शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

तिलारी जंगल सफारीसाठी बोट दाखल; जॅकेट व अन्य सुविधा असणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 00:39 IST

चांदा ते बांदा योजना : पावसाळ्यानंतर पर्यटनाला पूरक ठरणार बोट

सावंतवाडी : तिलारी आंतरराज्य प्रकल्प पर्यटन आणि जंगल सफारीसाठी चांदा ते बांदा योजनेतून तिलारी जंगल सफारी बोट उपलब्ध झाली आहे. कोरोनाच्या संकटातून सुटका झाल्यावर पावसाळ्यानंतर पर्यटनाला ही बोट पूरक ठरणार आहे.

कोरोनाच्या संकटानंतर ही बोट पर्यटनासाठी उपयुक्त ठरणार आहे. हेवाळे येथील संस्थेकडे ती सुपुर्द करण्यात आली आहे. माजी अर्थराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी चांदा ते बांदा योजनेतून पाच लाख रुपये दोडामार्ग वनक्षेत्रपाल यांना मंजूर केले होते. यामधून १२ प्रवासी वाहतुकीची इंजिन असणारी बोट निर्माण करण्यात आली आहे. त्यामध्ये दहा पर्यटक बसतील. त्यांच्यासाठी जॅकेट व अन्य सुविधादेखील असतील, असे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी सांगितले.

तिलारी पाटबंधारे धरणाच्या ठिकाणी जंगल सफारीसाठी पर्यटकांना ही बोट उपयुक्त असून ‘तिलारी जंगल सफारी’ असे या बोटीचे नामकरण करण्यात आले आहे. वनखात्यासाठी जंगलाच्या संरक्षणालादेखील या बोटीचा फायदा होईल, असे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण आणि सहाय्यक वनसंरक्षक इस्माईल जळगावकर यांनी सांगितले.

सध्या कोरोनामुळे सर्वच ठिकाणचे पर्यटन बंद आहे. त्यामुळे ज्यावेळी सर्व व्यवहार सुरळीत होतील, त्यावेळी या बोटीचा वापर पर्यटकांसाठी करण्यात येणार आहे. तिलारी खोऱ्यात असलेले पर्यटन सौंदर्य या बोटीच्या माध्यमातून पर्यटकांना न्याहाळता येणार आहे. त्यामुळे शासनाने या बोटीला मंजुरी दिली आहे, असेही समाधान चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :tourismपर्यटन