शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

BMC Election 2017: मुख्यमंत्र्यांविरोधात शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार

By admin | Updated: February 20, 2017 20:21 IST

आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या विरोधात शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 20 - आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्या विरोधात शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. प्रचाराची मुदत संपल्यानंतरही मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती सुरु असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. शिवसेनेच्या वतीने अनिल देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याची माहिती खा. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, आचारसंहिता काल दुपारी पाच वाजता संपली असतानाही छातीवर कमळाचं चिन्ह लावून सरकारी निवासस्थानी मुख्यमंत्र्यानी मुलाखतींचा धडाका लावलाय, हा सरकारी अधिकारांचा गैरवापर आहे, मुख्यमंत्र्यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केलाय. मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघनच आहे. त्यामुळे फडणवीसांविरोधात आचारसंहिताभंगाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

(मुंबई  महानगरपालिका निवडणुकीच्या अधिक बातम्या वाचवण्यासाठी क्लिक करा: BMC Election 2017)

 

पुढे बोलताना ते म्हणाले, सरकारी यंत्रणा वापरून मुख्यमंत्री विरोधकांना धमकावत आहेत, पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्याना राजकारणातली ही पारदर्शकता दिसत नाही का?  मुख्यमंत्र्यांना परवानगी मिळत असेल तर सर्वाना परवानगी मिळायला हवी. दिवसभर सुरु असलेल्या मुलाखती या पेड न्यूजचा प्रकार असावा असा संशय आम्हाला आहे. उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्यापासून मुख्यमंत्र्याना कोणी रोखलेले नाही. भारतीय जवानाबद्दल अशब्द काढणाऱ्या प्रशांत परिचारकांवर कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यानी केली असती तर आम्हाला आनंद वाटला असता, परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी संजय राऊत यांनी केली. 

प्रचाराची वेळ संपल्यानंतर कोणीही प्रचार करू नये असा नियम आहे. मात्र, वेळ संपल्यांनंतरही मुख्यमंत्र्यानी मुलाखती दिल्या आहेत, हा मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न, आम्ही निवडणूक आयोगाकडे याची रीतसर तक्रार केली आहे असे शिवसेना नेते अनिल देसाई यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. 

(पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अधिक बातम्या वाचवण्यासाठी क्लिक करा: PMC Election 2017)

 

दरम्यान, मुंबईसह राज्यातील दहा महानगरपालिकेसाठी उद्या 21 तारखेला मतदान तर 23 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. महानगरपालिकेचा रणसंग्राम जाहीर झाल्यानंतर मुंबईच्या जागावाटपावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये दुमत झाल्यानंतर राज्यभरात दोन्ही पक्षाने वेगळ लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या प्रत्येक सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपच्या फैरी झाल्या.