शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
4
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
5
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
6
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
7
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
9
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
10
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
11
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
12
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
13
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
14
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
15
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
16
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
17
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
18
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
20
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

भाजपची ‘भिस्त’ आयारामांच्या ताकदीवर

By admin | Updated: February 12, 2017 00:01 IST

जिल्हा परिषद निवडणूक रणांगण : चंद्रकांतदादांची प्रतिष्ठा पणाला; कोल्हापुरातील लढतींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

विश्वास पाटील--कोल्हापूर --भाजप हा पक्ष केंद्रात व राज्यात सत्तेत असलेला पक्ष असला तरी आतापर्यंतच्या वाटचालीत ग्रामीण राजकारणात घुसायला या पक्षाला मर्यादा आल्या. सत्ता तर हवी आहे आणि मातब्बर उमेदवार तर नाहीत, ही कोंडी फोडण्यासाठी पक्षाने दोन्ही काँग्रेसमधील आयारामांना पक्षात घेऊन पावन करून घेतले आहे. लोक त्यांना व त्यांच्या या व्यवहाराला किती स्वीकारतात, यावर भाजपच्या यशाची भिस्त अवलंबून आहे.या निवडणुकीत पक्षाला यश किती मिळेल यासंबंधी भाकीत करणे बाजूला ठेवले तरी हवा निर्माण करण्यात हा पक्ष नक्की यशस्वी झाला आहे. मनपा निवडणुकीप्रमाणेच जिल्हा परिषदेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना लोक किती पाठबळ देतात, हा मुद्दाही कोल्हापूर आणि राज्याच्या दृष्टीने औत्सुक्याचा असेल. पालकमंत्री म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन कन्यागत पर्वास घसघशीत १२१ कोटी रुपये मिळवून दिले. कोल्हापूरचा टोल रद्द केला, तीर्थक्षेत्र आराखडा, ‘सीपीआर’मधील सुधारणांपासून ते शहरातील वाहतुकीच्या कोंडीच्या प्रश्नापर्यंत त्यांनी लक्ष घातले आहे. ‘काहीतरी करून दाखविणारा नेता’ अशी त्यांच्याबद्दल लोकभावना आहे; परंतु त्यांनी या निवडणुकीत जो कुणी येईल त्याला मिठी मारल्याने त्याचा फटका त्यांना बसू शकतो. राष्ट्रवादीतील नेत्यांना जेलमध्ये पाठविण्याची भाषा हा पक्ष करीत होता; परंतु त्याच पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये घेऊन ते पावन करून घेत आहे. या आघाड्या करताना पक्षाने कोणतेच तारतम्य बाळगले नाही. म्हणजे चंदगडमध्ये चक्क राष्ट्रवादीच्या आमदारांशीच आघाडी केली आहे. हातकणंगले येथेही तसेच घडले आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक हेच पडद्याआडून भाजपची सूत्रे हलवितात असा आरोप होतो. ते सोबत असतानाही जनसुराज्य शक्तीच्या विनय कोरे यांनाही आघाडीत घेतले. कोरे व महाडिक यांच्यातून विस्तव जात नाही. एकाच आघाडीत असूनही कोरे यांनी पुलाची शिरोलीत महाडिक यांच्या सुनेला विरोध केला आहे. महाडिक यांना ते आवडले नाही म्हणून चंद्रकांतदादा समजूत काढायला चक्क त्यांच्या घरी गेले. पक्षाकडे जिल्हा परिषदेची सत्ताच नसल्याने पाटी कोरी आहे; परंतु नोटाबंदीचा सर्वसामान्यांना झालेला त्रास मतपेटीतून व्यक्त होतो का, ही भीती पक्षकार्यकर्त्यांतही आहे. लढविलेल्या ३९ पैकी आम्ही किमान २१ च्या पुढे जाऊ, असा दावा पक्षाचे नेते करीत आहेत; परंतु त्या दाव्याला वास्तव स्थितीचा आधार नसल्याचे चित्र दिसते. काहीही करून सत्ता खेचायचीच, अशी भाजपची आणि महाडिक यांची व्यूहरचना आहे; परंतु त्यांच्या प्रयत्नांत शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना अडथळे आणू शकते, असे सध्याचे चित्र आहे. चंद्रकांतदादांवर राज्याची जबाबदारी असल्यामुळे आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, बाबा देसाई, हिंदुराव शेळके, आदी नेते किल्ला लढवीत आहेत; परंतु त्यांच्या नेतृत्वाच्या म्हणून अंगभूत मर्यादा आहेत. त्यामुळे कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले आणि कागलमध्येच भाजपची मदार आहे. कागलमध्ये समरजित घाटगे गेले महिनाभर आई व पत्नीसह गावन्गाव पिंजून काढत आहेत; परंतु तिथे तिरंगी लढत आहे आणि त्यांच्यासमोरील आव्हान मोठे आहे. गडहिंग्लजमध्ये नेसरीत भाजपचे काही प्रमाणात आव्हान आहे. आतापर्यंत दोन्ही काँग्रेसवाल्यांना संधी दिली. आता एकदा यांना देऊन बघू, असा विचार मतदारांनी केला तरच भाजपचे कमळ फुलू शकते. ४ वरून ४० चा पल्ला गाठायचाय..गत निवडणुकीत भाजपने साठपैकी कशाबशा वीसपर्यंतच जागा लढविल्या होत्या. त्यांतील अधिकृत कमळ चिन्हावर कोरोची मतदारसंघातून देवानंद कांबळे हे एकमेव विजयी झाले. पुढच्या टप्प्यात शौमिका महाडिक पोटनिवडणुकीत विजयी झाल्या. कबनूर विकास आघाडीतून विजयी झालेल्या विजया पाटील या भाजपच्या कार्यकर्त्या आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले परशराम तावरे हे सध्या भाजपमध्ये आहेत. म्हणजे या घडीला चार सदस्य भाजपचे म्हणून आहेत. या चारवरून भाजपला मित्रपक्षांना घेऊन ४० चा पल्ला गाठायचा आहे. म्हणजे शंभर टक्के यश पक्षाला हवे आहे. (चंदगडमधील प्रत्येकी दोन कुपेकर गट व भाजपचा गोपाळराव गट आणि हातकणंगले तालुक्यातील धैर्यशील माने गटाला दिलेल्या दोन जागा या वडगाव नगरपालिकेतील युवक क्रांती आघाडीच्या माध्यमातून रिंंगणात) महाडिक नावाचे होकायंत्रया निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक भाजपसोबत आहेत. मुत्सद्दी राजकारणी म्हणून राजकारणातील डावपेच करण्यात आणि काही जागा जिंकून देण्यात ते तरबेज आहेत. त्याचा भाजपला नक्की फायदा होईल; परंतु महाडिक यांच्या राजकारणाबद्दल तिरस्कार असणारा ही वर्ग जिल्ह्यात आहे. शरद पवार यांना सत्तेचे वारे कोणत्या दिशेने वाहते ते होकायंत्रासारखे लगेच समजते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. तसेच महाडिक यांच्याही राजकारणाचे आहे. यापूर्वी १९९५ ला त्यांनी युतीच्या काळात शिवसेना बळकावली होती. आता त्यांनी भाजप बळकावला आहे. त्याचेही पडसाद उमटणार आहेत.तीन तालुक्यांत चिन्ह नाहीया निवडणुकीत भाजप करवीर तालुक्यात सर्वाधिक ११, हातकणंगले तालुक्यात ०६, कागलमध्ये सर्व ०५, शिरोळमध्ये ०५, भुदरगड तालुक्यात ०४, राधानगरी व गडहिंग्लजमध्ये प्रत्येकी ०३, पन्हाळ्यात आणि गगनबावड्यात प्रत्येकी अवघी एक अशा ३९ जागा लढवीत आहे. शाहूवाडी, आजरा आणि चंदगड तालुक्यांत पक्षाचे चिन्हच गोठले आहे; कारण तिथे स्थानिक आघाडीला जागा सोडल्या आहेत.