शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता आणि संपत्तीच्या बळावर भाजपाचा विजय - उद्धव ठाकरे

By admin | Updated: February 24, 2017 07:33 IST

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या 82 जागा हा आकडा अभिनंदन करण्यासारखा आहे.

ऑनलाइन लोकमत

 
मुंबई, दि. 24 - मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या 82 जागा हा आकडा अभिनंदन करण्यासारखा आहे. पण सत्ता आणि संपत्तीच्या बळावर भाजपाने हे यश मिळवले अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून केली आहे. 
 
जंग जंग पछाडूनही भाजपाला शिवसेनेचा पराभव करता आला नाही. शिवसेनेचा पराभव करण्यासाठी ‘महाराष्ट्रा’ची संपूर्ण सत्ता, दिल्लीची जोरदार कुमक व त्याबरोबर मिळणारी साधने मैदानात उतरवूनही शिवसेना एका योद्धय़ाप्रमाणे लढली. 
 
असंख्य घाव झेलूनही शिवरायांचा भगवा झेंडा शिवसेनेने हातातून निसटू दिला नाही. शेवटी हा लढा अस्मितेचाच होता असे उद्धव यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न आज जितक्या ‘कारस्थानी’ पद्धतीने झाला तो काँग्रेस राजवटीतही झाला नसेल असे उद्धव यांनी म्हटले आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
- काँग्रेस सत्तेवर असताना हा लाभ काँग्रेसला मिळत आला. आता ही ऊब भाजपला मिळत आहे. शिवसेनेने निखाऱ्यावरून चालण्याचा मार्ग स्वीकारला आहे. परिणामांची पर्वा आम्ही करीत नाही. लढाई सुरूच राहील. युद्धाला तोंड फुटले आहे ते फक्त सत्तेसाठी नाही तर धर्म आणि विचारांसाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठीच!
 
- मुंबईवर शिवसेना विजयाचा भगवा गुलाल उधळला आहे. सत्ता आणि संपत्तीच्या बळावर भारतीय जनता पक्षाने नक्कीच मुसंडी मारली आहे. पण जंग जंग पछाडूनही त्यांना शिवसेनेचा पराभव करता आला नाही. शिवसेनेस ८४ जागांचा टप्पा गाठता आला. भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या पाठोपाठ आला हे सत्य आम्ही नाकारणार नाही, पण शिवसेनेचा पराभव करण्यासाठी ‘महाराष्ट्रा’ची संपूर्ण सत्ता, दिल्लीची जोरदार कुमक व त्याबरोबर मिळणारी साधने मैदानात उतरवूनही शिवसेना एका योद्धय़ाप्रमाणे लढली हे महत्त्वाचे. असंख्य घाव झेलूनही शिवरायांचा भगवा झेंडा शिवसेनेने हातातून निसटू दिला नाही. शेवटी हा लढा अस्मितेचाच होता. मुंबईसह महाराष्ट्राच्या अखंडतेचा होता. 
 
- अर्थात गेल्या पन्नास वर्षांपासून मुंबईवर आणि पंचवीस वर्षांपासून मुंबईच्या महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता होतीच. त्या सत्तेला व भगव्याला सुरुंग लावून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न आज जितक्या ‘कारस्थानी’ पद्धतीने झाला तो काँग्रेस राजवटीतही झाला नसेल. देशाच्या राजकारणात मुंबईचे एक वेगळे स्थान आहे. संपूर्ण देश मुंबईत सामावला आहे हे काही प्रमाणात खरे असेलही, पण तरीही मुंबईवर भूमिपुत्रांचा म्हणजे मराठी माणसांचाच पगडा राहिला. देशाचा कौल काय आहे ते मुंबई-ठाण्याच्या जनतेने स्पष्ट केले. येथे ‘मन की बात’ चालत नाही तर फक्त ‘काम की बात’ चालते. शिवसेनेने मुंबईत विकासाचे काम केले. शिवसेनेने मुंबईचे सदैव संरक्षण केले. शिवसेनेने मुंबईत विश्वासाचे बीज पेरले. तो विश्वासच शिवसेनेला विजयाकडे घेऊन गेला. शिवसेना ८४ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला. भारतीय जनता पक्षाला ८२ जागा मिळाल्या. अर्थात हाती संपूर्ण सत्ता व साधने असल्याचा जास्तीत जास्त लाभ भारतीय जनता पक्षाने पदरात पाडून घेतला. तरीही भाजपास मिळालेला ८२ चा आकडा हा अभिनंदन करण्यासारखाच आहे. 
 
- काही झाले तरी मुंबईत शिवसेनेचाच महापौर विराजमान होईल. त्यासाठीच शेवटी ही लढाई झाली. मुंबईवर मराठी माणसाचे वर्चस्व आहेच, पण ‘वॉर्डा’वॉर्डातील निकाल पाहिले तर सर्वच भाषिकांनी शिवसेनेला मतदान केले हे दिसून येते, पण भारतीय जनता पक्षाला विशिष्ट जात, धर्म आणि प्रांताचे ‘एकगठ्ठा’ मतदान झाले. तेच निर्णायक ठरले याची खंत आहे व निकालाची चिरफाड करण्यापेक्षा पुढच्या वाटचालीस आम्ही महत्त्व देतो. बहुमताचा संपूर्ण आकडा शिवसेनेस गाठता आला नाही. यापेक्षा मोठा आकडा गाठता आला असता. त्याची कारणे तपासावी लागतील. शिवाय मुंबईतील १२ लाख मतदारांची नावे गहाळ झाली व त्यातील बहुसंख्य मतदार मराठीच होते. हा घोळ सत्तेचा वापर करून ‘ठरवून’ झाला काय? अर्थात मुंबईतील शिवसेनेचे वर्चस्व आणि मुसंडी महत्त्वाची.
 
- जे झाले ते झाले, गंगेला मिळाले म्हणून वाहत्या पाण्यात हात धुऊन घेणाऱ्यांतली शिवसेना नक्कीच नाही. महापालिका त्रिशंकू दिसत असली तरी मुंबईकरांचा कौल हा शिवसेनेच्याच बाजूने आहे. मुंबईतल्या निकालांचे सविस्तर विश्लेषण नंतरही करता येईल. मुंबईसह इतर १० महानगरपालिका व २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या व तेथे बऱ्याच प्रमाणात प्रस्थापितांना धक्के बसले. ठाणे महानगरपालिकेत जंग जंग पछाडूनही भाजपला शिवसेनेचा पराभव करता आला नाही व ठाण्यात शिवसेनेने एकहाती सत्ता आणली. सोलापुरातही शिवसेनेने चांगला आकडा गाठला आहे. विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती या महानगरपालिकांत भाजपने अपेक्षेप्रमाणे मुसंडी मारली आहे. नागपूर तर भारतीय जनता पक्षाचा गड आहे व तेथे नितीन गडकरी व मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिष्ठा पणास लागली होती. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांत भाजपने चांगली कामगिरी करून दाखवली हा काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का आहे.