शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

धन्य धन्य निवडणूक

By admin | Updated: October 2, 2014 22:23 IST

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रंग राजकारणाचे

प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं, असं म्हणतात. पण आता प्रेम आणि युद्धासोबत राजकारणातही सर्व काही माफ असतं, असं म्हणायची वेळ आली आहे. खुर्चीवरचं प्रेम आणि खुर्चीसाठी युद्ध असा दोन्हीचा मिलाफ राजकारणात दिसत असल्यामुळे राजकारणातही सर्व काही माफ करायची वेळ आली आहे. राजकारण ही खरं तर आताची नवीन गोष्ट नाही. ते फार पूर्वीपासून केलं जातंय. पण आताच्या राजकारणाला जे रंग दिसू लागले आहेत, ते मात्र याआधी कधीच दिसले नव्हते. आताच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेभरवशीपणा. कुठल्याही राजकीय पक्षाचे अध्यक्षही आपल्या पक्षातील कोण कुठे आहेत आणि कुठे जातील, याचा भरवसा देऊ शकत नाहीत. जे आपल्या पक्षाच्या नेत्यांचा विश्वास जिंकू शकत नाहीत, ते मतदारांकडून मात्र विश्वासाची अपेक्षा ठेवतात, असं अजब चित्र राजकारणात दिसत आहे. कुठलाही जिल्हा याला अपवाद नाही. प्रत्येक जिल्ह्यात कुणी ना कुणी बड्या नेत्याने पक्षांतर केलेले दिसते. या पक्षांतराला कितीही सबबी दिल्या जात असल्या तरी स्वार्थ हेच त्यामागचे एकमेव कारण आहे. अनेक वर्षे ज्या पक्षात विविध पदे उपभोगली, त्या पक्षातून तडकाफडकी बाहेर पडून दुसऱ्या पक्षाची उमेदवारी हातात घेऊन पक्षांतराची घोषणा करण्यामागे दुसरे काही कारण असू शकते का? ही कारणे न समजण्याइतके लोक मूर्ख नाहीत. किंवा राजकीय पक्षांनी लोकांना इतके मूर्ख समजू नये. तसं पाहिलं तर पक्षांतर हाही नवीन विषय नाही. वर्षानुवर्षे राजकारणात पक्षांतरे सुरू आहेत. पण आता त्याला कसला धरबंधच राहिलेला नाही. कोणीही कधीही पक्षांतर करू लागले आहेत. पक्षांतरासाठी निवडणुकीचा मुहूर्त तर साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो की काय, असं वाटण्यासारखी पक्षांतरे निवडणुकीच्या तोंडावर केली जातात. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणही गेल्या काही वर्षात पूर्णपणे बदलून किंवा बिघडून गेले आहे. पैशाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या निवडणुकीत पक्षांतराचा मुद्दा फारसा नव्हता. पण यावेळी पैशाबरोबरच पक्षांतरही गाजत आहे. रत्नागिरीत उदय सामंत यांनी केलेले पक्षांतर हे नेमके कशासाठी, याचा अधिकृत उलगडा कोणालाही झालेला नाही. दापोली मतदार संघात किशोर देसाई यांनी बंडखोरी केली आहे. पक्षाने उमेदवारी दिली नाही, म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, हे एका मर्यादेपर्यंत मान्यही करता येते. पण उदय सामंत यांना पक्षाने तिकीट नाकारले नव्हते. ते मावळत्या सरकारमधील मंत्री होते. त्यांच्यावर झालेल्या पक्षांतर्गत अन्यायाची दखल घेऊन त्यांना शेवटचे काही महिने मंत्रीपदही देण्यात आले होते. मात्र, तरीही त्यांनी केलेले पक्षांतर अनाकलनीय आहे. आताच्या घडीला राजकीय लोकांनी सर्वसामान्य माणसाला विचारात घेतले नाही तर त्यांना लोकही विचारात घेणार नाहीत. उदय सामंत यांना दोनवेळा राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून देण्यामागे मतदारांच्या मनात त्यांच्याबद्दलच्या काही कल्पना असणारच ना? आता सामंत यांनी केलेल्या पक्षांतराला सर्वसामान्य माणसांकडून सकारात्मकच प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा करणे, जरा जास्तच होईल. आता काहीही गृहीत धरा, पण सर्वसामान्य माणसाला गृहीत धरू नका. सामान्य माणूस हुशार आहे आणि तो काय करू शकतो, हे सर्वांना दिसलंच आहे. तेव्हा राजकारणाचे रंग दाखवताना सावध राहा.-मनोज मुळ्ये