातला जाऊन नऊ एके-56 रायफल्स आणि 100 ग्रेनेडस घेतले. जानेवारी 1993 मध्ये अभिनेता संजय दत्त, झैबुनीसा काझीच्या घरी ही शस्त्रास्त्र उतरवण्यात आली होती. अनिस इब्राहिमच्या इशा-यावरुन ही शस्त्रास्त्रे या दोघांकडे ठेवण्यात आली होती. अबू सालेमला त्याच्या कृत्यासाठी फाशीची शिक्षा होऊ शकते पण पोर्तुगालकडून फाशीची शिक्षा न देण्याच्या अटीवर त्याचे प्रत्यर्पण झाले आहे. 
 
हवाला ऑपरेटर राहिलेल्या ताहीर मर्चंटलाही न्यायालयाने कट रचल्या प्रकरणी दोषी धरले. हल्ल्यासाठी ज्यांना प्रशिक्षित करण्यात आले त्यांच्यासाठी मर्चंटच्या दुबईमधील घराचा वापर झाल्याचे न्यायालयाने आपल्या निकाल वाचनात सांगितले. 
 
न्यायालयाने कट रचल्या प्रकरणी मुस्तफा डोसाला दोषी ठरवले आहे. कट रचण्यासाठी दुबईत झालेल्या बैठकीला मुस्तफा त्याचा भाऊ मोहम्मद डोसा आणि दाऊद इब्राहिमसह उपस्थित होता असे न्यायाधीशांनी सांगितले. शस्त्रास्त्र उतरवण्यासाठी मुस्तफा डोसाने मदत केल्याचेही सिद्ध झाले आहे.कोर्टामध्ये सर्व आरोपी त्यांच्यासाठी खास बनवण्यात आलेल्या बेंचवर शेवटच्या रांगेत बसले होते. निकालापूर्वी डोसाने आपण तणावामध्ये असल्याचे सांगितले. 
 
 
6 डिसेंबर 1992 साली अयोध्येत बाबरी मशीद पाडली त्याचा बदला घेण्यासाठी 1993 मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटात सहभागी झाल्याची आरोपींनी कबुली दिली. सोमवारपासून आरोपींना सुनावण्याच्या शिक्षेसंदर्भात सुनावणी सुरु होईल. 
 
या बॉम्बस्फोटांमध्ये 257 जणांचा बळी गेला होता तर, 713 लोक जखमी झाले होते. पोर्तुगालवरून प्रत्यार्पण करून आणलेल्या अबू सालेमसह सात जणांसंबंधी टाडा कोर्ट निकाल देणार आहे. या निकालाकडे मुंबईकरांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. कारण इतक्या मोठ्या बॉम्बस्फोट मालिकेने मुंबई तेव्हा पहिल्यांदाच हादरली होती.
 
पोर्तुगालवरून प्रत्यार्पण करून आणलेल्या अबू सालेमसह सात जणांचा यात समावेश आहे. या निकालाकडे मुंबईकरांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कारण इतक्या मोठ्या बॉम्बस्फोट मालिकेने मुंबई तेव्हा पहिल्यांदाच हादरली होती.
 
 
१२ मार्च १९९३ रोजी मुंबईतील १३ मुख्य ठिकाणांवर साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले. त्या बॉम्बस्फोटांमध्ये २५७ लोकांचा मृत्यू झाला होता तर ७१३ लोक गंभीररीत्या जखमी झाले होते. सुमारे २७ कोटी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. पहिल्या खटल्याचा निकाल २००७ मध्ये लागला. १२३ आरोपींपैकी १०० आरोपींना विशेष टाडा कोर्टाने दोषी ठरवले तर २३४ जणांची पुराव्याअभावी सुटका केली. १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी याकुब मेमन याला ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवर जुलै २०१५ मध्ये अंमल करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या केसमधील सात आरोपी मूळ खटला सुरू झाल्यानंतर पोलिसांच्या हाती लागल्याने न्यायालयाने आधी १२३ आरोपींवरील खटला पूर्ण केला.
 
आणखी वाचा 
तुरूंगात अबू सालेमची बडदास्त... पार्टीसाठी चिकन, २४ तास मोबाइल
 
त्यानंतर अबू सालेम, मुस्तफा डोसा, करीमुल्ला खान, फिरोज अब्दुल, रशीद खान, रियाझ सिद्दिकी, ताहीर मर्चंट आणि अब्दुल कय्यूम या सात जणांवर खटला चालवला. या सात जणांवरील खटला १९९३ मुंबई बॉम्बस्फोटाची ‘केस बी’ म्हणून चालवण्यात आला.
 
अबू सालेमला पोर्तुगालमधून आणण्यात आले, तर मुस्तफा डोसाला संयुक्त अरब अमिरातीमधून अटक करण्यात आले. मात्र आपणाला पोलिसांनी अटक केली नसून आपणच तपास यंत्रणेपुढे शरणागती पत्करल्याचा दावा डोसा करत आहे. या केसमधील आणखी काही आरोपी अद्यापही फरारी आहेत. या हल्ल्याचा सूत्रधार दाऊद इब्राहिम, मोहम्मद डोसा आणि टायगर मेमन हे अद्यापही फरारी आहेत.
 
बॉलीवूड अभिनेता व १९९३ च्या खटल्यातील आरोपी संजय दत्त याला शस्त्र पुरविल्याचा आरोप अबू सालेमवर आहे. तर मुस्तफा डोसावर कट रचल्याचा व शस्त्रास्त्रे उतरवल्याचा आरोप आहे. संजय दत्तच्या घरी शस्त्रास्त्रे पोहोचवल्याचा आरोप कय्युमवर ठेवण्यात आला आहे. तर अन्य आरोपींची पाकिस्तानमध्ये जाण्याची सोय केल्याचा आरोप ताहीरवर आहे.
 
 
२०१३ मध्ये अबू सालेमवरील काही आरोप वगळण्यात आले. कारण सीबीआयने हे आरोप भारत व पोर्तुगालच्या प्रत्यार्पण करारात बसत नसल्याचे म्हणत विशेष न्यायालयाकडे अर्ज केला होता. या संपूर्ण खटल्यात न्यायालयाने ७५० साक्षीदारांची साक्ष नोंदवली, तर ५० बचावपक्षाच्या साक्षीदारांचीही साक्ष नोंदवली. सालेमने त्याचा गुन्हा सीबीआय चौकशीत कबूल केला आहे. २००७ मध्ये या खटल्याला सुरुवात झाली होती. मात्र सालेम, डोसा आणि सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांमुळे खटल्यास विलंब झाला. खटल्याला २०१२ मध्ये सुरुवात झाली आणि मार्च २०१७ मध्ये खटला संपला.
 
हा खटला सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाने बॉम्बस्फोटाचा सूत्रधार याकुब मेमन याला विशेष टाडा न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. तसेच अन्य आरोपींच्या अपिलावरही निर्णय दिला.  त्यात बॉलीवूड अभिनेता संजय दत्तचाही समावेश आहे. संजय दत्तच्या शिक्षेत कपात करण्यात आली. मे २०१३ मध्ये संजय दत्तने विशेष टाडा कोर्टापुढे शरणागती पत्करली व त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. याकुबने फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर सर्वोच्च न्यायालयालयात अनेक अर्ज केले. सर्वोच्च न्यायालयाने मध्यरात्री बसून त्याच्या अर्जावर निर्णय दिला आहे. अखेरीस ३० जुलै २०१५ रोजी त्याला फाशी देण्यात आली.