शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

सहायक निरीक्षकावर ठपका

By admin | Updated: September 23, 2015 01:08 IST

जालना येथील मुलीवरील (१७) सामुहिक बलात्कार प्रकरण हाताळताना वरिष्ठांना न कळवता निर्णय घेतल्याचा ठपका सहायक निरीक्षक (स्थानिक गुन्हा शाखा) विनोद इजापवार यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

डिप्पी वांकाणी, मुंबईजालना येथील मुलीवरील (१७) सामुहिक बलात्कार प्रकरण हाताळताना वरिष्ठांना न कळवता निर्णय घेतल्याचा ठपका सहायक निरीक्षक (स्थानिक गुन्हा शाखा) विनोद इजापवार यांच्यावर ठेवण्यात आला आहे.अतिशय संवेदनशील अशा या बलात्कार प्रकरणाची चौकशी करण्यास अतिरिक्त महासंचालक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यास सांगण्यात आले होते. या अधिकाऱ्याने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. या बलात्कार प्रकरणात आरोपींना पकडण्यासाठी इजापवारने या मुलीचाच वापर केला होता व त्यात तिच्यावर दुसऱ्यांदा याच आरोपींकडून बलात्कार झाला.राज्याच्या पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार सहायक निरीक्षक विनोद इजापवारने एवढे संवेदनशील प्रकरण हाताळताना त्याची माहिती उप विभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) आणि पोलीस अधीक्षकांना दिली नाही, असे या अहवालात म्हटले आहे. दोन वेळा इजापवारने अयशस्वी प्रयत्न केले होते व त्याची माहिती वरिष्ठांना दिली नाही. तिसऱ्या प्रयत्नात त्याने आरोपीला पकडून आपल्याला काही शाबासकी मिळेल या आशेने संबंधित निरीक्षकालाही या कारवाईपासून दूर ठेवले, असे हा अहवाल म्हणतो.६ जुलै रोजी या जालन्याच्या मुलीवर दोघांनी बलात्कार केला व त्याचे व्हिडिओचित्रण केले. ती मुलगी तेथे फेसबुकवरील तिच्या मित्राला भेटायला गेली होती. या दोन आरोपींनी तिचा मोबाईल फोन परत करण्यासाठी दोन हजार रुपये मागितले होते. ही मुलगी जेव्हा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेली तेव्हा आरोपींना दुसऱ्यांदा भेटण्यासाठी तिचा वापर ७ जुलै रोजी इजापवारने केला परंतु त्यात त्याला यश आले नाही. ९ जुलै रोजी विनोद इजापवारने या पीडित मुलीचा वापर आरोपींना पकडण्यासाठी आमिष म्हणून केला. तथापि, आरोपींना पोलिसांनी पकडायच्या आधी या मुलीवर त्यांनी आणखी एकदा बलात्कार केला. पोलिसांनी नंतर नितीन साळवे (१९) आणि संजय हावरे (२१) यांना अटक केली.बलात्कारासारखे संवेदनशील प्रकरण पोलीस किती बेपर्वाईने हाताळतात हे यामुळे समोर आले आहे. विधानसभेत विरोधकांनी या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडले. त्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.अहवाल सरकारला सादर झाला असून त्याची योग्य ती दखल घेण्याचे काम त्यांचे आहे, असे हा अधिकारी म्हणाला. बलात्कारातील आरोपींना पकडून काही शाबासकी मिळविण्याचाच हा प्रकार आहे.