शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजपाच्या रहाटकर माघार घेणार, बिनविरोध निवड अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 05:45 IST

सहा जागांसाठी होणाºया राज्यसभा निवडणुकीत भाजपाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांना ऐनवेळी सातवा उमेदवार म्हणून रिंगणात उतरविल्याने निवडणूक चुरशीची होणार अशी चर्चा रंगली असली तरी, रहाटकर माघार घेणार असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

मुंबई : सहा जागांसाठी होणाºया राज्यसभा निवडणुकीत भाजपाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांना ऐनवेळी सातवा उमेदवार म्हणून रिंगणात उतरविल्याने निवडणूक चुरशीची होणार अशी चर्चा रंगली असली तरी, रहाटकर माघार घेणार असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.भाजपातर्फे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आधीच अर्ज भरला आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि केरळचे माजी भाजपा प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आदींच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. त्याचवेळी भाजपाने विजया रहाटकर यांचाही अर्ज भरल्याने राजकीय कुजबुज सुरू झाली.रहाटकर यांना भाजपाने नेमके कशासाठी उभे केले? काँग्रेसचे उमेदवार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची वाट रोखली जाणार का, असे तर्कवितर्क सुरू झाले. शिवसेनेची अतिरिक्त मते, अपक्ष आमदार आणि लहान पक्षांच्या आमदारांची मते घेऊन भाजपा रहाटकरांना जिंकविण्यासाठी प्रयत्न करेल, असे गणितदेखील मांडले गेले.तथापि, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, रहाटकर माघार घेतील. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने विरोधकांवर दबाव म्हणूनदेखील रहाटकर यांचा अर्ज भरला गेला असण्याची शक्यता आहे. विधानसभा सदस्यांमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या या जागांसाठी मतदान हे खुले असते. गुप्त मतदान असले तर घोडेबाजाराला वाव असतो. खुल्या मतदानामुळे मतांची उघड फोडाफोडी भाजपा करणार नाही आणि निवडणुकीत घोडेबाजार केल्याचा आरोप स्वत:वर लादून घेणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे रहाटकर या अर्ज मागे घेतील.>रहाटकरांचा अर्ज कशासाठी?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी भाजपाच्या विधिमंडळ कार्यालयात आले आणि विजया रहाटकर यांचाही अर्ज आपल्याला भरायचा आहे, असे त्यांनी सांगितले. त्याआधीच रहाटकर यांना निरोप देण्यात आला होता. व्ही. मुरलीधरन हे केरळमधून अर्ज भरण्यासाठी आलेले होते. अर्जासोबत जोडायची आवश्यक कागदपत्रे त्यांनी आणली होती पण काही जोडपत्रे यावयाची होती. ती शेवटच्या क्षणापर्यंत आली. उद्या एखादे कागदपत्र राहून गेले म्हणून त्यांचा अर्ज रद्द झाला तर पर्यायी व्यवस्था म्हणून रहाटकर यांचा अर्ज भरण्यात आल्याचे भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून १५ मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येईल.>केतकरांचा अर्ज दाखलच्काँग्रेसतर्फे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनीही सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी महाराष्ट्राचे पक्षप्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे आ. गणपतराव देशमुख, समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू आसिम आझमी, प्रा. जोगेंद्र कवाडे आदी नेते उपस्थित होते.राष्टÑवादी काँग्रेसने वंदना चव्हाण आणि शिवसेनेने अनिल देसाई यांनापुन्हा संधी दिली असून या दोघांनी यापूर्वीच आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

टॅग्स :Vijaya Rahatkarविजया रहाटकर