शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

सत्ता आणि संपत्तीच्या बळावर भाजपाचा विजय - उद्धव ठाकरे

By admin | Updated: February 24, 2017 07:33 IST

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या 82 जागा हा आकडा अभिनंदन करण्यासारखा आहे.

ऑनलाइन लोकमत

 
मुंबई, दि. 24 - मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या 82 जागा हा आकडा अभिनंदन करण्यासारखा आहे. पण सत्ता आणि संपत्तीच्या बळावर भाजपाने हे यश मिळवले अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून केली आहे. 
 
जंग जंग पछाडूनही भाजपाला शिवसेनेचा पराभव करता आला नाही. शिवसेनेचा पराभव करण्यासाठी ‘महाराष्ट्रा’ची संपूर्ण सत्ता, दिल्लीची जोरदार कुमक व त्याबरोबर मिळणारी साधने मैदानात उतरवूनही शिवसेना एका योद्धय़ाप्रमाणे लढली. 
 
असंख्य घाव झेलूनही शिवरायांचा भगवा झेंडा शिवसेनेने हातातून निसटू दिला नाही. शेवटी हा लढा अस्मितेचाच होता असे उद्धव यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न आज जितक्या ‘कारस्थानी’ पद्धतीने झाला तो काँग्रेस राजवटीतही झाला नसेल असे उद्धव यांनी म्हटले आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
- काँग्रेस सत्तेवर असताना हा लाभ काँग्रेसला मिळत आला. आता ही ऊब भाजपला मिळत आहे. शिवसेनेने निखाऱ्यावरून चालण्याचा मार्ग स्वीकारला आहे. परिणामांची पर्वा आम्ही करीत नाही. लढाई सुरूच राहील. युद्धाला तोंड फुटले आहे ते फक्त सत्तेसाठी नाही तर धर्म आणि विचारांसाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठीच!
 
- मुंबईवर शिवसेना विजयाचा भगवा गुलाल उधळला आहे. सत्ता आणि संपत्तीच्या बळावर भारतीय जनता पक्षाने नक्कीच मुसंडी मारली आहे. पण जंग जंग पछाडूनही त्यांना शिवसेनेचा पराभव करता आला नाही. शिवसेनेस ८४ जागांचा टप्पा गाठता आला. भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या पाठोपाठ आला हे सत्य आम्ही नाकारणार नाही, पण शिवसेनेचा पराभव करण्यासाठी ‘महाराष्ट्रा’ची संपूर्ण सत्ता, दिल्लीची जोरदार कुमक व त्याबरोबर मिळणारी साधने मैदानात उतरवूनही शिवसेना एका योद्धय़ाप्रमाणे लढली हे महत्त्वाचे. असंख्य घाव झेलूनही शिवरायांचा भगवा झेंडा शिवसेनेने हातातून निसटू दिला नाही. शेवटी हा लढा अस्मितेचाच होता. मुंबईसह महाराष्ट्राच्या अखंडतेचा होता. 
 
- अर्थात गेल्या पन्नास वर्षांपासून मुंबईवर आणि पंचवीस वर्षांपासून मुंबईच्या महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता होतीच. त्या सत्तेला व भगव्याला सुरुंग लावून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न आज जितक्या ‘कारस्थानी’ पद्धतीने झाला तो काँग्रेस राजवटीतही झाला नसेल. देशाच्या राजकारणात मुंबईचे एक वेगळे स्थान आहे. संपूर्ण देश मुंबईत सामावला आहे हे काही प्रमाणात खरे असेलही, पण तरीही मुंबईवर भूमिपुत्रांचा म्हणजे मराठी माणसांचाच पगडा राहिला. देशाचा कौल काय आहे ते मुंबई-ठाण्याच्या जनतेने स्पष्ट केले. येथे ‘मन की बात’ चालत नाही तर फक्त ‘काम की बात’ चालते. शिवसेनेने मुंबईत विकासाचे काम केले. शिवसेनेने मुंबईचे सदैव संरक्षण केले. शिवसेनेने मुंबईत विश्वासाचे बीज पेरले. तो विश्वासच शिवसेनेला विजयाकडे घेऊन गेला. शिवसेना ८४ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला. भारतीय जनता पक्षाला ८२ जागा मिळाल्या. अर्थात हाती संपूर्ण सत्ता व साधने असल्याचा जास्तीत जास्त लाभ भारतीय जनता पक्षाने पदरात पाडून घेतला. तरीही भाजपास मिळालेला ८२ चा आकडा हा अभिनंदन करण्यासारखाच आहे. 
 
- काही झाले तरी मुंबईत शिवसेनेचाच महापौर विराजमान होईल. त्यासाठीच शेवटी ही लढाई झाली. मुंबईवर मराठी माणसाचे वर्चस्व आहेच, पण ‘वॉर्डा’वॉर्डातील निकाल पाहिले तर सर्वच भाषिकांनी शिवसेनेला मतदान केले हे दिसून येते, पण भारतीय जनता पक्षाला विशिष्ट जात, धर्म आणि प्रांताचे ‘एकगठ्ठा’ मतदान झाले. तेच निर्णायक ठरले याची खंत आहे व निकालाची चिरफाड करण्यापेक्षा पुढच्या वाटचालीस आम्ही महत्त्व देतो. बहुमताचा संपूर्ण आकडा शिवसेनेस गाठता आला नाही. यापेक्षा मोठा आकडा गाठता आला असता. त्याची कारणे तपासावी लागतील. शिवाय मुंबईतील १२ लाख मतदारांची नावे गहाळ झाली व त्यातील बहुसंख्य मतदार मराठीच होते. हा घोळ सत्तेचा वापर करून ‘ठरवून’ झाला काय? अर्थात मुंबईतील शिवसेनेचे वर्चस्व आणि मुसंडी महत्त्वाची.
 
- जे झाले ते झाले, गंगेला मिळाले म्हणून वाहत्या पाण्यात हात धुऊन घेणाऱ्यांतली शिवसेना नक्कीच नाही. महापालिका त्रिशंकू दिसत असली तरी मुंबईकरांचा कौल हा शिवसेनेच्याच बाजूने आहे. मुंबईतल्या निकालांचे सविस्तर विश्लेषण नंतरही करता येईल. मुंबईसह इतर १० महानगरपालिका व २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या व तेथे बऱ्याच प्रमाणात प्रस्थापितांना धक्के बसले. ठाणे महानगरपालिकेत जंग जंग पछाडूनही भाजपला शिवसेनेचा पराभव करता आला नाही व ठाण्यात शिवसेनेने एकहाती सत्ता आणली. सोलापुरातही शिवसेनेने चांगला आकडा गाठला आहे. विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती या महानगरपालिकांत भाजपने अपेक्षेप्रमाणे मुसंडी मारली आहे. नागपूर तर भारतीय जनता पक्षाचा गड आहे व तेथे नितीन गडकरी व मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिष्ठा पणास लागली होती. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांत भाजपने चांगली कामगिरी करून दाखवली हा काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का आहे.