मुंबई : भारतीय जनता पार्टीची पहिली यादी 15 ऑगस्टला जाहीर करू, असे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. तथापि, आता ही यादी महायुतीतील जागावाटपाचा फॉम्यरुला निश्चित झाल्यानंतरच जाहीर केली जाणार आहे. स्वत: फडणवीस यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
दुसरीकडे महायुतीतील घटक पक्षांच्या जागावाटपाची बोलणी संथ गतीने सुरू आहे. लहान घटक पक्षांना आधी जागांचे वाटप करून नंतर भाजपा, शिवसेनेच्या जागा निश्चित करायच्या, असे धोरण दोन्ही मोठय़ा पक्षांनी अवलंबिले आहे. भाजपाला शिवसेनेकडून जागा वाढवून हव्या आहेत; पण तशी कुठलीही मागणी पक्षाकडून अद्याप करण्यात आलेली नाही. फडणवीस यांनी ही बाबदेखील मान्य केली.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सांगितले की, जागावाटपासाठी महायुतीतील सर्व पक्षांचे नेते लहान लहान गटाने भेटत असून चर्चा वेगाने सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपामध्ये येऊ इच्छितात आणि त्यांच्यापैकी काहींना उमेदवारीही हवी आहे. मात्र काही जण शिवसेनेच्या वाटय़ाला असलेल्या जागा मागत आहेत. या जागा शिवसेनेकडून भाजपाने मागून घ्याव्यात. आम्ही कमळावर लढलो तर नक्की जिंकू, शिवसेनेच्या तिकिटावर यश मिळणार नाही, असे हे नेते सांगत असल्याचे भाजपाच्या वरिष्ठ सूत्रंनी सांगितले. भाजपाचे राज्यात 45 आमदार आहेत. त्या सर्वाना उमेदवारी दिली जाणार नाही. चार-पाच आमदारांना डच्चू मिळेल, असे मानले जाते. (विशेष प्रतिनिधी)
भाजपाने विधानसभानिहाय सव्रेक्षण केले असून अद्याप विद्यमान आमदारांसह कोणालाही शब्द दिलेला नाही, असे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. एका कार्यक्रमानिमित्त ते पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पक्षश्रेष्ठींनी नव्या चेह:यांना संधी देऊ असे धोरण असल्याचे सांगितले आह़े त्यासंदर्भात असे विचारले असता गडकरी म्हणाले, कोणत्याही विद्यमान आमदारांना शब्द दिलेला नाही़ ज्या ठिकाणी विद्यमान आमदार कमी पडल्याचे दिसून येईल, त्याठिकाणी नव्या चेह:यांना संधी देऊ, असे ते म्हणाले.
महायुतीतील जागावाटपाचा फॉम्यरूला निश्चित झाल्यानंतरच भाजपाची यादी जाहीर होईल. जागावाटपाचा हा तिढा 25 ऑगस्टर्पयत सुटेल.
- देवेंद्र फडणवीस