शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

नागपूरमध्ये दिवसाढवळ्या वृद्धेचा खून

By admin | Updated: October 8, 2015 02:24 IST

तात्या टोपेनगरमध्ये एका वृद्ध महिलेचा खून करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. वसुंधरा ऊर्फ जयश्री बाळ (६७) असे मृत महिलेचे नाव आहे.

नागपूर : तात्या टोपेनगरमध्ये एका वृद्ध महिलेचा खून करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. वसुंधरा ऊर्फ जयश्री बाळ (६७) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचे पती ‘नीरी’मध्ये वैज्ञानिक होते. ते संचालक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. चार वर्षांपूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांना दोन मुले असून मोठा मुलगा निरंजन मुंबईत राहतो. तर, लहान मुलगा आदित्य व त्याची पत्नी नीलिमासोबत त्या राहत होत्या. नेहमीप्रमाणे आदित्य आणि नीलिमा हे सकाळी पावणेदहाच्या सुमारास कामावर निघून गेले. वसुंधरा या १० महिन्यांच्या ‘आद्या’ या नातीसमवेत घरीच होत्या. सव्वादहाच्या सुमारास आशा इंगळे ही घरकाम करण्यासाठी आली. वसुंधरा यांनी बराच वेळ दरवाजा उघडला नाही. त्यामुळे आशानेच दरवाजा जरासा ढकलला असता, तो उघडला. घरात येताच वसुंधरा जमिनीवर पडल्या असल्याचे तिला दिसून आले. जवळच चिमुकली आद्या बसून रडत होती. वसुंधरा यांचा दुपट्ट्याने गळा आवळल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी श्वानपथकाच्या साह्याने धागेदोरे मिळविण्याचा प्रयत्न केला.