शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

उत्तर मुंबईत भाजपा करणार नेत्रदीपक कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2017 02:23 IST

‘मै सबका, सब मेरे’ या उक्तीप्रमाणे राजकारणात सक्रिय आणि कार्यमग्न असलेले खासदार गोपाळ शेट्टी हे लोकप्रतिनिधी म्हणून येत्या फेब्रुवारीत २५ वर्षे पूर्ण करीत आहेत.

- मनोहर कुंभेजकर, मुंबई

‘मै सबका, सब मेरे’ या उक्तीप्रमाणे राजकारणात सक्रिय आणि कार्यमग्न असलेले खासदार गोपाळ शेट्टी हे लोकप्रतिनिधी म्हणून येत्या फेब्रुवारीत २५ वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त आणि आगामी पालिका निवडणुकीबाबत त्यांनी ‘लोकमत व्यासपीठ’ अंतर्गत विविध विषयांवर संवाद साधला. देशात, राज्यात आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर आम्ही आगामी निवडणुकीत मतदारांना सामोरे जाणार आहोत. उत्तर मुंबईतून भाजपाचे सध्या ११ नगरसेवक असले तरी सर्व ४२ जागा जिंकण्यासाठीच आम्ही रिंगणात उतरू, असा ठाम विश्वास भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केला. ‘मै सबका, सब मेरे’ या उक्तीप्रमाणे राजकारणात सक्रिय आणि कार्यमग्न असलेले खासदार गोपाळ शेट्टी हे लोकप्रतिनिधी म्हणून येत्या फेब्रुवारीत २५ वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त आणि आगामी पालिका निवडणुकीबाबत त्यांनी ‘लोकमत व्यासपीठ’ अंतर्गत विविध विषयांवर संवाद साधला. आगामी पालिका निवडणुकीत उत्तर मुंबईत भाजपाची रणनीती काय असेल, असे विचारता शेट्टी म्हणाले, आगामी पालिका निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढविणार आहोत. गेल्या काळाच्या तुलनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनेक वेळा उत्तर मुंबईत आले. मुख्यमंत्री हे भाजपाचे ट्रम्प कार्ड असतील.पालिका निवडणुकीत भाजपा-सेना युतीबाबत विचारले असता, खासदार शेट्टी म्हणाले की, त्याबाबत आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. जर युती झाली तर १७५ जागा आम्ही जिंकू; आणि जर युती झाली नाही, तर भाजपा कार्यकर्ते पक्षाच्या आदेशाचे पालन करून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात सर्व ४२ जागा जिंकण्यासाठी मैदानात उतरतील आणि भाजपाला १२५ जागा मिळवून आम्ही आमचा महापौर विराजमान करू. पालिकेतील घोटाळ्यांवर बोलताना ते म्हणाले, रस्ते घोटाळा, नालेसफाई घोटाळा हे चुकीचे एस्टीमेट सादर करून केलेले घोटाळे आहेत. यात पालिकेतील अधिकारी आणि राजकीय पक्षांचेही संगनमत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मतदारसंघातील कामांबाबत ते म्हणाले, पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत ११ हजार घरांत विनामूल्य शेगडी व गॅसची जोडणी देण्याचा विक्रम आम्ही केला. वर्सोवा-मढ जेट्टी येथील वेसावे येथे रस्त्याअभावी बोटसेवा बंद पडली होती. केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्याकडे पाठपुरावा करून प्रसंगी दालनात ठिय्या आंदोलन करून हा प्रश्न सोडवून घेतला. संरक्षण खात्यांतर्गत असलेल्या मालाड पूर्व आणि कांदिवली (पूर्व) येथील अर्धा किमी परिसरातील अनेक इमारतींचा पुनर्विकास साडेतीन वर्षे रखडला होता. याबाबत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे पाठपुरावा करून ही बंदी उठवून घेतली. आता तेथे पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. पालघर जिल्ह्यातील गोऱ्हे गाव एक आदर्श गाव म्हणून नावारूपाला आणले आहे. बोरीवलीतील शिंपोली येथे १५ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल उभारले तर कांदिवलीतील महावीरनगरात १३ एकर जागेवर युवकांना संधी देणारे प्रमोद महाजन क्रीडा संकुल उभारले. महिला सशक्तीकरण, बेटी बचाव बेटी पढाव, स्वच्छ भारत अभियान, सुरक्षा विमा योजना असे अनेक विधायक उपक्रम राबविल्याचेही खा. शेट्टी म्हणाले. आरे कार शेडमध्ये पर्यावरणाच्या नावाखाली मेट्रो कार शेडला विरोध करणे चुकीचे असल्याचे सांगून मोकळ््या जागांचा वापर करावा, अशी आपली भूमिका असल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले. झाडे तोडल्यास पुन्हा दुसरीकडे ती लावता येतील. तसेच हजारो झोपड्यांचाही पुनर्विकास करता येईल. मध्य वैतरणा प्रकल्पात १ लाख झाडे तोडली. मात्र या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबईचा पाण्याचा प्रश्न मिटला, अशी आठवणही त्यांनी करून दिली.