शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

लव्ह-जिहादमध्ये जैन मुलींना फसवलं जातंय, त्यांना आम्ही वाचवू - शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 13:06 IST

मीरा-भाईंदर महापालिकेची निवडणूक भाजपाने मनी आणि मुनीच्या बळावर जिंकली असा आरोप शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केला.

ठळक मुद्देजैन मुनी नयपद्मसागरजी महाराज यांची तुलना शिवसेनेने थेट झाकीर नाईकशी केली992 साली मुंबईत दंगल झाली तेव्हा हिंदू म्हणून शिवसेनेने जैन समाजाचे रक्षण केले होते

मुंबई, दि. 23 - मुंबई, दि. 23 - मीरा-भाईंदर महापालिकेची निवडणूक भाजपाने मनी आणि मुनीच्या बळावर जिंकली असा आरोप शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मीरा-भाईंदरमध्ये भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करणा-या जैन मुनी नयपद्मसागरजी महाराज यांची तुलना शिवसेनेने थेट झाकीर नाईकशी केली. नयपद्मसागरजी महाराज यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. 

1992 साली मुंबईत दंगल झाली तेव्हा हिंदू म्हणून शिवसेनेने जैन समाजाचे रक्षण केले होते असे  संजय राऊत म्हणाले. जैन समाजाला आमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न सुरु आहे पण त्यांनी लक्षात ठेवावे त्यांची टक्कर शिवसेनेशी आहे. जातीय आधारावर मत मागितली जात आहेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचा काय आहे ते समजवावे लागेल असे संजय राऊत म्हणाले. आज अनेक जैन मुलींना लव्ह-जिहादमध्ये फसवलं जात असून, शिवसेना त्यांना वाचवेल असे राऊत म्हणाले. 

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत शिवसेनेने आठ जैन उमेदवार उभे केले होते. त्यातला एक उमेदवार विजयी ठरला. अन्य सात जण दुस-या स्थानावर राहिले. मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेला अन्य भाषिकांनीही मतदान केले असा दावा संजय राऊत यांनी केला. दोन दिवसांपूर्वी निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतरच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपाने निवडणूक जिंकण्यासाठी जैन मुनींचा आधार घेतला असा आरोप केला होता. सरनाईक यांच्या ओवळा-माजीपाडा विधानसभा मतदारसंघाचा काही भाग मीरा-भाईंदरमध्ये येतो.

मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात हिंदी भाषिक, गुजराती, जैन मतदारांची संख्या जास्त आहे. त्यातुलनेत मराठी मतदार कमी आहेत. त्यामुळे शिवसेनेला अपेक्षित यश मिळवता आले नाही अशी सारवासारव  शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. मराठी मतदारांचे प्राबल्य असलेल्या भागामध्ये आम्ही सर्व जागा जिंकल्या असा दावा त्यांनी केला. भाजपाची राजकीय ताकत कमी पडल्याने त्यांनी जैन धर्मगुरुंचा आधार घेतला असा आरोप त्यांनी केला. प्रचार संपल्यानंतर भाजपाने जैन धर्मगुरुंना प्रचारात उतरवल आणि त्यांचा संदेश जैन-गुजराथी समाजापर्यंत पोहोचवला असे सरनाईक म्हणाले.  

टॅग्स :Shiv Senaशिवसेना