शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

BMC Election 2017: मुख्यमंत्र्यांविरोधात शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार

By admin | Updated: February 20, 2017 20:21 IST

आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या विरोधात शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 20 - आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या विरोधात शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. प्रचाराची मुदत संपल्यानंतरही मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती सुरु असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. शिवसेनेच्या वतीने अनिल देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याची माहिती खा. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, आचारसंहिता काल दुपारी पाच वाजता संपली असतानाही छातीवर कमळाचं चिन्ह लावून सरकारी निवासस्थानी मुख्यमंत्र्यानी मुलाखतींचा धडाका लावलाय, हा सरकारी अधिकारांचा गैरवापर आहे, मुख्यमंत्र्यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केलाय. मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघनच आहे. त्यामुळे फडणवीसांविरोधात आचारसंहिताभंगाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

(मुंबई  महानगरपालिका निवडणुकीच्या अधिक बातम्या वाचवण्यासाठी क्लिक करा: BMC Election 2017)

 

पुढे बोलताना ते म्हणाले, सरकारी यंत्रणा वापरून मुख्यमंत्री विरोधकांना धमकावत आहेत, पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्याना राजकारणातली ही पारदर्शकता दिसत नाही का?  मुख्यमंत्र्यांना परवानगी मिळत असेल तर सर्वाना परवानगी मिळायला हवी. दिवसभर सुरु असलेल्या मुलाखती या पेड न्यूजचा प्रकार असावा असा संशय आम्हाला आहे. उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्यापासून मुख्यमंत्र्याना कोणी रोखलेले नाही. भारतीय जवानाबद्दल अशब्द काढणाऱ्या प्रशांत परिचारकांवर कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यानी केली असती तर आम्हाला आनंद वाटला असता, परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी संजय राऊत यांनी केली. 

प्रचाराची वेळ संपल्यानंतर कोणीही प्रचार करू नये असा नियम आहे. मात्र, वेळ संपल्यांनंतरही मुख्यमंत्र्यानी मुलाखती दिल्या आहेत, हा मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न, आम्ही निवडणूक आयोगाकडे याची रीतसर तक्रार केली आहे असे शिवसेना नेते अनिल देसाई यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. 

(पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अधिक बातम्या वाचवण्यासाठी क्लिक करा: PMC Election 2017)

 

दरम्यान, मुंबईसह राज्यातील दहा महानगरपालिकेसाठी उद्या 21 तारखेला मतदान तर 23 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. महानगरपालिकेचा रणसंग्राम जाहीर झाल्यानंतर मुंबईच्या जागावाटपावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये दुमत झाल्यानंतर राज्यभरात दोन्ही पक्षाने वेगळ लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या प्रत्येक सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपच्या फैरी झाल्या.