शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
4
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
5
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
6
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
7
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
8
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
9
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
10
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
11
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
12
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
13
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
14
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
15
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
16
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
17
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
18
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
19
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
20
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?

BMC Election 2017: मुख्यमंत्र्यांविरोधात शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार

By admin | Updated: February 20, 2017 20:21 IST

आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या विरोधात शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 20 - आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या विरोधात शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. प्रचाराची मुदत संपल्यानंतरही मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती सुरु असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. शिवसेनेच्या वतीने अनिल देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याची माहिती खा. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, आचारसंहिता काल दुपारी पाच वाजता संपली असतानाही छातीवर कमळाचं चिन्ह लावून सरकारी निवासस्थानी मुख्यमंत्र्यानी मुलाखतींचा धडाका लावलाय, हा सरकारी अधिकारांचा गैरवापर आहे, मुख्यमंत्र्यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केलाय. मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघनच आहे. त्यामुळे फडणवीसांविरोधात आचारसंहिताभंगाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

(मुंबई  महानगरपालिका निवडणुकीच्या अधिक बातम्या वाचवण्यासाठी क्लिक करा: BMC Election 2017)

 

पुढे बोलताना ते म्हणाले, सरकारी यंत्रणा वापरून मुख्यमंत्री विरोधकांना धमकावत आहेत, पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्याना राजकारणातली ही पारदर्शकता दिसत नाही का?  मुख्यमंत्र्यांना परवानगी मिळत असेल तर सर्वाना परवानगी मिळायला हवी. दिवसभर सुरु असलेल्या मुलाखती या पेड न्यूजचा प्रकार असावा असा संशय आम्हाला आहे. उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्यापासून मुख्यमंत्र्याना कोणी रोखलेले नाही. भारतीय जवानाबद्दल अशब्द काढणाऱ्या प्रशांत परिचारकांवर कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यानी केली असती तर आम्हाला आनंद वाटला असता, परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी संजय राऊत यांनी केली. 

प्रचाराची वेळ संपल्यानंतर कोणीही प्रचार करू नये असा नियम आहे. मात्र, वेळ संपल्यांनंतरही मुख्यमंत्र्यानी मुलाखती दिल्या आहेत, हा मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न, आम्ही निवडणूक आयोगाकडे याची रीतसर तक्रार केली आहे असे शिवसेना नेते अनिल देसाई यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. 

(पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अधिक बातम्या वाचवण्यासाठी क्लिक करा: PMC Election 2017)

 

दरम्यान, मुंबईसह राज्यातील दहा महानगरपालिकेसाठी उद्या 21 तारखेला मतदान तर 23 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. महानगरपालिकेचा रणसंग्राम जाहीर झाल्यानंतर मुंबईच्या जागावाटपावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये दुमत झाल्यानंतर राज्यभरात दोन्ही पक्षाने वेगळ लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या प्रत्येक सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपच्या फैरी झाल्या.