शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

भारिप-बमसंच्या बालेकिल्ल्यात भाजपची हॅट्ट्रिक!

By admin | Updated: May 16, 2014 20:38 IST

अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे संजय धोत्रे यांनी सलग तिसर्‍यांदा बाजी मारून भारिप-बहुजन महासंघाच्या बालेकिल्ल्यात विजयाची पताका फडकवली आहे.

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे संजय धोत्रे यांनी सलग तिसर्‍यांदा बाजी मारून भारिप-बहुजन महासंघाच्या बालेकिल्ल्यात विजयाची पताका फडकवली आहे. भाजप, काँग्रेस आणि भारिप-बहुजन महासंघाच्या तिरंगी लढतीत भाजपने गत निवडणुकीपेक्षाही जास्त मताधिक्य घेतल्याने आगामी विधानसभा निवडणुकांवर या निकालाचे परिणाम कसे होतील, हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे.अकोला लोकसभा मतदारसंघातून भारिप-बहुजन महासंघाचे उमेदवार तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर मैदानात होते. सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करून अकोला पॅटर्न सर्वदूर पोहोचवणार्‍या प्रकाश आंबेडकरांना निवडणुकीत काँग्रेसचा पाठिंबा मिळेल, अशी चर्चा निवडणुकीच्या सुरुवातीस होती. त्याअनुषंगाने भारिप-बमसं आणि काँग्रेसमध्ये चर्चाही झाली होती; मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. काँग्रेसच्या पाठिंब्याची आशा मावळल्यानंतर आंबेडकरांनी यावेळी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. अकोला लोकसभा मतदारसंघातील अकोला पूर्व आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघ भारिप-बहुजन महासंघाच्या ताब्यात आहेत. याशिवाय जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेवरही भारिप-बमसंचेच वर्चस्व आहे. आपल्या या राजकीय शक्तीच्या बळावर लोकसभा मतदारसंघ काबीज करण्याचा पुरेपूर प्रयत्न आंबेडकरांनी केला. याशिवाय माळी आणि मुस्लीम मतं घेण्यासाठीही त्यांनी व्यूहरचना आखली होती; मात्र काँग्रेसने हिदायत पटेल यांच्या रूपाने सहकार क्षेत्राशी जवळीक असलेला अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्याने मुस्लीम मतदारांवर विसंबून असलेल्या आंबेडकरांचा ताळमेळ बसला नाही.हिदायत पटेल यांच्या उमेदवारीने सामाजिक समीकरणे बदलली. हिदायत पटेल यांच्यामुळे मुस्लीम मतं काँग्रेसच्या बाजूने एकवटल्या गेली. भारिप-बमसंला दलित मतांचे तर काँग्रेसला मुस्लीम मतांचे पाठबळ मिळाले. या तिरंगी लढतीत भाजपचे संजय धोत्रे मोदी लाटेवर स्वार झाले आणि तब्बल दीड लाखांपेक्षाही जास्त मताधिक्याने ते निवडून आले. प्रारंभी निवडणुकीत तुल्यबळ लढत होईल, असा अंदाज होता; मात्र निकालानंतर ही लढत एकतर्फी असल्याचे सिद्ध झाले. काँग्रेसने हिदायत पटेल यांची उमेदवारी उशिरा जाहीर केली. तरीही पटेल यांनी चांगली लढत देऊन, दुसरे स्थान मिळवले. भाजपने अकोला लोकसभा मतदारसंघात केवळ विजयच मिळवला नाही, तर प्रचंड मताधिक्यही मिळवले. या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभावच नव्हता; मात्र भारिप-बहुजन महासंघाचा बालेकिल्ला पुरता ढासळल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.