शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

लव्ह-जिहादमध्ये जैन मुलींना फसवलं जातंय, त्यांना आम्ही वाचवू - शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 13:06 IST

मीरा-भाईंदर महापालिकेची निवडणूक भाजपाने मनी आणि मुनीच्या बळावर जिंकली असा आरोप शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केला.

ठळक मुद्देजैन मुनी नयपद्मसागरजी महाराज यांची तुलना शिवसेनेने थेट झाकीर नाईकशी केली992 साली मुंबईत दंगल झाली तेव्हा हिंदू म्हणून शिवसेनेने जैन समाजाचे रक्षण केले होते

मुंबई, दि. 23 - मुंबई, दि. 23 - मीरा-भाईंदर महापालिकेची निवडणूक भाजपाने मनी आणि मुनीच्या बळावर जिंकली असा आरोप शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मीरा-भाईंदरमध्ये भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करणा-या जैन मुनी नयपद्मसागरजी महाराज यांची तुलना शिवसेनेने थेट झाकीर नाईकशी केली. नयपद्मसागरजी महाराज यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. 

1992 साली मुंबईत दंगल झाली तेव्हा हिंदू म्हणून शिवसेनेने जैन समाजाचे रक्षण केले होते असे  संजय राऊत म्हणाले. जैन समाजाला आमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न सुरु आहे पण त्यांनी लक्षात ठेवावे त्यांची टक्कर शिवसेनेशी आहे. जातीय आधारावर मत मागितली जात आहेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचा काय आहे ते समजवावे लागेल असे संजय राऊत म्हणाले. आज अनेक जैन मुलींना लव्ह-जिहादमध्ये फसवलं जात असून, शिवसेना त्यांना वाचवेल असे राऊत म्हणाले. 

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत शिवसेनेने आठ जैन उमेदवार उभे केले होते. त्यातला एक उमेदवार विजयी ठरला. अन्य सात जण दुस-या स्थानावर राहिले. मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेला अन्य भाषिकांनीही मतदान केले असा दावा संजय राऊत यांनी केला. दोन दिवसांपूर्वी निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतरच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपाने निवडणूक जिंकण्यासाठी जैन मुनींचा आधार घेतला असा आरोप केला होता. सरनाईक यांच्या ओवळा-माजीपाडा विधानसभा मतदारसंघाचा काही भाग मीरा-भाईंदरमध्ये येतो.

मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात हिंदी भाषिक, गुजराती, जैन मतदारांची संख्या जास्त आहे. त्यातुलनेत मराठी मतदार कमी आहेत. त्यामुळे शिवसेनेला अपेक्षित यश मिळवता आले नाही अशी सारवासारव  शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. मराठी मतदारांचे प्राबल्य असलेल्या भागामध्ये आम्ही सर्व जागा जिंकल्या असा दावा त्यांनी केला. भाजपाची राजकीय ताकत कमी पडल्याने त्यांनी जैन धर्मगुरुंचा आधार घेतला असा आरोप त्यांनी केला. प्रचार संपल्यानंतर भाजपाने जैन धर्मगुरुंना प्रचारात उतरवल आणि त्यांचा संदेश जैन-गुजराथी समाजापर्यंत पोहोचवला असे सरनाईक म्हणाले.  

टॅग्स :Shiv Senaशिवसेना