शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

तिलारी जंगल सफारीसाठी बोट दाखल; जॅकेट व अन्य सुविधा असणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 00:39 IST

चांदा ते बांदा योजना : पावसाळ्यानंतर पर्यटनाला पूरक ठरणार बोट

सावंतवाडी : तिलारी आंतरराज्य प्रकल्प पर्यटन आणि जंगल सफारीसाठी चांदा ते बांदा योजनेतून तिलारी जंगल सफारी बोट उपलब्ध झाली आहे. कोरोनाच्या संकटातून सुटका झाल्यावर पावसाळ्यानंतर पर्यटनाला ही बोट पूरक ठरणार आहे.

कोरोनाच्या संकटानंतर ही बोट पर्यटनासाठी उपयुक्त ठरणार आहे. हेवाळे येथील संस्थेकडे ती सुपुर्द करण्यात आली आहे. माजी अर्थराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी चांदा ते बांदा योजनेतून पाच लाख रुपये दोडामार्ग वनक्षेत्रपाल यांना मंजूर केले होते. यामधून १२ प्रवासी वाहतुकीची इंजिन असणारी बोट निर्माण करण्यात आली आहे. त्यामध्ये दहा पर्यटक बसतील. त्यांच्यासाठी जॅकेट व अन्य सुविधादेखील असतील, असे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी सांगितले.

तिलारी पाटबंधारे धरणाच्या ठिकाणी जंगल सफारीसाठी पर्यटकांना ही बोट उपयुक्त असून ‘तिलारी जंगल सफारी’ असे या बोटीचे नामकरण करण्यात आले आहे. वनखात्यासाठी जंगलाच्या संरक्षणालादेखील या बोटीचा फायदा होईल, असे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण आणि सहाय्यक वनसंरक्षक इस्माईल जळगावकर यांनी सांगितले.

सध्या कोरोनामुळे सर्वच ठिकाणचे पर्यटन बंद आहे. त्यामुळे ज्यावेळी सर्व व्यवहार सुरळीत होतील, त्यावेळी या बोटीचा वापर पर्यटकांसाठी करण्यात येणार आहे. तिलारी खोऱ्यात असलेले पर्यटन सौंदर्य या बोटीच्या माध्यमातून पर्यटकांना न्याहाळता येणार आहे. त्यामुळे शासनाने या बोटीला मंजुरी दिली आहे, असेही समाधान चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :tourismपर्यटन