शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ फलक उखडून टाका

By admin | Updated: May 6, 2016 02:29 IST

पश्चिमेकडील कोपरगावातील गावदेवी, महादेव आणि हनुमान मंदिरात मॅक्सी(गाऊन) घातलेल्या महिलांना प्रवेश न देण्याचे फलक लावल्याने महिलांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

डोंबिवली : पश्चिमेकडील कोपरगावातील गावदेवी, महादेव आणि हनुमान मंदिरात मॅक्सी(गाऊन) घातलेल्या महिलांना प्रवेश न देण्याचे फलक लावल्याने महिलांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी हा निर्णय घेतल्याचा दावा ग्रामस्थ करीत असले तरी अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने धर्मस्थळे विनाशर्त महिलांकरिता खुली करण्याचे स्पष्ट आदेश दिले असल्याने हा निर्णय बेकायदा आहे. डोंबिवलीमधील स्थानिक महिलांनी हे फलक उखडून फेकून द्यावे. अन्यथा आपण स्वत: डोंबिवलीत येऊन फलक काढू, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिला आहे.ग्रामस्थांनी सर्वानुमते हा निर्णय घेतला असून मंदिराचे पावित्र्य कायम रहावे यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी दिली. ते म्हणाले की, या निर्णयात गैर काहीच नाही. महिला मॅक्सी घालून घरची कामे करतात. मासांहारी जेवण शिजवतात. काही ठिकाणी हे कपडे दररोज धुतलेही जात नाही. त्यामुळे असे कपडे घालून देवाची आराधना करणे योग्य नाही. दोन वर्षात या निर्णयाला कुणीही विरोध केलेला नाही. परिसरातील बहुतांश महिला नियमाचे पालन करीत आहेत, असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले. तृप्ती देसाई यांना मुंबईतील हाजी अली दर्ग्यात प्रवेशादरम्यान रोखण्यात आले. अगोदर त्यांनी दर्ग्यात प्रवेश करावा व मगच डोंबिवलीतील फलक उखडावा, असे आव्हानही म्हात्रे यांनी दिले.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे अत्यंत सुधारणावादी होते. त्यांनी जर डोंबिवली शहरात लागलेला हा फलक पाहिला असता तर स्वत: उखडून फेकला असता, अशी भावना अनेक पुरोगामी महिला कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.तृप्ती देसाई यांचे लक्ष या प्रकाराकडे वेधले असता त्या म्हणाल्या की, हा फलक अत्यंत निषेधार्ह आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कुठल्याही निकषावर महिलांचा मंदिर प्रवेश रोखता येणार नाही, असे स्पष्ट केले असल्याने असे फलक लावणे हे पुरुषी मानसिकतेचे लक्षण आहे. मंदिर व देवाचे पावित्र्य कसे राखायचे हे महिलांना कुणी शिकवण्याची गरज नाही. ९० टक्के घरांत पूजा महिलाच करतात. स्थानिक महिलांना आवाहन आहे की, त्यांनी स्वत: हे फलक उखडून फेका. मला स्वत:ला डोंबिवलीत येणे शक्य झाले तर ते फलक उखडून फेकून देईन. (प्रतिनिधी)हे तर पुरूषी मानसिकतेचे लक्षणहा फलक अत्यंत निषेधार्ह आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कुठल्याही निकषावर महिलांचा मंदिर प्रवेश रोखता येणार नाही, असे स्पष्ट केले असल्याने असे फलक लावणे हे पुरुषी मानसिकतेचे लक्षण आहे. असे तृप्ती देसाई यांनी सांगितले.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रदेश सरचिटणीस सुशीला मुंडे म्हणाल्या की, महिलांच्या मंदिर प्रवेशाचा लढा आम्ही २००० सालापासून लढत आहोत. याबाबतची याचिका आम्हीच केली होती. त्यामुळे डोंबिवलीतील मंदिरात लागलेले फलक बेकायदा असून ते तात्काळ काढणे गरजेचे आहे. संस्कृतीच्या ठेकेदारांच्या विरोधात आंदोलन करायचे किंवा कसे याचा निर्णय अंधश्रद्धा निर्मूलन समिती घेईल, असेही त्या म्हणाल्या.पुरुष किती नियम पाळतातमहिलांनी मॅक्सी (गाऊन) घालून मंदिरात जावे किंवा कसे याचा निर्णय वैयक्तीत असून तशी सक्ती असू नये. मात्र मंदिरात जाताना कोणती काळजी घ्यावी हे डोंबिवलीतील महिलांना कळते, अशा शब्दांत स्थानिक महिलांनी आपली भावना व्यक्त केली. अनेक मंदिरांमध्ये मोबाईल फोन सायलेंटवर ठेवा इथपासून ते मोठ्याने बोलू नका, असे फलक लावलेले असतात. मात्र पुरुष त्यापैकी किती सूचनांचे पालन करतात, असा सवाल काही महिलांनी केला.